Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर एकंदरीत आज ज्या बातम्या पाहण्यात आणि वाचण्यात येत आहेत, त्या सगळ्या या परीक्षेबद्दलच आहेत. माझा पाल्य आणि आम्ही गेले दोन वर्षांपासून याची तयारी करत आहोत. खरं तर ही एका विद्यार्थ्याची परीक्षा नसून संपूर्ण कुटुंबच यात गुंतलेले असते. आधी प्रशिक्षण वर्गांचे प्रवेश तेही परगावी, मग त्यासोबत राहण्याची सोय, ते झाले की योग्य खोली भागीदार मिळायला हवा, त्यानंतर त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय बघा, मग वर्गाला जाण्या-येण्याची सोय आणि असे बरेच काही करावे लागते. दहावी झालेली मुले फार प्रगल्भ नसतात, त्यामुळे त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष राहावे म्हणून काही मातांना घर सोडून त्यांच्यासोबत राहावे लागते, तर काही ठिकाणी आजींनी ही जबाबदारी…
आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील, ज्या तुम्ही आत्मविश्वासाने पार पाडाल. तुमच्या कर्तृत्वामुळे तुमचे कौतुक होईल. व्यावसायिक क्षेत्रात घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल आणि घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज मानसिक शांतता आणि संयम राखणे आवश्यक आहे. व्यवसायात प्रगतीचे योग आहेत, परंतु घाईघाईने कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करू नका. जुन्या मित्रांची भेट झाल्यामुळे मन प्रसन्न होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल, ज्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: निळवंडे धरण आणि त्याचे डावे व उजवे कालवे आपण अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केले आहेत. संगमनेर तालुक्याने पाण्यासाठी नेहमीच मोठा संघर्ष केला असून, या धरणातील ६० टक्के पाणी हे संगमनेर तालुक्याच्या हक्काचे आहे. त्यामुळे तालुक्याला त्याचे हक्काचे पाणी आणि न्यायालयाच्या निर्णयानुसार रोटेशन काळामध्ये ११ तास वीज मिळालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. या हक्कासाठी गरज पडल्यास कार्यकर्त्यांसह सर्व शेतकरी आणि नागरिकांना एकत्रित येऊन संघर्ष करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने खांडगाव येथील खांडेश्वर सांस्कृतिक मंगल कार्यालयात आयोजित…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, श्रीरामपूर/संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश जनावरांची बेकायदेशीरपणे वाहतूक आणि क्रूर कत्तल करणाऱ्या टोळीविरुद्ध पोलिसांनी अत्यंत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. संगमनेर शहरातील जमजम कॉलनी येथील तीन सराईत आरोपींवर ‘भारतीय न्याय संहिता २०२३’च्या कलम १११ अन्वये संघटित गुन्हेगारी अंतर्गत वाढीव कलम लावून कडक कारवाई करण्यात आली आहे. श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पोलिसांच्या या कठोर पावलामुळे संगमनेर व परिसरात गो-तस्करी करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात १४ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संगमनेर येथील गल्ली नंबर ६, जमजम कॉलनी भागातील एका…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख तथा जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य व्यंगचित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली. या अनोख्या उपक्रमाला परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार तसेच हौशी व्यंगचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील यांनी व्यंगचित्रांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, व्यंगचित्राच्या माध्यमातून शेतकरी, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांसारख्या ज्वलंत विषयांवर अचूक भाष्य करता येते. एक प्रभावी व्यंगचित्र हजारो लोकांच्या समस्यांना थेट वाचा फोडण्याचे काम करते, हाच बाळासाहेबांचा खरा वारसा आहे. तर विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे यांनी सर्व स्पर्धकांच्या कलागुणांचे कौतुक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक होणार असल्याचे खोटे निरोप देऊन केवळ गर्दी