Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज आळंदी :- शिक्षणाचा मूल्याधिष्ठीत विचार हा संत साहित्यात सातत्याने प्रतिबिंबीत झाला आहे. समाजाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. मात्र शिक्षण अधिकाधिक मूल्याधिष्ठीत होण्यासाठी संताच्या विचारातील शिक्षण विषयक दृष्टीकोन जाणून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक शिवाजीराव तांबे यांनी केले. चपराक प्रकाशनच्यावतीने संदीप वाकचौरे लिखित ‘शिक्षणाचे पसायदान’ या पुस्तकाच्या आळंदी येथे झालेल्या व्दितीय आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्य शासनाचा कंठसंगीत पुरस्कार विजेते जेष्ठ संगीतकार कल्याण गायकवाड, सुप्रसिध्द गायिका कार्तिकी गायकवाड, माजी शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी, चपराक प्रकाशनचे प्रमुख जेष्ठ संपादक घनश्याम पाटील, रवींद्र कामठे, अरूण कमळापूरकर, आळंदी देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी…
आरोपींनी केला लाकडी दांडके, फायटर, चॉपर, रॉड, तलवारीचा वापर; सतर्क पोलिसांमुळे परिस्थिती नियंत्रणात… गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पिकअप मधून जाताना शहरातील जोर्वे नाका येथे हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून पिकअपमधील लोकांना टोळक्याकडून मारहाण करण्यात आली. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून उपचारानंतर घरी परतत असणाऱ्या या लोकांवर पुन्हा शंभर ते दीडशे लोकांनी “ये वही लोग है जो अपने खिलाफ पोलीस स्टेशन को तक्रार देने गये थे, आज इन्हे जिंदा घर नही जाने देंगे” असे म्हणत तलवार, चॉपर, फायटर, लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने हल्ला करीत त्यांना जिवे मारण्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. या हल्ल्यात आठ जण…
महाराष्ट्र संवाद न्यूज स्मिता मांजरे नावाची एक मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबातील मुलगी. बारावी झाल्यावर तिला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. पण घर थोडे जुन्या वळणाचे, काय करायचे मुलीला इतके शिकवून, असा विचार करून जवळच्याच कॉलेजमध्ये तिला बी.ए.साठी प्रवेश घेऊन दिला. या युवतीला थोडे वाईट वाटले, पण आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचे आणि पुढे जायचे हा तिचा मूळ स्वभाव!! बीए करतांना भरपूर वेळ मिळायला लागला. अभ्यास थोडासा असायचा, त्यातून मग खेळाची आवड निर्माण झाली. सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. अभाविप, छात्र युवा संघर्षवाहिनी यांचे आंदोलने कार्यक्रम यात ती सहभागी होऊ लागली. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर काहीतरी व्यवसायाभिमुख शिक्षण घेतले पाहिजे असे तिच्या मनात…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जीवनाचे ध्यासपर्व मानून निळवंडे धरण आपण पूर्ण केले. अनेक अडचणीवर मात करून कालव्यांची कामे मार्गी लावली. रात्रंदिवस काम सुरू ठेवून ऑक्टोबर 22 मध्येच दुष्काळी भागाला पाणी द्यायचे होते. सरकार बदलले त्यामुळे कामे मंदावली मात्र आता दहा टीएमसी पाणी शिल्लक असताना श्रेयवादासाठी उशीर न करता तातडीने पाणी सोडले पाहिजे. धरणाचे काम कोणी केले हे सर्वांना माहीत असून नशिबाने तुम्हाला संधी मिळाली आहे तर पाणी सोडण्यास उशीर का केला, असा सवाल निळवंडे धरणाचे जनक काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला. बुधवारी 31 मे निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी घेतली जात आहे. आमदार थोरात यांनी गेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३१ मे २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. पाच तालुक्याचे लाभक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे, अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या कार्यस्थळावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी अधिकारी-कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जलसंपदा विभागाचे अभियंता अरूण नाईक, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्रीनिवास वर्पे, कृषी विभागाचे गायकवाड, माजी मंत्री मधुकर