Author: अनंत पांगारकर

गुरुवार, १५ ऑगस्ट  गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली कार न्यायालयातून परत मिळवून देण्यासाठी आणि पुण्यात मदत करण्यासाठी दहा हजार रुपये लाच घेणाऱ्या सहाय्यक सरकारी वकील महिलेला लाच लुचपतच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. अंजला नलिनी कमलाकर नवगिरे (वय ५४ वर्ष, पुणे) असे लाच घेणाऱ्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता महिलेचे नाव असून पुणे लाच लुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. पुणे लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदार महिलेच्या पतीविरुद्ध जून २०२४ मध्ये हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात तक्रारदाराच्या नावावर असलेली मारुती स्विफ्ट कार जप्त करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेली कार परत मिळावी यासाठी तक्रारदार महिलेने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी लष्कर कोर्ट,…

Read More

बुधवार, १४ ऑगस्ट वेतन फरकाची फाईल मंजूर करण्याच्या बदल्यात पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आणि शिपाई लाचेच्या सापळ्यात अडकले आहे. सिन्नरच्या रामनगर आश्रम शाळेत लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही कारवाई केली. सुनिल वसंत पाटील (वय – ५४ वर्ष, मुख्याध्यापक, प्राथमिक आश्रमशाळा रामनगर ता. सिन्नर) आणि बाळू हिरामण निकम (वय ५५ वर्ष, शिपाई, प्राथमिक आश्रम शाळा, रामनगर, ता. सिन्नर, जिल्हा – नाशिक) अशी लाचखोर आरोपींची नावे असून दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या २०१६ ते २०२३ या दरम्यानच्या वेतन फरकाची फाईल मंजूर करून आणून फरकाची रक्कम काढून…

Read More

रवी राणांच्या वक्तव्याचा संगमनेर काँग्रेसने केला निषेध महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला लाचार होणार नाही बुधवार, १४ ऑगस्ट संगमनेर – महाराष्ट्राला संत व समाज सुधारकांची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रात कायम महिलांचा सन्मान केला जातो. मात्र महायुती सरकारने मते खरेदी करण्याच्या नावावर महिला भगिनींचा स्वाभिमान दुखावला असून महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला कधीही लाचार होणार नाहीत. सरकारच्या घोषणासाठी लागणारा पैसा हा जनतेचा आहे, महायुतीचा नाही. आ. रवी राणांसह महायुती सरकारने महिलांची माफी मागावी, अशी मागणी दुर्गाताई तांबे यांनी केली आहे. संगमनेर बस स्थानक येथे संगमनेर तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्यावतीने रवी राणा यांचा निषेध करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, सुरेश थोरात, अर्चना बालोडे,…

Read More

बुधवार, १४ ऑगस्ट  विधानसभा निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसचे दोन आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्ही आमदारांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पक्ष बदलाच्या चर्चेने वेग पकडला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्याचबरोबर इच्छुकांचीही चाचपणी सुरू आहे. मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने काही जण पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत. तर काहींनी पक्षांतर करण्याचा निर्णयही घेतला आहे. त्या दृष्टीने भेटीगाठी वाढल्या आहेत. विद्यमान आमदारही कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल? कोणत्या पक्षाच्या तिकीटावर विजयी होता येईल? विद्यमान पक्ष उमेदवारी देणार की नाही? याची चाचपणी करत आहेत. अशा स्थितीत…

Read More

बुधवार, १४ ऑगस्ट बिबट्या घरात घुसल्याने घराला बाहेरून कुलूप लावून घेतल्याने बिबट्याला पकडण्यासाठी गर्दीचा अडथळा येत होता, त्यामुळे पोलिसांना बघ्यांच्या गर्दीवर लाठीमार करावा लागला होता. या घटनेत पोलिसांनी घराला कुलूप लावून बिबट्याला कोंडून घेणाऱ्याला जबाबदार ठरवत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तब्बल दहा वर्षानंतर या पदाधिकाऱ्याची संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांशी संबंधित हा खटला असल्याने याकडे संगमनेर-अकोले तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील माळीझाप येथे ३ एप्रिल २०१४ रोजी भाऊसाहेब आल्हाट यांच्या राहत्या घरात ही घटना घडली होती. आल्हाट यांच्या घरात घुसलेल्या बिबट्याची माहिती मिळताच अकोले तालुका भाजपचे सरचिटणीस…

