Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – कारमधून येत-जात असल्याचे भासवत तिघेजण रस्त्यावरील प्रवाशांना अडवून त्यांच्याकडील मोबाईल, दुचाकीची चोरी करणाऱ्या तिघा जणांच्या टोळीला पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पकडलेले तिघेही आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आहेत. हे आहेत आरोपी: शुक्रवारी (दि. 28 जुलै) रात्री पुणे जिल्ह्यातील नारायणगाव परिसरात पोलिसांनी पकडलेल्या या टोळीकडून मोबाईल आणि त्यांच्या ताब्यातील कार (एम.एच. 15 जी.एफ. 7288) जप्त केली आहे. प्रशांत अण्णासाहेब जाधव (वय 23 वर्ष) सचिन जयराम पवार (वय 30 वर्ष) व शिवतेज चंद्रहर्ष नेहे (वय 26 वर्ष, तिघेही रा. सावरगाव पाट, ता. अकोले, जि. अहमदनगर) अशी पोलिसांनी मोबाईल चोरीत पकडलेल्या तिघांची…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संभाजी भिडे ह्या विकृत व्यक्तीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अतिशय चुकीचे व बेताल वक्तव्य केले आहे. या अगोदरही महात्मा फुले व अनेक महापुरुषांबद्दल जाणूनबुजून सातत्याने वक्तव्य केले असल्याने भिडेंना तात्काळ अटक करावी अशी मागणी छात्र भारती विद्यार्थी संघटनेने गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ज्या महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.अश्या राष्ट्रपिताबद्दल हा माणूस बेताल वक्तव्य करत आहे. हा देशाचा अपमान आहे. समाजात अशा वक्तव्याद्वारे चुकीची माहिती पसरविली जात असून असे निंदनीय प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने तात्काळ भिडेंवर अटकेची कारवाई करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. गृहमंत्र्यांकडील मागणीचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – कोरोना रुग्णाला मेडिक्लेम नाकारणाऱ्या स्टार हेल्थ कंपनीला विमा लोकपालचे अध्यक्ष तथा न्यायाधीश यांनी रुग्णाला पॉलिसी क्लेमची रक्कम एक महिन्याच्या आत देण्याचे आदेश दिले. कंपनीने एक महिन्यात जर रक्कम दिली नाही तर, केस दाखल केल्यापासून दोन टक्के व्याजासहित तक्रारदाराला कंपनीला रक्कम द्यावी लागणार आहे. काय घडले होते: संगमनेर तालुक्यात 2021 मध्ये मोठ्या प्रमाणात कोविड 19 चे संक्रमण झाले होते. या काळात तालुक्यात रुग्णसंख्या मोठी असल्याने रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नव्हते. त्यामुळे कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वाधिकार असलेल्या संगमनेरचे तत्कालीन तहसीलदार अमोल निकम यांनी चंदनापुरी गावातील मुळगंगा रुग्णालयाचे डॉ. विशाल सातपुते यांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष | प्रवीण पुरो सत्ताधारी विचारांच्या लोकांची मानसिकता सत्तेची दहा वर्षं पूर्ण होत असतानाही बदलायचं नाव घेत नाहीए. ऐरागैरा कोणीही कशावरही बोलत असतो. कधी कंगनासारखी अभिनेत्री स्वातंत्र्य 2014 ला मिळाल्याचं वक्तव्यं करते तर कधी कोणी देशाला गांडू लोकांचा देश संबोधतो. कोणी जवाहरलाल नेहरूंच्या नावाने शिविगाळ करतो तर कोणी महात्माजींच्या नावाला दोष लावतो. या दोन व्यक्तींना नाव ठेवलं की त्या व्यक्तीचं सत्ताधारी मंडळी पुनर्वसन करत असतात अशी एक प्रतिमा केंद्रातल्या मोदी सरकारची आणि राज्यातल्या महायुती सरकारची झालेली आहे. या सरकारांचे पाठीराखे असलेले मनोहर कुलकर्णी नामक भिडे गुरुजींनी तोडलेले तारे लक्षात घेता त्यांना आता कशाचीच भीती उरलेली नाही…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – “लोकाभिमुख कामांचा करूनी निपटारा, चला करूया महसूल सप्ताह साजरा” या ब्रीदवाक्याने महसूल सप्ताहाचा शुभारंभ केला जाणार असून महसूल खात्याशी संबंधित सामान्य नागरिकांनी केलेल्या तक्रारी आणि अर्जासंदर्भात काल मर्यादेत निपटारा व्हावा, जनतेला दर्जेदार व चांगली सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 1ऑगस्टच्या महसूल दिनापासून राज्यात महसूल सप्ताहाचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक: दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महसूल सप्ताहाच्या नियोजनासाठी मंत्री विखे पाटील यांनी घेतलेल्या बैठकीला राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरीक्षक, जमाबंदी