Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज रात्रीच्या वेळी संशयास्पद अवस्थेत फिरताना ताब्यात घेतलेल्या दोघा संशयित आरोपींना सुट्टीकालीन न्यायालयासमोर नेण्यासाठी अर्धा तासाचा उशीर करणाऱ्या पोलीस हवालदार आणि हेड कॉन्स्टेबलला शिस्तभंगाचा ठपका ठेवत न्यायालयाने शिक्षा सुनावली. दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना परिसरातील गवत छाटण्याची शिक्षा देण्यात आली. परभणी जिल्ह्यातील मानवत पोलीस ठाण्यातील हे दोघे पोलीस कर्मचारी रविवारी रात्री २२ ऑक्टोंबरला रात्रीच्या गस्तीवर होते. पहाटेच्या वेळी या दोघा कर्मचाऱ्यांनी मानवत येथे दोघाजणांना संशयास्पद रित्या फिरताना ताब्यात घेत त्यांना अटक केली होती. अटकेतील या दोन्ही संशयित आरोपींना सकाळी ११ वाजता सुट्टी कालीन न्यायालयासमोर हजर करण्यात येणार होते. मात्र संशयित दोघा आरोपींसह हे दोन्ही कर्मचारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास न्यायालयात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली: पतंजलीने त्यांच्या सगळ्या खोटी आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवाव्यात, अन्यथा न्यायालय त्यांना गांभीर्याने घेईल असा इशारा देत एखाद्या विशिष्ट आजाराला बरं करण्याचा चुकीचा दावा केला गेल्यास पतंजलीच्या प्रत्येक उत्पादनावर एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याचा कडक इशारा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पतंजलीला दिला आहे. योग गुरु रामदेव बाबा यांच्यावर लसीकरण मोहीम आणि आधुनिक औषधांच्या विरोधात प्रचार केल्याचा आरोप करणाऱ्या आयएमएच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयुष मंत्रालय आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांना नोटीस बजावली होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या पीठाने सुनावणी घेतली. सुनावणी दरम्यान या याचिकेवर न्यायमूर्तींनी महत्त्वाची…
तेव्हा तोडणीसाठी जादा पैसे, उसालाही कमी भाव; आता नुकसान भरपाई देणार का? महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता : गणेश अडचणीत आला होता की प्रवरेच्या नेतृत्वाने जाणीवपूर्वक अडचणीत आणला होता, हे राहाता तालुक्याला पक्के माहित आहे. दडपशाही करून आणि जेलचा धाक दाखवून तुम्ही कारखाना चालवायला घेतला होता. कारखाना चांगला चालवणे तुमची जबाबदारी होती. गणेशवर सूड उगवण्याच्या नादात प्रवरेच्या नेतृत्वाने गणेश परिसराच्या अन्नात माती कालवली, त्याची नुकसान भरपाई तुम्ही आता करणार का? असा सवाल गणेश चे उपाध्यक्ष विजयराव दंडवते यांनी उपस्थित केला. प्रसिद्धी पत्रकात दंडवते म्हणाले, प्रवरा साखर कारखान्याने गणेश कारखाना कराराने चालवण्यासाठी घेतलेला होता, त्यामुळे गुंतवणूक करून कारखाना व्यवस्थित चालवणे ही त्यांची…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे : संगमनेरच्या दुय्यम कारागृहातून चार कैदी एकाच वेळी पळून जाण्याची घटना ताजी असताना आता येरवडा तुरुंगातूनही खुनाच्या प्रकरणातील शिक्षा भोगत असलेला कैदी पळाल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील सर्वात संवेदनशील आणि कडक सुरक्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या येरवडा कारागृहातूनच एका खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड आशिष जाधव हा पोलिसांना चकवा देऊन पळून गेल्याच समोर आलं. यामुळे संगमनेरतील घटनाही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कुख्यात गुंड आशिष जाधवच्या पळून जाण्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्हात 2008 पासून येरवडा…
आर्थिक गुन्हे शाखेचा तपास जैसे थे नेमकं पाणी मुरतय कुठे? महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहार प्रकरण समोर आल्यानंतर ठेवीदारांच्या ठेवी धोक्यात आल्या आहेत. आज ना उद्या आपले पैसे मिळतील या भरोश्यावर असलेल्या ठेवीदारांचा आशावाद आता मावळला आहे. त्यामुळे ठेवीदारांनी तिसऱ्यांदा आपले गाऱ्हाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दरबारी मांडले आहे. या प्रकरणी लक्ष घालण्याचे मान्य केल्यानंतर विखे पाटील काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. राजकीय वलय असलेल्या आणि जिल्हा परिषदेचा माजी सदस्य भाऊसाहेब कुटे याच्या अधिपत्याखाली असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील तब्बल 81 कोटी रुपयांच्या अपहरण प्रकरणी गुन्हा…
महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता – गेली आठ वर्ष प्रवरेने गणेश कारखाना चालवताना, गणेशच्या सभासद, शेतकरी बांधवांना प्रवरेपेक्षा 200 ते 300 रुपये कमी भाव देऊन गणेश परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो कोटी रुपयांची लूट केली, गणेशच्या तत्कालीन अध्यक्षांनी तेव्हा प्रवराच्या नेतृत्वाला जाब का विचारला नाही? तुमचे तोंड तेव्हा गप्प का होते? असा सवाल करत नऊ वर्ष सभासद, शेतकरी आणि कामगारांची पिळवणूक करणाऱ्यांनी गणेश कारखान्याचा कळवळा असल्याचा खोटा आव आणू नये, असा टोला गणेश साखर कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे यांनी सदाफळ यांना लगावला. गणेशचे अध्यक्ष लहारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गणेश कारखान्यासमोर दररोज अडचणींचा डोंगर उभा केला जात आहे, ज्येष्ठ नेते…
रविवार विशेष लेख @ प्रवीण पुरो महाराष्ट्र संवाद न्यूज भारतात कोणताही नवा उद्योग सुरू करायचा असल्यास पूर्वी उद्योगपतींकडून सर्वाधिक पसंती ही महाराष्ट्राला असायची. गेल्या 35 वर्षांच्या काळात महाराष्ट्राने उद्योग क्षेत्रात घेतलेली उडी, यासाठी निर्माण केलेल्या सुविधा आणि त्याकरता आकारण्यात आलेले करांचे दर याची उत्तम मांडणी या आधारे महाराष्ट्र हे उद्योगाच्या क्षेत्रातील देशात पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं. अगदी केंद्रातल्या मोदी सरकारने राज्यातील उद्योगांचा फडशा पाडण्याचं ठरवूनही महाराष्ट्राचं महत्व कमी झालं नाही. याला पूर्वजांच्या कर्तुत्वाची जोड हे एकमेव कारण आहे. सरकार कोणाचंही असलं राज्याने उद्योग प्रगतीचा आलेख कधी खाली आणला नाही. उद्योगांचं क्षेत्र असं फोफावत असताना राज्यातल्या राजकारण्यांनीही सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्राचा आलेख…
शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेबाबत पालकमंत्री विखेंच्या उपस्थितीत लवकरच बैठक – अमोल खताळ पाटील
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाचे स्मारक उभारण्याकरीता पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी निधीची उपलब्धता करून दिल्याने अनेक वर्षाची संगमनेरकर नागरीकांची इच्छा पूर्ण होणार असून स्मारकाच्या उभारणीबाबत पालकमंत्र्यासोबत लवकरच बैठक आयोजित करून जागेबाबतचा निर्णय केला जाणार असल्याची माहीती अमोल खताळ पाटील यांनी दिली. संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी शिवप्रेमींची इच्छा होती. यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. या मागणीची पूर्तता करण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्णाकृती स्मारक उभारण्याकरीता निधीची उपलब्धता करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने लोणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जिल्हा पर्यावरण समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या अशासकीय सदस्यपदी संगमनेरमधून गणेश बोऱ्हाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी तसेच पर्यावरण विषयक व्यापक जगजागृतीच्या कार्यक्रमाच्या यशस्वी व सक्षम अंमलबजावणी करण्यासाठी, पर्यावरणाशी संबंधित विभागांशी समन्वय करून स्थानिक पर्यावरणीय समस्या शोधून त्यावरील उपाययोजनांची शिफारस वरिष्ठ पातळीवर करण्यासाठी ही समिती कार्यरत राहणार आहे. समितीचा कालावधी दोन वर्षांसाठी असेल. जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या समितीमध्ये पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या दोन प्रतिनिधींची निवड केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी या पदावर बोऱ्हाडे यांची एकमेव निवड केली आहे. बोऱ्हाडे यांच्याशिवाय या…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह काही नेत्यांनी १६ नोव्हेंबर रोजी लोअर परळ येथील डेलिसल ब्रिजचं उद्घाटन केलं आहे. कोणत्याही परवानगीशिवाय हा पूल प्रवाशांसाठी खुला केल्याने आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे नेते सुनील शिंदे व सचिन अहिर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने एनएम जोशी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आदित्य ठाकरेंसह सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेनं या संदर्भातील वृत्त दिले आहे. आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरुद्ध एन. एम. जोशी पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम १४३, १४९, ३२६…
