Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन छत्रपती संभाजीनगर: संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक आणि ‘एमपीआयडी’ गुन्ह्यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब दामोदर कुटे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नियमित जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रामुख्याने आरोपीची गंभीर वैद्यकीय प्रकृती आणि न्यायालयीन अटींचे केलेले पालन या दोन महत्त्वाच्या बाबींवर आपले निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात स्पष्ट केले की, नाशिकच्या सिव्हिल सर्जन यांनी सादर केलेल्या वैद्यकीय अहवालानुसार आरोपी भाऊसाहेब कुटे यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून ते सध्या नाशिकमधील खासगी रुग्णालयात ऑक्सिजन आणि ‘एनआयव्ही’ सपोर्टवर उपचार घेत आहेत. त्यांना सध्याच्या स्थितीत…

Read More

आजचे राशिभविष्य ​मेष : आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने काहीसा चढ-उतारांचा राहू शकतो. जुने शारीरिक आजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता असल्याने आहाराची आणि विश्रांतीची काळजी घ्या. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करताना कमालीची सावधानता बाळगा, अन्यथा नुकसान होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम ठेवावा लागेल, कारण मतभेदांचे प्रसंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ​वृषभ : तुमच्यासाठी आजचा दिवस सकारात्मक आणि प्रगतीकारक ठरेल. विशेषतः व्यापार आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी अत्यंत अनुकूल काळ आहे. संसर्गजन्य किंवा साथीच्या आजारांपासून स्वतःचे रक्षण करणे गरजेचे आहे. कौटुंबिक आघाडीवर वातावरण प्रसन्न राहील आणि जीवनसाथीसोबतचे नाते अधिक मधूर होऊन आनंदात वेळ बगेल. ​मिथुन : आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक आणि…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्यात आली असून प्राथमिक तपासात ६ कोटी ६५ लाख रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी विजय तबाजी काळे याला आता २९ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी (PCR) सुनावण्यात आली आहे. अहिल्यानगर येथील आर्थिक गुन्हे शाखेने आरोपीच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. संगमनेर येथील विशेष तथा सत्र न्यायालयात यावर सुनावणी झाली असता, जिल्हा न्यायाधीश मंदार नेरलेकर यांनी आरोपीला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणात सरकारच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी…

Read More

सोनई : सोनई शहर आणि परिसरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अल्पवयीन मुली व तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. अनेक हतबल कुटुंबांनी आपल्या मुली हरवल्याच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवल्या आहेत, मात्र दिवस उलटूनही पोलिसांकडून कोणताही ठोस तपास केला जात नसल्याचा गंभीर आरोप पालकांकडून होत आहे. या संवेदनशील प्रकरणात सोनई पोलीस स्टेशनचे अधिकारी वारंवार ‘एफआयआर’ (FIR) दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याने नागरिकांमधील असंतोष अधिकच वाढला आहे. मुली गायब होण्याच्या या वाढत्या घटनांमुळे संपूर्ण तालुक्यात पालकांमध्ये कमालीचे भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांची तपासाची गती अत्यंत मंद असून प्रशासन या गंभीर विषयाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन ​अहिल्यानगर: डिलिव्हरी लॉजिस्टिक कंपनीची फ्रँचायझी मिळवून देण्याचे आमिष दाखवून संगमनेर येथील एका ४६ वर्षीय वैद्यकीय (मेडिकल) व्यावसायिकाची ५ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अहिल्यानगरच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. ​पावबाकी रोड परिसरात राहणाऱ्या पीडित व्यावसायिकाला एका नामांकित डिलिव्हरी लॉजिस्टिक कंपनीची फ्रँचायझी घ्यायची होती. यासाठी त्यांनी इन्स्टाग्रामवर पाहिलेल्या एका जाहिरातीतील फॉर्म भरून आपली माहिती दिली. हीच माहिती सायबर चोरांच्या हाती लागली आणि फसवणुकीच्या जाळ्याला सुरुवात झाली. फॉर्म भरल्यानंतर मयांक गुप्ता, परमार आणि प्रियांका नावाच्या महिलेने पीडित व्यावसायिकाशी मोबाईलद्वारे संपर्क साधला…