आयुक्त, प्रांताधिकारी उपस्थित होते. बैठकीत त्यांनी नियोजनाचा आढावा घेतला. विखे…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – बदली झालेल्या ठिकाणी हजर न होणाऱ्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर आता कारवाई करून त्यांची सेवा खंडीत करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. बदलीच्या ठिकाणी हजर न होणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागाने घेतली दखल: स्थानिक प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विखे पाटील म्हणाले, महसूल विभागातील बदल्यांची प्रक्रिया केव्हाच संपली आहे. त्यामुळे बदली झालेल्या ठिकाणी अनेक अधिकारी अद्याप हजर होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याची गंभीर दखल आता महसूल विभागाने घेतली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील ७० टक्के जागा यापूर्वी रिक्त होत्या, त्या सर्व जागांवर आता अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांना दिल्या निलंबनाच्या नोटीस: परंतू काही ठिकाणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरमधील उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांना गुरुवारी (ता.27 जुलै) नवी दिल्लीच्या विज्ञान भवनामध्ये भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. कडलग संगमनेर तालुक्यातील धांदरफळच्या देशमुख मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. माजी राष्ट्रपती स्व. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या आठव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त झालेल्या ‘भारताला जी २० चे अध्यक्षपद कसे मिळाले आणि त्याचे सुवर्ण नियम काय असतील’ या विषयावरील राष्ट्रीय कॉन्क्लेव्हमध्ये सामजिक न्याय मंत्री खा. रामदास आठवले, दिल्लीच्या महापौर शैलजा ओबेरॉय, खा. मोहम्मद इम्रान हुसेन, खा. रामनिवास गोयल, मोहम्मद झाकीर, डॉ. शमीम खान यांच्या उपस्थितीत त्यांना अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज अमरनाथवरुन परतणारी भाविकांची बस आणि नागपूरवरुन नाशिकला जाणाऱ्या खासगी बसची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोन्ही बसचा चुराडा झाला. या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असून तब्बल 25 प्रवासी जखमी झाले आहेत. शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्गावर मलकापूर हायवे क्रमांक सहावर लक्ष्मी नगर जवळील उड्डाण पुलावर घडली. या दोन्ही खासगी प्रवासी बस असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. भीषण अपघातात सहा प्रवासी ठार : हिंगोलीच्या दिशेने जाणारी एम एच 08. 9458 ही ट्रॅव्हल्स बस अमरनाथ येथून तीर्थयात्रा करून परत येत होती. या ट्रॅव्हल्स बसमध्ये 35 ते 40 भाविक होते. तर नागपूरवरून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या गाडी…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – संभाजी भिडे नावाचा इसम राष्ट्रपित्यावर टीकाटिप्पणी करतो, संपूर्ण देशासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारने त्याचा आजच बंदोबस्त करावा आणि त्या संदर्भात सभागृहात निवेदन करावे, मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. थोरात पुढे म्हणाले, संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. संभाजी भिडे वारंवार असं बोलतो, त्याला पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी तो वारंवार अशी विधाने करतो?…
कृषी सेवकांचे मानधन देखील सहा हजार रुपयांवरून 16 हजार रुपये महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ एवढ्या पुरते आमच्या सरकार काम करत नसून आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहोत, आमचे वर्क फ्रॉम होम नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये इर्शाळवाडी येथील घटने संदर्भात माहिती देताना सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. शिंदे म्हणाले, इर्शाळवाडी दरडग्रस्तांची कंटेनरमध्ये व्यवस्था केली आहे. भूखंड बघितला असून त्यांची कायम सोय करण्यात येणार आहे सिडकोद्वारे त्यांना आम्ही घर बांधून देणार आहोत.…
