Author: अनंत पांगारकर
संगमनेर तालुक्यातील कासारे शिवारात कारवाई, दोघांना पकडले कार्यकर्त्यांच्या प्रखर भूमिकेमुळे वजन केल्यावर गोमांस भरले १३ टन मंगळवार, दि. २८ मे गोवंश हत्या बंदी कायद्यानंतर शेकड्याने कारवाया, आंदोलने करून देखील देशाच्या अनेक भागात, काना कोपऱ्यात गोमांस पुरविणारे संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने सुरूच आहे. कोणत्याही कायद्याचा धाक येथील कसायांना राहायला नसल्याने पोलीस दलाच्या नाकावर टिच्चुन किंबहुना त्यांच्याच काही लोकांच्या आशीर्वादाने हे कत्तलखाने सुरू असल्याचा आरोप संगमनेरकर नागरिकांमधून नेहमी होतो. मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल करून गोमांस वाहतूक होत असलेला एक आयशर ट्रक (MH17 BY7824) बजरंग दलाच्या श्याम प्रसाद थोरात, शाम रावबा नाईकवाडी, सुरेश मनोजकुमार कालडा यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासारे…
मंगळवार, दि. २८ मे पुण्यासह देशाला हादरवून सोडणाऱ्या पोर्शे कार अपघातानंतर आता पुन्हा दुसरी धक्कादायक बातमी समोर आली आहे. नगर रस्त्यावर खराडी जकात नाका येथे भरधाव ट्रकने दुचाकीस्वारांना दिलेल्या धडकेत तिघांपैकी दोघा महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मालवाहतूक ट्रक वाघोलीतून पुण्याच्या दिशेने जात असताना खराडी येथील जकात नाका चौकात हा अपघात झाला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून श्यामबाबू रामफळ गौतम असे या चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक गौतम हा ट्रक (MH12 VF6441) घेऊन चंदन नगरच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. जकात नाका…
सोमवार, दि. २७ मे संगमनेरमधील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांच्या कारवाया सातत्याने सुरू आहे. रविवारी रात्री देखील पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात कत्तल केलेल्या गोवंश जनावरांचे ६०० किलो गोमांस आढळून आले आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. उपअधीक्षक वाघचौरे यांना शहरातील जुना जोर्वे रोड लगत असलेल्या मदिना नगर मध्ये एका पांढऱ्या रंगाच्या (MH17 BD4182) बोलेरोमध्ये गोवंश जनावरांचे कत्तल केलेले नेले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी याची माहिती आपल्या पथकातील पोलीस कर्मचारी राहुल डोके व राहुल सारबंदे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनील माळी यांच्यासह पोलीस पथकाला कारवाईचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीच्या…
मौलानासोबत मुलीचा विवाह करून देण्यास पित्याने दिला होता नकार साथीदारांच्या मदतीने खून करत मौलानाने घेतला बदला अकस्मात मृत्यू म्हणून नोंदल्या गेलेल्या प्रकरणाची महिनाभरात पोलिसांनी केली उकल सोमवार, दि. २७ मे गेल्या महिन्यात संगमनेर तालुक्यातील मालदाड गावच्या शिवारात असलेल्या जंगलामध्ये मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीची ओळख पटविल्यानंतर पोलीस दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र हा मृत्यू अकस्मात नसून संबंधित व्यक्तीचा घातपात झाल्याचे समोर आले असून याप्रकरणी संगमनेर पोलिसांनी उत्तर प्रदेश मधून मौलानासह त्याला मदत करणाऱ्या दोघांपैकी एकाला अटक केली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मृत व्यक्तीचा मुलगा जुनेद आहातेशाम अन्सारी याने दिलेल्या फिर्यादीवरून आहतेशाम इलियास अन्सारी यांचा खून केल्याप्रकरणी मौलाना…
सोमवार, दि. २७ मे नासिक पुणे महामार्ग लगत भर वस्तीत असलेल्या मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या चार जणांना पोलिसांनी पकडले. ही कारवाई रविवारी (दि. २६) दुपारी एक वाजेच्या सुमारास शहरातील शक्तिमान टॉवर परिसरात करण्यात आली. राजू कचरू मिसाळ (वय ४७, रा. गल्ली क्रमांक १५, गणेशनगर, संगमनेर), नितीन सुंदरलाल ठाणेकर ( वय ४५, रा. वाडेकर गल्ली, संगमनेर), राजेंद्र जिजाबा फटांगरे (वय ४७, रा. गल्ली क्रमांक ३, जनतानगर, संगमनेर) व नीलेश चंद्रकांत अष्टेकर (वय ५०, रा. डेरे शाळेच्या पाठीमागे, रहाणे मळा, संगमनेर) अशी पोलिसांनी पकडलेल्या जुगार खेळणाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी या चौघा जणांकडून जुगाराचे साहित्य, मोबाइल, रोख रक्कम असा एकूण ३६ हजार रुपयांचा…
