Author: अनंत पांगारकर
शिक्षणाचे खासगीकरण व कंत्राटीकरण थांबवा थांबविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह संघटनांचे पदाधिकारी उतरले रस्त्यावर… शिक्षणाची प्रयोगशाळा थांबवा- आमदार तांबे महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर -शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असून गोरगरीब, आदिवासी, शेतमजूर यांच्या मुलांचा शिक्षणाचा हक्क शासन चुकीच्या धोरणातून हिरावून घेत आहे. सरकारने शिक्षणाची प्रयोगशाळा तातडीने बंद करावी, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे युवा आमदार सत्यजित तांबे यांनी केली. शिक्षणाचे खाजगीकरण, कंत्राटी भरती, समूह शाळा या निर्णयाविरोधात संगमनेर तालुका समन्वय समितीच्यावतीने विद्यार्थी, पालक, शिक्षक, विविध शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांसह विविध संघटनांच्यावतीने यशोधन कार्यालय ते प्रांताधिकारी कार्यालय असा विराट जनआक्रोश मोर्चा शनिवारी काढण्यात आला होता. यामध्ये विधान परिषदेचे युवा आमदार सत्यजित तांबे, माजी…
महाराष्ट्र संवाद न्यूज समन्यायी पाणी वाटपाचे तत्व हे तत्कालीन काळजीवाहू सरकारच्या काळात अधिकारी पातळीवर ठरविले गेले होते. हे तत्व आपल्याला देखील मान्य नसल्याने या विरोधात सर्वप्रथम संगमनेरनेच आंदोलने करीत आवाज उठविला असल्याचे स्पष्ट करत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी, त्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आपण निळवंडे धरण आणि कालव्यांचा प्रश्न मार्गी लावल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते जलनायक, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर,…
महाराष्ट्र संवाद न्यूज सिन्नर – फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब आणि व्हाट्सअपसारख्या सामाजिक माध्यमांच्या आभासी जगात वाहवत जाऊ नका. यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट आणि बुद्धिमत्तेला पर्याय नाही. म्हणूनच आपल्या जीवनातील ध्येय निश्चित करून मार्गक्रमण करा, असा सल्ला प्रेरणादायी वक्त्या व समुपदेशक डॉ. एकता वाबळे यांनी दिला. येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या भिकूसा हायस्कूल येथे ‘नव्या युगाच्या नव्या दिशा’ या व्याख्यानावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोमनाथ जगदाळे होते. वाबळे म्हणाल्या, आपल्या मनाला दररोज सकारात्मक सूचना द्या आणि जीवनात चांगले बदल घडवून आणणाऱ्या माणसांविषयी आणि परमेश्वराबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आभासी सामाजिक माध्यमांच्याद्वारे चांगलेही घेता येते तेवढेच घ्या. स्क्रीन टाईम कमी करा. आपण जे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर पोलिसांच्या निष्क्रियतेचे उदाहरण समोर आले आहे. पोलिसांच्या तपासाअभावी एका खून प्रकरणाचा उलगडा होण्यास विलंब लागत असल्याने मृत व्यक्ती आणि त्याच्या नातेवाईकांना न्याय कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा महिन्यांपूर्वी एका वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयित आरोपींची लाय डिटेक्टर (पॉलीग्राफ) चाचणीसुद्धा केली आहे मात्र तरीही पोलिसांना अद्यापही खुनी सापडला नसून यामुळे पोलिसांचे अपयश उघड झाले आहे. फक्त गुन्हे दाखल करून पुढील तपासात काहीही निष्पन्न होत नसल्याचे प्रकार अथवा निष्पन्न न करण्याचा निष्काळजीपणा संगमनेर पोलिसांकडून होत आहे. यात संगमनेर उपविभागातील सर्वच पोलीस…
आर्थिक गुन्हे शाखा चार संचालकांची आज करणार चौकशी महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर आदर्श सहकारासाठी राज्यात दिशादर्शक ठरलेल्या संगमनेरच्या सहकाराला कलंकित करणाऱ्या दूधगंगा सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे, त्याचे कुटुंबीय आणि अन्य काही राजकीय प्रतिष्ठित आरोपी पोलिसांना सापडत नसतानाच आता आता आर्थिक गुन्हे शाखा ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. आर्थिक गुन्हे शाखेने संस्थेच्या चार संचालकांना गुरुवारी (ता. १९ ऑक्टोंबर) चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस धाडली आहे. या चारही संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने स्वतंत्रपणे नोटीसा बजावल्या असल्याची माहिती समोर येत आहे. यात संगमनेरमधील काँग्रेसच्या आणखी एका बड्या राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश असून संचालक राहिलेल्या सर्वांनाच राजकीय…
महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर आरोपींना अटक होत नसल्याने, ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नसल्याने दूधगंगा नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांचा संयम अखेर सुटला असतानाच आता या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेचा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला असल्याने त्याने आता अटकपूर्व जामीनासाठी औरंगाबाद हायकोर्टात धावपळ सुरु केली असल्याची माहिती समोर येत आहे. तर यातील कर्जदार आरोपी देवळाली प्रवरा (राहुरी) येथील कृष्णराव श्रीपतराव कदम श्रीमती प्रमिला कृष्णराव कदम यांनी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात तब्बल दोन महिन्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. तर ठेवीदारांनी सुरू केलेले जन आक्रोश आंदोलन व उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच होते. दूधगंगा अपहार प्रकरणी मुख्य 15 आरोपींसह…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : सहकारासाठी दिशादर्शक असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023 – 24 गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ शुक्रवारी (ता. 20 ऑक्टोंबर) सकाळी 10 वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व सौ. कांचनताई थोरात यांच्या हस्ते व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माधवराव कानवडे यांच्या उपस्थितीत आणि कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष संतोष हासे यांनी दिली आहे. काँग्रेस पक्ष वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात 10 लाख मॅट्रिक टनांपेक्षा जास्त गाळप केले आहे. शेतकरी,सभासद,…
खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेचे डिवायएसपी कमलाकर जाधव, पी.आय. बाळासाहेब राठोड, पी.आय. शेख, शहर पी.आय. भगवान मथुरे, पी.एस.आय. बाळासाहेब यादव, प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अमोल वाघमारे, सदस्य नवनाथ बोडके यांनी उपोषणकर्त्यांची घेतली भेट महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर नगर जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या दूधगंगा सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आणि इतर आरोपींना अटक करावी या प्रमुख मागणीसह ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी ठेवीदार संघर्ष समितीच्यावतीने संगमनेरचे प्रांत अधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले जनआक्रोश आंदोलन आणि उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी शिर्डी…
रविवार विशेष लेख महाराष्ट्र संवाद न्यूज @ प्रवीण पुरो आजवर देशातील विधानसभेच्या अर्थात कायदेमंडळाच्या एकाही अध्यक्षाला सुनावलं नसेल असे खडेबोल महाराष्ट्राचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहेत. मुस्कट फुटेल अशी टिपण्णी करत सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांचा पुरता पारा उतरवला आहे. नार्वेकर हे स्वतः पेशाने वकील आहेत. वकिली पेशा जसा त्यांना कळतो तशी वकिली भाषाही त्यांना कळते. पण कधीकधी वकीलही वाह्यात वागतात. अशिलही कंटाळतो. नार्वेकर वकील असताना त्यांना इतके बोल खावे लागतात याचा अर्थ त्यांच्या एकूणच वर्तनाची चिकित्सा व्हायला हवी. पिठासनावरचा वकील तर त्याहून पुढची पायरी चढतो. तिथे बसला की अध्यक्षाला वाटतं मीच हायकोर्ट आणि मीच सुप्रीम. आपल्याला पंख…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : गरबा हा फक्त डान्स आणि इव्हेंट नाही तर देवीची भक्ती आणि श्रद्धा असल्याचं सांगत विहिंपने इतर धर्मियांना या ठिकाणी येण्यास विरोध केला आहे. दांडिया आयोजनात फक्त हिंदू धर्मीयांना प्रवेश द्या, त्यासाठी आधार कार्ड तपासा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने गरबा आयोजित करणाऱ्या मंडळांकडे केली आहे. दारावर आधारकार्ड तपासण्यासाठी कार्यकर्ते नसल्यास विहिंपचे कार्यकर्ते उपलब्ध करून देऊ आणि पोलिसांनाही आम्ही बोलवू असं विश्व हिंदू परिषदेने सांगितलं आहे. गरबा उत्सवात आयोजकांनी फक्त हिंदू धर्मियांना प्रवेश द्यावे, त्यासाठी गरबामध्ये येणाऱ्यांची आधार कार्ड तपासण्यात यावीत अशी अपेक्षा विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केली आहे. गरबा हा श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय असून…
