Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायर, निमा संगमनेर आणि माधवबाग आयुर्वेद कार्डियाक क्लिनिक, संगमनेर संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त “विन डायबेटीस भव्य वाकेथॉन (चालण्याची स्पर्धा) स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले होते. लहानग्यांपासून तर अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच या स्पर्धेत सहभाग घेऊन लायन्स क्लब राबवित असलेल्या विन डायबेटीज या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. वैज्ञानिक शास्त्रानुसार दैनंदिन ३ किलोमीटर चालल्याने मधुमेह असलेले रूग्ण त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकतात. समाजामध्ये चालण्याच्या व्यायामविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वय ३० वर्ष ते ९२ वर्ष वय असलेले स्पर्धेक सहभागी झाले होते. ५०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी या…

Read More

विसावं शतक मागे टाकून 21 व्या शतकाच्या सुरुवातीलाच माहिती तंत्रज्ञान उदयास आले आणि मानवी जीवनाची स्पर्धा तंत्रज्ञानाशी सुरू झाली. त्यामुळे स्पर्धा आणि गतीच्या विळख्यात मानवी जीवन अडकले. अनेक बदलांना सामोरे जात संभ्रमांच्या वर्तमानातून मार्ग काढत संघर्ष आणि अनेक स्पर्धांचं आव्हान पुढच्या पिढ्यांना झेलायची आहेत. खरंतर अनेक स्वप्न घेऊन आपण एकविसाव्या शतकात प्रवेशिलो. परंतु माध्यमक्रांतीमुळे संधीसोबत प्रचंड अशा संघर्ष आणि स्पर्धेच्या युगात त्या स्वप्नांची पडझड होतांनाचा हा काळ म्हणजे कोलाज ही कादंबरी होय. डॉ. अशोक लिंबेकर यांनी आपल्या सभोवतालचा काळ जोखताना भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांचा स्वर एकत्र करत समाजवास्तवाचा आरसा आजच्या तरुणांसमोर ठेवला आहे. कादंबरीतील नायक हा ग्रामीण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ○ कृषी कमी पावसाच्या प्रदेशामध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबास महत्व आहे. त्यामुळे या प्रदेशामध्ये पाटाद्वारे पाणी देणे शक्य नसते. अशा प्रदेशामध्ये सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाण्याची उपलब्धता दिल्यास उत्पन्नामध्येही वाढ होते आणि पाण्याचीही बचत होते. याच उद्देशाने सूक्ष्म सिंचन म्हणजेच ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेती क्षेत्राला पाण्याची उपलब्धता देण्याच्या उद्देशानेच ‘प्रती थेंब अधिक पीक योजना’ राबविण्यात येत आहे. पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाखालील क्षेत्र वाढविणे. अचूक पाणी व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे. पिकांची व्याप्ती वाढविणे, सूक्ष्म सिंचन पद्धतीच्या वापरास चालना देणे. कृषी आणि फलोत्पादन विकासासाठी सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा प्रचार, विकास आणि प्रसार करणे. कुशल आणि अकुशल व्यक्तींसाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज कोविड कालावधीनंतर वर्क फ्रॉम होम आणि विद्याथ्यांना अभ्यासासाठी भ्रमणध्वनी देणे आवश्यक झाले आहे. एकदा स्मार्टफोन हातात आला की त्यावर इंटरनेटच्या माध्यमातून येणारी माहिती व त्यातून कळत-नकळत घडलेल्या सायबर चुकांचा मोठा परिणाम भोगावा लागू शकतो, असे प्रतिपादन संगणक तज्ज्ञ वैशाली खैरनार यांनी केले. दत्त विद्यालय, जवळे कडलग येथे ‘सायबर क्राइम’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरात खैरनार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग, व्यासपीठावर मुख्याध्यापक सूर्यकांत सुर्वे , स्थानिक स्कूल कमिटी सदस्य भास्करराव शेळके उपस्थित होते. खैरनार म्हणाल्या, आपले चुकून पाठवलेले फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल केल्याची धमकी दिल्यास किंवा तसे केल्यास त्याविरुद्ध आयटी अॅक्ट…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देणार्‍या महेश नागरी सहकारी पतसंस्थेला गेल्या आर्थिक वर्षात २ कोटी ११ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. कोविड संक्रमणात अडचणीत आलेल्या व्यापार क्षेत्राला नवसंजीवनी देण्याबरोबरच संस्थेने आजपर्यंत सुमारे ७५ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले असून ही रक्कम मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २७ टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या वर्षभरात संस्थेने अतिशय पथदर्शी कारभार केल्याने संस्थेच्या ठेवींमध्येही जवळपास ३६ टक्क्यांनी वाढ झाली असून ठेवींचा आकडा १०० कोटींच्या पार गेल्याची माहिती संस्थेचे चेअरमन सीए कैलास सोमाणी व व्हा. चेअरमन योगेश रहातेकर यांनी दिली. संगमनेरातील पतसंस्था क्षेत्रात नावाजलेल्या महेश नागरी पतसंस्थेने स्थापनेपासूनच शहरातील व्यापार-उदीमाची भरभराट…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज, शिर्डी उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत विश्वासघाताचे राजकारण केले आहे, अशा विश्वासघाती राजकारणाला भारतीय जनता पक्षात अजिबात थारा नसल्याने भाजप व ठाकरे पुन्हा एकत्र येण्याबाबत शंका असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. संघटनात्मक दौऱ्यानिमित्त आलेले बावनकुळे शिर्डीमध्ये माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, जाहीर सभेत एखाद्या विषयावर टीका करण्यास हरकत नाही मात्र आम्ही कोणावर व्यक्तिगत टीका करत नाही. जाणीवपूर्वक टीका टिप्पणी योग्य नाही. शरद पवार, अजित पवार सरकारवर टीका करतात तो त्यांचा अधिकार आहे. भाजप आणि शिवसेनेचे काम बघून २०२४ मध्ये अनेकजण आमच्याकडे उड्या मारतील. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळी सभागृहात अर्थसंकल्प वाचत होते, त्यावेळी विरोधकांचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अयोध्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येमध्ये भव्य दिव्य महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची मोठी घोषणा केली आहे, प्रभु रामाच्या आशीर्वादाने आम्हाला शिवसेना नाव आणि चिन्ह मिळालं असल्याचं सांगत यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका देखील केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि उत्तर भारतीय वेगळे नसल्याचे सांगत विरोधकांवर निशाणा साधला आहे. नांव न घेता राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंनी टीका केली. ते म्हणाले, देशाबाहेर जाऊन भारताची बदनामी करणारे देशद्रोही आहेत. आपलं सरकार नसतं तर साधूंच्या जीवाला धोका असता. अयोध्या दौऱ्याला नावं…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे अदानी उद्योग समूहाच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला लक्ष्य करत असताना अदानी उद्योग समूहाच्या कथित गैर कारभाराबाबत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानावरुन सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले जात असताना आता पवार यांच्या समर्थनार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्या अलका लांबा यांनी शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदाणी यांचा एकत्र फोटो ट्विट करत पवारांवर टीका केली होती. त्यावरुन आता देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक होत जोरदार टीका केली आहे. लांबा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उद्योगपती गौतम अदानी यांचा फोटो ट्विट केला आहे. “भित्रे, स्वार्थी लोक स्वत:च्या…

