Author: अनंत पांगारकर
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा देणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात. नशिबाची भक्कम साथ लाभल्यामुळे रेंगाळलेली कामे गतीने पूर्ण होतील. आर्थिक बाजू मजबूत राहील आणि गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची चिन्हे आहेत. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदाराशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची स्थिती उत्तम राहील, मात्र आहारावर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आज तुम्हाला नशिबापेक्षा स्वतःच्या कष्टावर अधिक विश्वास ठेवावा लागेल. वादविवादापासून दूर राहणे तुमच्या हिताचे राहील, विशेषतः कार्यालयात सहकाऱ्यांशी बोलताना संयम बाळगा. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेताना घाईगडबड करू नका, अन्यथा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान कमालीचे वाढले आहे. वाढती उष्णता, घटलेला पाऊस, सातत्याने जाणवणारा दुष्काळ आणि पर्यावरणाचा ढासळत चाललेला असमतोल हा मानवासह संपूर्ण सजीव सृष्टीसाठी धोक्याची घंटा आहे. हा धोका टाळण्यासाठी पर्यावरण संवर्धन अत्यंत गरजेचे असून, येणाऱ्या पावसाळ्यात प्रत्येक नागरिकाने किमान दोन झाडे लावून त्यांचे प्रामाणिकपणे संवर्धन करावे, असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आयोजित ‘दंडकारण्य अभियान’ आढावा बैठकीत ते बोलत होते. या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर बायपास जवळ असणाऱ्या कृष्णा लॉन्स परिसरात आज (शुक्रवारी ४ जून) दुपारी एक वाजेच्या सुमारास एका चालत्या कंटेनरला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. हा कंटेनर पुण्याहून नाशिकच्या दिशेने नवीन चारचाकी गाड्या घेऊन जात होता. कृष्णा लॉन्स परिसरात पोहोचताच कंटेनरमधून अचानक धूर निघू लागला. आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने गाडी थांबवली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे ती आटोक्याबाहेर गेली. घटनेच गांभीर्य ओळखून तात्काळ घुलेवाडी येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे चालक आकाश बनसोडे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | शिर्डी: राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही अत्यंत निर्दयपणे कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची वाहतूक करणाऱ्या दोन पिकअप वाहनांवर शिर्डी पोलिसांनी धाडसी कारवाई केली. सावळीविहीर जवळ सापळा रचून केलेल्या या कारवाईत पोलिसांनी ६ जनावरांची सुटका केली असून, एकूण ८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गंगापूरच्या दिशेने गोवंशाची बेकायदेशीर तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सावळीविहीर परिसरात पाळत ठेवून सापळा रचला. यावेळी गंगापूरच्या दिशेने जाणाऱ्या दोन महिंद्रा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | पुणे: जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक आणि नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पुणे येथील एका दिमाखदार सोहळ्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रसेवा दलाच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार डॉ. तांबे यांच्या प्रदीर्घ सामाजिक, राजकीय आणि पुरोगामी चळवळीतील योगदानाचा गौरव करण्यासाठी प्रदान करण्यात आला. पुणे येथील सिंहगड रस्त्यावरील साने गुरुजी स्मारक येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या मार्गदर्शिका डॉ. शैलाताई नरेंद्र दाभोळकर, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार कपिल पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुरेश ठाकूर, प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन वैद्य, साजदा निहाल…
संपादकीय अहिल्यानगरच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत जे नाट्य घडले, त्याने केवळ जिल्ह्याचेच नाही तर संपूर्ण राज्याचे राजकीय लक्ष वेधून घेतले. ‘नॉट रिचेबल’ उमेदवार, थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा इशारा देणारे बंडखोर नेते आणि पडद्यामागे फिरलेली सूत्रे… हा सगळा घटनाक्रम एखाद्या थ्रिलर सिनेमालाही मागे टाकणारा होता. पण सरतेशेवटी, महायुतीचे (भाजप) अधिकृत उमेदवार प्राजक्त प्रसाद तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली. या संपूर्ण प्रकरणाने हे पुन्हा एकदा सिद्ध केले की, राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते; गरज असते ती योग्य वेळी अचूक ‘मास्टरस्ट्रोक’ मारण्याची, जी किमया आ. संग्राम जगताप आणि माजी खा. सुजय विखे पाटील यांच्या जोडीने करून दाखवली. अहिल्यानगरमध्ये सर्व अपक्ष उमेदवारांनी माघार…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा देणारा ठरेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाजू मजबूत राहील, जुनी येणे बाकी असलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवाल आणि जोडीदाराशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची स्थिती उत्तम राहील, मात्र आहारावर थोडे नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची खंबीर साथ लाभणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक शांतता लाभेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभाचे उत्तम योग आहेत, नवीन करार करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. घरात एखाद्या धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते, ज्यामुळे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि तीन सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या अपात्रतेच्या निर्णयाला नाशिकच्या अप्पर विभागीय आयुक्तांनी मंगळवारी (दि. २ जून) तात्पुरती स्थगिती दिली आहे. या स्थगिती आदेशानंतर सरपंच निर्मला राऊत यांच्यासह इतर सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या नियमित कामकाजाला पुन्हा सुरुवात केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ९ जुलै रोजी होणार आहे. घुलेवाडी ग्रामपंचायतीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे. येथील लोकनियुक्त सरपंच निर्मला राऊत, तसेच सदस्य दत्तात्रय राऊत, सोनाली गिरी आणि अनिल राऊत यांनी गावातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्याचा वैयक्तिक लाभ उठवला, अशी तक्रार शिवसेना…
विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांचं जोरदार वारं वाहात आहे. एकूण १७ जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होत असून १८ जून रोजी या निवडणूक होत आहे. आज या निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. ३ वाजेपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घ्यायचे होते. त्यानुसार, १७ पैकी अनेक मतदारसंघातील उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा सर्वाधिक समावेश आहे. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे अर्ज माघारी घेण्यासाठी तब्बल १५० कोटी खर्च केले असून एका उमेदवाराला माघार घेण्यासाठी २५ कोटी दिल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | मुंबई/बुलढाणा: भारतीय जनता पक्षाला देशात लोकशाही नको असून, ‘इलेक्शन सिस्टिम’ ऐवजी ‘नॉमिनेशन सिस्टिम’ आणायची आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. सत्तेच्या हव्यासापोटी भाजपाने सर्व नैतिक मूल्ये पायदळी तुडवली असून, चालू असलेल्या विधान परिषद निवडणुका बिनविरोध करण्यासाठी विरोधी उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडताना म्हटले की, विधान परिषद निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांचे मर्यादित मतदार असतात. मात्र, या मर्यादित मतदारांच्या निवडणुकीतही सत्ताधारी महायुतीकडून ‘पैसा फेक तमाशा देख’ असा उघड खेळ सुरू आहे.…