जमवण्यासाठी प्रशासकीय बैठकीला बोलावल्याचा आरोप करत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महायुतीमधील अंतर्गत बेबनाव पालकमंत्र्यांसमोर उघड होऊ नये, यासाठी आमदारांच्या संपर्क कार्यालयातून ही खेळी खेळली गेल्याची भावना या पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली असून, या प्रकारामुळे संगमनेर महायुतीमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. रविवारी सुटीच्या दिवशी संगमनेर तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मालपाणी लॉन्स येथे अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीनंतर महायुतीच्या…
आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडू शकतात, ज्या तुम्ही तुमच्या कौशल्याने सहज पूर्ण कराल. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि जुने रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः आहारावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शांत राहणे फायदेशीर ठरेल. वृषभ आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभेल. तुमच्या बोलण्याच्या प्रभावाने समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वजन वाढेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस उत्तम आहे. न्यायालयीन कामात यश मिळण्याचे संकेत आहेत. घरात एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: साकुर पठार भागातील विविध गावांसह साकुर ते बिरेवाडी आणि रणखांबवाडी ते दिग्रस या रस्त्यांसाठीचा सुमारे १७ कोटी रुपयांचा निधी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात, ऑक्टोबर २०२४ पूर्वीच मंजूर झालेला आहे. नवीन लोकप्रतिनिधींनी यासाठी एक रुपयाचाही निधी आणलेला नसून, त्यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम बंद करावे, अशी टीका जिल्हा परिषदेच्या माजी सभापती मीराताई शेटे यांनी केली आहे. बिरेवाडी येथे पालकमंत्री आणि नवीन लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडलेल्या रस्ते कामांच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर शेटे बोलत होत्या. डिग्रस ते रणखांबवाडी हे काम बाळासाहेब थोरात यांच्या २५-१५ निधीअंतर्गत मंजूर झाले होते. तसेच साकुर ते बिरेवाडी आणि तासकरवाडी ते खंडेरायवाडी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: सोन्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून उधारीपोटी मिळालेला तीन लाख रुपयांचा धनादेश न वटल्याचा दावा करणाऱ्या फिर्यादीला न्यायालयात आपला अधिकृत व्यवसाय सिद्ध करता आला नाही. त्यामुळे न्यायालयाने संशयाचा फायदा देत आरोपीची गुन्हातून सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली आहे. संगमनेर मधील एका महत्त्वपूर्ण फौजदारी खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी चं. प्र. रघुवंशी यांनी हा निवाडा केला. या खटल्याची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, फिर्यादी समीर रमेश महाले (रा. जयभारत चौक, संगमनेर) यांचा सोन्याचा व्यवसाय असून आरोपी संतोष यादवराव काळे (रा. नेहरू चौक, संगमनेर) यांच्याशी त्यांची मैत्री होती. फिर्यादीच्या दाव्यानुसार, आरोपीने २० ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांच्याकडून ४ लाख ५० हजार ५०० रुपये किमतीचे…
गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा देशप्रेमाचे उमाळे येऊ लागले आहेत. राजाने काही सांगावे आणि प्रजेने थुंकी गिळल्याप्रमाणे त्याचा अंमल करावा, असे मजेशीर पण खऱ्या देशभक्ताला उबग येईल असे उद्योग सुरू झाले आहेत. ‘बघूया कोण आधी…’ अशी ही स्पर्धा! या स्पर्धेत स्वतःच्या मागे हुशारीचा मुलामा लावलेला महाराष्ट्र पुढे आहे हे पाहून कपाळावर हात मारावा की काय, असे वाटू लागले आहे. जगभर कोविडची साथ आली, तेव्हाही आपल्या अनपढ प्रजेने तेच केले जे अर्धवट राजाने त्यांच्या डोक्यात भरवले होते. आताही तेच सुरू आहे; फरक इतकाच की राजाचा खोटेपणा पचवण्यासाठी भाजपच्या नेत्यांना जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. तेव्हा ते करायची आवश्यकता पडली नव्हती, कारण…