Read More

बुधवार, १४ ऑगस्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गावाहिनी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संगमनेर यांच्यावतीने शहरात आज बुधवारी (१४ ऑगस्ट) संध्याकाळी सात वाजता अखंड भारत संकल्प दिनानिमित्त मशाल फेरी होणार आहे. मशाल फेरीनंतर विराट पुरोहित यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. १४ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला भारत मातेला पुन्हा अखंड करण्याचा संकल्प गेली अनेक वर्षे संघटना करत आहे. आपली भारतमाता स्वतंत्र झाली, पण त्याच बरोबर तिचे अनेक तुकडे होत ती खंडित होऊन स्वतंत्र झाली. ही एक खुप मोठी वेदनादायक घटना संपूर्ण भारतीय समाजमनात आहे. यासाठी १४ ऑगस्टला सायंकाळी मशाल फेरी व विराट पुरोहित यांचे…

Read More

बुधवार, १४ ऑगस्ट  विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांना मुख्यमंत्री सचिवालयाकडून सा.प्र.वि. राशि-१ (राजशिष्टाचार) दिनांक २ ऑगस्ट, २०२४ च्या निर्णयानुसार कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानुसार त्यांना वित्त विभाग, शासन निर्णयानुसार विहित केलेल्या सर्व सेवा सुविधा अनुज्ञेय राहतील, असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे एका ज्ञापनाद्वारे कळविण्यात आले आहे. डॉ. नीलम गोऱ्हे या सन २००२ पासून विधानपरिषदेच्या सन्माननीय सदस्या असून सध्या त्यांची सदस्यत्वाची ४ थी टर्म सुरू आहे. त्या सन २०१९ पासून विधानपरिषद सभागृहाच्या उपसभापतीपदी कार्यरत आहेत.

Read More

मंगळवार, १३ ऑगस्ट  आगामी विधानसभा निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपविल्यानंतर पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू आहे. यातच अध्यक्षपदी पक्षातील एखाद्या महिलेची वर्णी लावावी असा पक्षांतर्गत सूर उमटला आहे. त्यामुळे भाजपच्या पुढील अध्यक्ष महिला किंवा ओबीसी असेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी पाच तास बैठक झाली. यावेळी भाजपचा पुढील अध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची चर्चा होती. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांकडे सोपवल्यानंतर आता राष्ट्रीय अध्यक्षपदाची चाचपणी केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा,…

Read More

मंगळवार, १३ ऑगस्ट अडीच वर्षांचा असलेला नगराध्यक्षांचा कालावधी आता पुन्हा पाच वर्षांवर करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून अन्य महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. 👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) : ✅ विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार. १४९ कोटीस मान्यता. ✅ मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय. लाखो नागरिकांना लाभ. ✅ डेक्कन कॉलेज,…

Read More

मंगळवार १३ ऑगस्ट  दहावीच्या परीक्षेचे रिसीट काढण्यासाठी साकुर गावात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बळजबरी करून साकुरच्या रुबाब पान शॉप मध्ये तिच्यावर अत्याचार बलात्कार केल्यानंतर या मुलीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार चार महिन्यांपूर्वी समोर आला होता. यातील मुख्य आरोपीला सहाय्य करणाऱ्या चौथ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना सुमारे चार महिन्यांनी यश आले आहे. विजय शिवाजी खेमनर (वय २९ वर्ष रा. हिरेवाडी, साकुर) असे पोलिसांनी पकडलेल्या चौथ्या आरोपीचे नाव असून त्याला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटना उघडकीस आल्यापासून हा आरोपी फरार होता. दहावीत शिकणारी मुलगी परीक्षेचे रिसीट आणण्यासाठी साकुर गावात आली होती. यावेळी आरोपी…

Read More