Author: Annant Ppangarkar
संगमनेर | प्रतिनिधी राज्यातील तब्बल ८१ लाख महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून अपात्र ठरवून महायुती सरकारने महिलांच्या विश्वासाला तडा दिला असून ही महिलांची सरळसरळ फसवणूक असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. संगमनेर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लाडक्या बहिणींनी विश्वास ठेवून मतदान केले म्हणूनच हे सरकार सत्तेवर आले. मात्र सत्तेत आल्यानंतर त्याच महिलांना योजनेतून बाहेर काढण्याचे काम सरकारने केले आहे. ८१ लाख महिलांना अपात्र ठरवणे म्हणजे त्यांच्या आशा-आकांक्षांवर पाणी फेरण्यासारखे आहे, असे थोरात म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवरही भाष्य केले. महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकीय परंपरा ढासळत चालली…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर शहरातून बुलेट दुचाकीच्या सायलेन्सर मधून मोठमोठे आवाज काढत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या एका तरुणावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू साळुंखे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या आठ दिवसांपासून बस स्थानक आणि नवीन नगर रोड परिसरात हा युवक आपल्या बुलेटमधून फटाक्यांसारखे मोठे आवाज काढून नागरिकांना व व्यापाऱ्यांना नाहक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून स्थानिक व्यापाऱ्यांनी शहर पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची दखल घेत शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समीर बारवकर आणि गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सावंत यांनी या तरुणावर पाळत ठेवली. दुपारच्या सुमारास हा युवक पुन्हा बस स्थानक परिसरात आपल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: समनापूर बायपास चौफुली येथे महिनाभरापूर्वी झालेल्या गंभीर आणि प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी अरबाज जहागीरदार आणि जुनेद शेख यांना अटक करण्यात संगमनेर शहर पोलिसांना अखेर यश आले आहे. गेल्या एक महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या अरबाजला पोलिसांनी थेट पुण्यातून ताब्यात घेतले, तर जुनेदला संगमनेरमधील त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे संगमनेर आणि परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. सुमारे एका महिन्यापूर्वी संगमनेर जवळील समनापूर बायपास चौफुली येथे दोन गटात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात होऊन परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. हल्लेखोरांनी फिर्यादीवर चाकूने तब्बल ७ वार केले होते.…
मुंबई, विशेष प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या मोठ्या बदलांमधून जात आहे. बँक खात्यांची पडताळणी आणि ई-केवायसी मोहिमेनंतर या योजनेतील तब्बल ८१ लाख महिला अपात्र ठरल्या असून, सध्या लाभार्थी महिलांची संख्या २ कोटी ६६ लाखांवरून १ कोटी ८५ लाखांवर आली आहे. योजनेच्या सुरुवातीला २.४० कोटी लाभार्थी असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र बँकांकडून मिळालेल्या माहितीनंतर बनावट लाभार्थी, पुरुष, सरकारी कर्मचारी आणि प्राप्तिकर भरणाऱ्या व्यक्तींनीही याचे लाभ घेतल्याचे उघड झाले. त्यामुळे राज्य सरकारने पडताळणीची प्रक्रिया कडक केली असून, यामुळे शासनाची दरमहा १२०० कोटी रुपयांची मोठी बचत होणार आहे. याशिवाय, ६५ वर्षांवरील वयोमर्यादेच्या अटीमुळे सुमारे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर तालुक्यातील वडझरी बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर खाणकाम, तीव्र ब्लास्टिंग आणि स्टोन क्रेशरच्या त्रासाला कंटाळून अखेर स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आजपासून (१ जून) उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे. गावालगत अव्याहतपणे सुरू असलेल्या या खाणकामामुळे परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सतत होणाऱ्या जोरदार ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांना तडे गेले असून, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या विहिरी आणि बोअरवेलच्या पाणी पातळीवरही याचा विपरीत परिणाम झाला आहे. याशिवाय, क्रेशरमधून उडणाऱ्या धूळ प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांच्या, विशेषतः लहान मुले आणि…
मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमालीची लगबग पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकांचे सत्र अखेर संपले असून, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा पूर्णपणे सुटला आहे. विधानपरिषदेच्या एकूण १७ जागांपैकी तब्बल ११ जागांवर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीचा तिढा सुटून उमेदवारांची घोषणा झाल्यामुळे आता राज्यातील विधानपरिषदेचा हा रणसंग्राम अधिकच चुरशीचा आणि रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. उर्वरित जागांपैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना ४ जागांवर आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २ जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. जागावाटपाचा हा फॉर्म्युला निश्चित होताच भारतीय जनता पक्षाने…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा देणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात. मानसिक शांतता लाभेल आणि जुन्या चिंता दूर होतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, विशेषतः जीवनसाथीसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची बाजू उत्तम राहील, मात्र खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अनुकूल असून आकस्मिक धनलाभाचे योग आहेत. वृषभ: आज तुम्हाला आर्थिक बाबतीत कमालीचे यश मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेली कामे आज गतीने पूर्ण होतील. व्यावसायिक क्षेत्रात नवीन भागीदारी किंवा करार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भविष्यात मोठा फायदा होईल. समाजात मान-सन्मान…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर शहरातील मालपाणी बजाज शोरूममध्ये दुचाकी दुरुस्तीच्या कारणावरून झालेल्या वादातून शोरूमचे मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांनी मिळून एका ग्राहकाला आणि त्यांच्या ज्येष्ठ सासऱ्यांना लोखंडी रॉड, स्क्रू-ड्रायव्हर व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शोरूमचे मॅनेजर सचिन पलोड यांच्यासह १० ते १५ अनोळखी कर्मचाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोरूमसारख्या सार्वजनिक आणि व्यावसायिक ठिकाणी ग्राहकाला झालेल्या या अमानुष मारहाणीमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात स्वप्निल रोहिदास सातपुते (वय २५, रा. कासारा दुमाला, संगमनेर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी…
प्रवीण पुरो – राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी आपल्याकडे देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनतेवर खरोखरच उपकार केले आहेत. महेश झगडे यांच्यानंतर त्या तोडीचा अधिकारी या खात्याला मिळाला आणि राज्यातील जनतेला हायसे वाटले असल्यास नवल नाही. मुंढेजी, सनदी अधिकारी म्हणून आपल्याकडे आजवर आलेल्या जबाबदाऱ्यांना आपण न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. ज्या ठिकाणी कमी पडलात, तिथे आपल्यावर टीकाही झाली. तरीही जिथे जाऊ तिथे जनतेला न्याय देऊ, हे ब्रीद घेऊन आपली वाटचाल सुरू आहे, याचे समाधान आहे. राज्यातील भ्रष्ट खात्यांचा आणि त्या खात्यांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना धडा शिकवण्याचे काम आपल्या नावावर नोंदले गेले आहेच. पण तिथे वावरणाऱ्या दलालांचाही बिमोड आपण…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साही आणि सकारात्मक राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या अंगी असलेल्या कौशल्याचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. आर्थिक क्षेत्रात जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. आरोग्याची स्थिती उत्तम राहील, मात्र आहारावर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे. अडकलेली कामे गतीने पूर्ण होतील आणि मनातील चिंता दूर होईल. व्यापारी वर्गाला आज मोठा आर्थिक फायदा होण्याची चिन्हे आहेत. घरात एखाद्या धार्मिक किंवा मंगल कार्याचे नियोजन होऊ शकते. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे विचार मनात येतील. मानसिक…
समनापूर | बाबा जाधव: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीचे औचित्य साधून समनापूर येथे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी विचार मंचच्या वतीने आयोजित या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात सध्या कमालीचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या महोत्सवाची सुरुवात उद्या रविवारी (३१ मे) सकाळी ठीक ९ वाजता समनापूर ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या शासकीय पूजनाने होईल. यानंतर सोहळ्याचा मुख्य आणि भव्य कार्यक्रम मंगळवारी (२ जून) सायंकाळी ६ वाजता स्थानिक मालोबा मंगल कार्यालय येथे पार पडणार आहे. मुख्य कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व आदर्शवत कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान मान्यवरांचा विशेष सत्कार करून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: राज्यात सध्या महागाई आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव व पीकविमा मिळत नसल्याने सर्वत्र अस्थिरतेचे वातावरण आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून २ लाख रुपयांचे अनुदान द्यावे, अशी आग्रही मागणी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. तळेगाव दिघे येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्यावतीने आयोजित ऊस विकास मेळाव्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या प्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. नशिबाची भक्कम साथ मिळाल्याने रेंगाळलेली कामे गतीने पूर्ण होतील. आर्थिक बाजू मजबूत राहील आणि उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल, कुटुंबातील सदस्यांसह आनंदात वेळ बितेल. आरोग्याची स्थिती उत्तम राहील, मात्र आहारावर थोडे नियंत्रण ठेवणे हितकारक ठरेल. वृषभ: आज तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये कमालीचे यश मिळण्याची शक्यता आहे. जुनी गुंतवणूक आज फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्या धनलाभाचे उत्तम योग आहेत, नवीन व्यावसायिक करार होऊ शकतात. समाजात मान-सन्मान वाढेल आणि तुमच्या बोलण्याचा प्रभाव इतरांवर पडेल. कौटुंबिक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण सुनावणी दरम्यान, विविध गंभीर कलमांसह जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीचा नियमित जामीन अर्ज मंजूर केला आहे. राजेंद्र बापू गडगे (वय ५३ वर्षे) असे जामीन मंजूर झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र गडगे याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८, ३१९, ३५६, ३५२, ३५३, ३३६(४) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले: कांद्याला किमान 3000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा, कमी दरात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावे व हा निर्णय संपूर्ण राज्यभर लागू करावा, या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अकोले तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात कांदे ओतून सरकारच्या धोरणांचा निषेध केला. आंदोलनापूर्वी अकोले शहरातून जोरदार मिरवणूक काढण्यात आली. घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. राज्यभर बाजारात कांद्याला अत्यंत कमी दर मिळत आहेत. अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर उत्पादन खर्चापेक्षाही खाली गेले असून वाहतूक,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, शिर्डी: हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सध्या विविध सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रमांचा धडाका सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि शिवसैनिकांना आगामी संघर्षासाठी सज्ज करण्यासाठी शिर्डीत शिवसेनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांची तोफ या सभेत धडाडणार असून, त्यांच्या झंझावाती मार्गदर्शनामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापणार आहे. ही सभा मंगळवारी, (२ जून) दुपारी बारा वाजता शिर्डी येथील एअरपोर्ट रोडवरील ‘साई किमया गार्डन लॉन्स’ येथे पार पडणार आहे. या सभेला माजी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, भंडारदरा अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरातील पांजरे नाक्यावर काजवे महोत्सवासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. येथील टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना, ‘माझ्या मुलाला का थांबवले’ या कारणावरून मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले लक्ष्मण बांगर आणि त्यांचा मुलगा साई बाळू बांगर यांनी वनरक्षक चंद्रकांत भरत तळपाडे यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांजरे नाक्यावर वाहनांची तपासणी आणि शुल्क आकारणीचे काम सुरू असताना एमएच ०५ ईक्यू २६५१ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी एक्सएल-६ कार तेथे आली. या कारच्या डॅशबोर्डवर ‘पोलीस’ अशी पाटी आणि लाल-निळ्या रंगाचा एलईडी लाईट लावलेला…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्या तुम्ही अत्यंत आत्मविश्वासाने पूर्ण कराल. आर्थिक बाजू मजबूत राहील आणि जुने रखडलेले पैसे परत मिळू शकतात. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, परंतु जोडीदारासोबत बोलताना संयम बाळगणे आवश्यक आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे. व्यवसायात नवीन भागीदारी किंवा फायदेशीर करार होण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. सामाजिक कार्यात तुमची आवड वाढेल आणि मानसन्मान लाभेल. घरातील सदस्यांशी असलेले मतभेद मिटतील आणि वातावरण शांत राहील. संध्याकाळचा वेळ कुटुंबियांसोबत आनंदात जाईल.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, राहाता अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात असणाऱ्या चंद्रपूर गावातील साठवण तलावात बुडून एमबीए (MBA) शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवार, २८ मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. मृत तिघेही लोणी येथील पायरेन्स आयबीएमए (IBMA) कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकत होते. एकाच वेळी तीन तरुण विद्यार्थ्यांचा अंत झाल्याने महाविद्यालयीन वर्तुळासह संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजचे काही विद्यार्थी चंद्रपूर परिसरातील साठवण तलावाजवळ फिरण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान काही जण पाण्याच्या कडेला गेले असता, पाण्याचा आणि पाण्याच्या खाली असलेल्या खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तिघेही अचानक पाण्यात बुडू लागले. सोबत असलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: पुण्यातील नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील खटल्याची सुनावणी गुरुवारी विशेष न्यायालयात पार पडली. पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या १५ दिवसांत या प्रकरणाचे दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले होते. या पार्श्वभूमीवर, घटनेच्या २८ दिवसांच्या आतच न्यायालयाने मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्यावर न्यायालयीन प्रक्रियेनुसार सर्व आरोप निश्चित केले आहेत. आरोपीविरोधात ‘प्राईमा फेसी’ (प्रथमदर्शनी) सबळ पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आता या खटल्याची सुनावणी दररोज ‘इन कॅमेरा’ पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या उपस्थितीत पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्ट, वैद्यकीय चाचण्या, लैंगिक चाचणी…