सोमवार, दि. २७ मे संगमनेरमध्ये कंटेनर चालकाने कोल्हार-घोटी राज्य मार्गावर संगमनेरनजीक बुलेटस्वारांना दिलेल्या धडकेत बुलेटवरील दोघांचाही मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालक कंटेनर घेऊन फरार झाला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत रवींद्र भुजबळ (वय ३३ वर्ष) व गोरख सयाजी पर्वत (वय ४० वर्ष, दोघे रा. निंबाळे, ता. संगमनेर) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. रविवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील मृतक त्यांच्या ताब्यातील बुलेट मोटरसायकलवरून (एम. एच. १४ एच. टी. ५००६) कोल्हार-घोटी राज्य मार्गाने संगमनेर-लोणी रोडने घरी जात असताना लोणी रस्त्यावर फ्लॉवर मार्केटजवळ अज्ञात कंटेनर चालकाने बुलेटस्वारांना पाठीमागून जोराची धडक दिली. अपघातातील…
सोमवार, दि. २७ मे व्हाट्सअप ग्रुपवर लोकमत न्यूजमधील व्हिडिओ टाकत त्याखाली टाकलेल्या एका मेसेजमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने मेसेज टाकणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अमोल चंद्रभान पेरणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयुब लालखान पठाण (रा. तांदुळवाडी, ता. राहुरी, जि. अहमदनगर) याच्या विरोधात भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम २९५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पठाण याने गावातील एका व्हाट्सअप ग्रुप वर लोकमत न्यूजमधील सुमारे दोन मिनिटांचा व्हिडिओ टाकत त्याखाली “अखेर डाव साधलाच. केंद्रापाठोपाठ आता महाराष्ट्रातील खाजगीकरण केलय. रद्द केलेला जीआर पुन्हा काढण्यात आला आहे.…
रविवार, दि. २५ मे अपघातातील जखमीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन येणारी रुग्णवाहिका आणि एसटी बसचा संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवारात भीषण अपघात झाला. यात एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोंची शिवारात अपघात झाल्याची माहिती मिळाल्याने येथील कुटे रुग्णालयाची रुग्णवाहिका (विंगर एम.एच. – १७ ए-जी ८००२) घटनास्थळी जखमींना आणण्याकरिता गेली होती. अपघातातील जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन येत असताना या रुग्णवाहिकेचा आणि एसटी बसचा (एम. एच. १४ बी.टी. ३८०३) कोकणगाव शिवारात अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहे. जखमीत रुग्णवाहिकेच्या चालकाचाही समावेश आहे.…
संडे स्पेशल फिनलँड हा उत्तर युरोपातला एक देश आहे. या देशाची लोकसंख्या फक्त पंचावन्न लाख आहे. इथली शिक्षणव्यवस्था निव्वळ जगावेगळी नसून ती जगातील सर्वात चांगली मानली जाते. फिनलँड शंभर टक्के साक्षर देश आहे. इथले विद्यार्थी जगात सर्वात जास्त हुशार विद्यार्थी म्हणून गणले जातात. पीआयएसए (प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट) म्हणजे “पिसा” नावाची संस्था जगातल्या पंधरा वर्षांच्या शिकणाऱ्या मुलांचं गणित, विज्ञान आणि इतर विषयांच्या अनुषंगानं परीक्षण करते, त्या संस्थेच्या परीक्षेत फिनलँडचे विद्यार्थी कायम सर्वोच्च स्थानी असतात. या देशात शिक्षण पूर्णपणे मोफत असून ते सर्वांसाठी ते उपलब्ध आणि अनिवार्यसुद्धा आहे. या देशातील प्रत्येक विद्यार्थी आपलं संपूर्ण शिक्षण फुकट घेतो. त्यासाठी त्याला एकही…
रविवार, दि. २६ मे | अनंत पांगारकर खचल्यानंतर तब्बल दीड वर्ष नव्या निर्मितीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाजत गाजत केलेल्या भूमिपूजनानंतरही दीर्घकाळ रेंगाळलेला म्हाळुंगी नदीवरील पूल पाडण्यास अखेर मुहूर्त सापडला आहे. शनिवारपासून खचलेला पूल पूर्णतः नामशेष करण्यास सुरुवात झाली. यामुळे दीर्घकाळ गैरसोयीला सामोरे जाणाऱ्या संगमनेरकरांना नव्या पुलाच्या निर्मितीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान खचलेला हा पूल गेल्या दीड वर्षांपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद होता. पुलाचा विषय राजकीय श्रेयवादात अडकल्याने संगमनेरकर यातून भेटीला धरले गेले होते. यासाठी म्हाळुंगी पूल बनाव कृती समितीच्या माध्यमातून एकवटलेल्या संगमनेरकरांना अखेर न्याय मिळाला आहे. समितीच्या माध्यमातून सातत्याने करण्यात आलेल्या मागणीमुळे केवळ हाच पूल…