पिचड, वैभव पिचड, सिताराम भांगरे,…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर-अकोलेच्या पोलीस उपअधीक्षक पदाचा पदभार भुसावळ येथून बदलून आलेल्या सोमनाथ वाकचौरे यांनी शनिवारी सायंकाळी स्वीकारला. संगमनेरचे प्रभारी डीवायएसपी संजय सातव यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाची सूत्रे घेतली. दीर्घकाळ रिक्त असलेल्या या पदावर गृह विभागाने वाकचौरे यांची नियुक्ती केल्याने त्यांचा येथील कार्यकाळ कसा राहतो हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. संगमनेरचे तत्कालीन डीवायएसपी राहुल मदने यांची नागपूरला बदली झाल्यापासून संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक पद रिक्त होते. या पदाचा अतिरिक्त पदभार शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांच्याकडे सोपविण्यात आला होता. संगमनेरची नियुक्ती निश्चित झाल्यानंतर वाकचौरे यांनी शनिवारी सायंकाळी नवीन नगर रस्त्यावरील प्रशासकीय भावनातील आपल्या कार्यालयात प्रभारी डीवायएसपी संजय…
महाराष्ट्र संवाद न्यूज एका बांधकामाच्या साईटवर कामगारांची काही मुले खेळत होती. वाॅचमनचा छोटा पोरगा (साधारण वय वर्ष आठ) एका कोपर्यात बसून ईतरांचा पकडा पकडीचा खेळ बघत होता. कुणी धडपडले तर टाळ्या वाजवत होता, हसत होता. पण खेळत नव्हता. मी त्याला विचारले… ” बारक्या ! तू का रे खेळत नाहीस ?” त्याने खेळावरील नजर न हटवता मला ऊत्तर दिले . “आय नको म्हनत्या…” “आई खेळायला कशाला नको म्हणेल ? तूच काहीतरी आगाऊपणा करत असशील !” त्याने ऊत्तर देण्याचे टाळले. माझ्याकडे एक कटाक्ष टाकून पुन्हा खेळ बघत बसला. मलाच त्याला चिडवण्याची खुमखूमी गप्प बसू देईना…. “मला माहीती आहे, आई तूला खेळायला का…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष लेख व्यवस्थेला पोखरून स्वत:चे खिसे भरणार्या पांढर्या पोषाखातल्या नव्या डाकूचा सीबीआयने नुकताच शोध लावला आहे. या डाकूने त्याच्या इलाख्यातील जंगलांची लयलूट केलीच, पण आपल्या विरोधकांना नामोहरम करण्यासाठी त्याला शहरात घुसण्याचा मार्ग भाजपने आखून दिला. विरोधी पक्षांना त्रासदायक ठरलेल्या चार यंत्रणांमधील नाकोर्टिक ही आणखी एक संस्था बनली. आता अति झाल्यावर या डाकूवर छापेमारी सुरू झाली आहे. पांढर्या डगल्यातला हा इसम यंत्रणेला पोखरतो आहे, असा जाहीर आरोप करणार्या नवाब मलिक यांना देशद्रोही ठरवून देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अतिआत्मविश्वासूंनी या डाकूला साथ दिली. खर्याचं खोटं करणार्या या इसमाचं नाव आहे समीर वानखेडे. एका महत्वपूर्ण खात्याच्या विभागीय जबाबदारीतून समीरचा ‘अमीर’…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – पुण्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची पोट निवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशी माझी आतल्या गोटातील माहिती असल्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सांगितले. बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यावर अजित पवार यांनी भाष्य करत या चर्चांना दुजोरा दिला आहे. टिंबर मार्केटमधील गोडाऊनमध्ये लागलेल्या आगीमुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचा आढावा आज अजित पवार यांनी घेतला. आगीच्या घटनेची चौकशी व्हावी, तसेच आगीत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे…
महाराष्ट्र संवाद न्यूज घारगाव – गावाकडे साकुर येथे घरी आलेल्या दोन जावांमधील वादाची परिमिती नवरा-बायकोने महिलेला मारहाण करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करत तिचा विनयभंग करण्यापर्यंत पोहोचली. वादामध्ये महिलेच्या बोटालाही चावा घेऊन तिच्या अंगावरील कपडे फाडण्यात आले. संगमनेरच्या पठार भागात साकुर येथे गुरुवारी हा प्रकार घडला. पीडित महिला आपल्या पतीसह गावी साकुर येथे राहावयास असून पतीच्या नोकरी निमित्ताने चिंचवड पुणे येथे रहावयास आहे. अधून मधून कुटुंबीयासह पीडित महिलेचे आपल्या पतीच्या गावी साकुर येथे येणे-जाणे असते. साकुर येथील घरी महिलेचा दीर आपल्या कुटुंबीयासह रहावयास आहे. गावाकडे आल्यानंतर हे सर्वजण एकत्र राहत असत. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेचे पती बाहेरून येताना…