Read More

रविवार विशेष लेख उध्दव ठाकरे बोलले काय आणि राज्याचे गृहमंत्री त्यावर उत्तरले काय? भलताच कॉन्फिडन्स गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा आलेला दिसतो आहे. मंत्री म्हणून असलेल्या जबाबदारीची जाणीव कोण्या नेत्याने एका फालतू शब्दाने करून दिली म्हणून थेट काडतूसं घालण्याची भाषा गृहमंत्र्याने वापरावी? महाराष्ट्र इतका खाली आलाय? पोलीस आपल्या हातात असल्याचा असा फायदा कोणाला घेता आला नाही. फडणवीसांनी तो गेल्या काही वर्षांमध्ये घेतला. ते कोणत्या थराला जाऊ शकतात हे सार्‍या देशाने पाहिलं. इतकं करून ते थांबत नाहीत आपल्या कृत्याची उघड भलामणही ते करतात आणि त्या निमित्ताने एखाद्याला खंडणीखोर आणि दुसर्‍याला देशद्रोहीही संबोधतात. सत्ता बेफाम सत्तेतला गृहमंत्री असा बेदरकार झालेला कोणी कधी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज | शिर्डी अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेली शिर्डी विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधाची चाचणी शनिवारी (८ एप्रिल) रात्री यशस्वी झाली. २११ प्रवासी घेऊन दिल्लीहून निघालेले इंडिगो एअरलाईन्सच्या पहिल्या प्रवासी विमानाने रात्री ८ वाजून १० मिनिटांनी शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग केले. त्यानंतर रात्री नऊ वाजता २३१ प्रवाशांना घेऊन या विमानाने दिल्लीच्या दिशेने प्रयाण केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या नाईट लॅडिंग सुविधेची आज खऱ्या अर्थान चाचणी यशस्वी झाली असल्याचे मानले जात आहे. येत्या पंधरा-वीस दिवसांत या विमानतळावर नाईट लँडिंगची नियमित सेवा सुरू होणार आहे‌. २३२ प्रवासी क्षमता असलेल्या या विमानात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांचा शंभर टक्के प्रतिसाद लाभला. शिर्डी…

Read More