Read More

आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस अत्यंत शुभ आणि प्रगतीकारक ठरेल. जुने प्रलंबित स्वप्न पूर्ण होण्याचा सुंदर योग असून नोकरीच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. आर्थिक क्षेत्रातील गुंतवणुकीतून उत्तम धनलाभ संभवतो आणि कायद्याच्या कचाट्यातून तुमची सुटका होऊ शकते. कौटुंबिक कारणांमुळे काहीसा खर्च वाढेल, परंतु मानसिक आनंद टिकून राहील. वृषभ: आज तुमचा कल प्रामुख्याने मनोरंजनाकडे आणि कलात्मक गोष्टीकडे राहील. समाजात किंवा कामाच्या ठिकाणी एखाद्या महत्त्वपूर्ण व्यक्तीशी भेट होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायातील नव्या योजनांबाबत सावधगिरी बाळगा आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. आरोग्य उत्तम राहील आणि जुन्या शत्रूंपासून होणारा त्रास पूर्णपणे नष्ट होईल. मिथुन: आजचा दिवस आर्थिक आणि कौटुंबिक दृष्टीने संमिश्र फळ देणारा…

Read More

https://x.com/i/status/2069734732120612878 महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेवर नवरा-नवरीच्या नावापुढे जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याच्या राज्य शासनाच्या संभाव्य विचारावर आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला असून, असा निर्णय घेणे पुरोगामी महाराष्ट्रासाठी हास्यास्पद ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी यासंदर्भात एक ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, एका बाजूला बालविवाह रोखण्यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, सक्षम यंत्रणा उभारणे आणि व्यापक स्तरावर जनजागृती करणे यांसारखे अनेक ठोस आणि प्रभावी मार्ग उपलब्ध आहेत. असे असताना शासन अशा केवळ प्रतीकात्मक आणि वरवरच्या उपायांवर भर देत आहे, जे अजिबात योग्य नाही. इतर काही राज्यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: चेक बाऊन्स प्रकरणात संगमनेर न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्याचा चेक घेऊन फौजदारी खटला दाखल करणे फिर्यादीला चांगलेच महागात पडले आहे. कायदेशीर त्रुटींमुळे न्यायालयाने आरोपी संभाजी पांडुरंग पवार यांची निर्दोष मुक्तता केली आहे. फिर्यादी डॉ. अमोल संताजी कर्पे आणि आरोपीचा मुलगा डॉ. विक्रम पवार हे दोघेही एकाच व्यवसायातील असल्याने त्यांची ओळख होती. वायनरी व्यवसाय सुरू करण्यासाठी आरोपी व त्यांच्या मुलाने डॉ. कर्पे यांच्याकडून ५ लाख रुपये उसने घेतले होते. त्यातील दीड लाख रुपये परत केल्यानंतर, उर्वरित ३ लाख ५० हजार रुपयांच्या वसुलीसाठी फिर्यादीला एक चेक देण्यात आला. हा चेक बँकेत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन ​संगमनेर: संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत होणाऱ्या वीजखंडितीच्या प्रश्नावर आमदार अमोल खताळ यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला आहे. राज्यातील लोडशेडिंगच्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधत त्यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना होत असलेला त्रास सभागृहात मांडला. हे लोडशेडिंग तातडीने बंद करून ग्रामीण भागाला अखंड आणि सुरळीत वीजपुरवठा देण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. ​राज्यात कुठेही लोडशेडिंग होत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असले, तरी संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील वस्तुस्थिती अत्यंत वेगळी असल्याचे आमदार खताळ यांनी निदर्शनास आणून दिले. महावितरणचे स्थानिक अधिकारी वरिष्ठ स्तरावरून वीज व्यवस्थापन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: अमली पदार्थांचा समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात ‘अमली पदार्थविरोधी स्वतंत्र युनिट’ उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात केली. संगमनेर शहर आणि ग्रामीण भागासह राज्यभरात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात आता प्रशासनाकडून अत्यंत कठोर पावले उचलली जाणार आहेत. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात वेळोवेळी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे. संगमनेर तालुक्यात अमली पदार्थांचा पुरवठा, तस्करी आणि विक्रीचे प्रमाण वाढत असल्याने स्थानिक नागरिकांकडून तीव्र चिंता व्यक्त केली जात होती. युवकांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या घातक प्रवृत्तीला तातडीने आळा घालण्याची आग्रही मागणी आमदार अमोल खताळ यांनी गृहमंत्री…

Read More