Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर महाविद्यालयाच्या संस्कृत संशोधन केंद्रातील विद्यार्थिनी आणि आश्वी खुर्द येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतनच्या पर्यवेक्षिका माधुरी सातपुते यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी मिळाली आहे. महाविद्यालयाच्या माजी संस्कृत विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉ. रूपाली कापरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना हे यश मिळाले. त्यांचा महाविद्यालयाच्यावतीने गौरव करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. रवींद्र तासीलदार, मार्गदर्शिका डॉ. रूपाली कापरे, संस्कृत विभागप्रमुख डॉ. अनिरुद्ध मंडलिक, महाविद्यालयाचे कुलसचिव संतोष फापाळे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. अरुण गायकवाड म्हणाले, सातपुते ह्या लोणी खुर्द येथील प्रवरा कन्या विद्या मंदिर मध्ये 25 वर्षापासून संस्कृत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. ऑगस्ट 2021 पासून…
मुंबई : महाराष्ट्र संवाद न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. येत्या काही दिवसात मोठा राजकीय स्फोट होणार असल्याच्या शक्यता वर्तविला जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या सोशल मीडिया प्रोफाइल वरून राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख वगळण्यात आला असून हे प्रोफाइल पूर्णतः रिकामे ठेवण्यात आले आहे. यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क सुरू झाले आहे. शिखर बँक प्रकरणाच्या आरोप पत्रातून अजित पवार यांचे नाव वगळल्याच्या बातम्या आल्यानंतर अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. अजित पवारांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर या चर्चा आणखी वाढल्या आहेत.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर वकील संघाच्या कार्यकारीणीसाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. उदयसिंह ढोमसे पाटील निवडून आले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार ॲड. अतुल आंधळे यांचा ३६ मतांनी पराभव केला. वकील संघाच्या कार्यकारिणी निवडण्यासाठी सोमवारी (१७ एप्रिल) संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात मतदान झाले. ३६२ वकिलांनी निवडणुकीत मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मावळते अध्यक्ष ॲड. सुहास आहेर यांनी काम बघितले. ढोमसे आणि आंधळे यांच्यात अध्यक्षपदासाठी सरळ लढत झाली. यात ढोमसे यांना १९८ तर आंधळे १६२ यांना मते मिळाली. वर्षभरासाठी असलेल्या कार्यकारिणीमध्ये यावर्षी कोणाला संधी मिळते याची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा निवडणूक निकाल आल्यानंतर संपली असून नवीन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र…
महाराष्ट्र संवाद न्यूज जनावरांचा रस्ता का अडवीला, अशी विचारणा करणाऱ्या सख्या भावाच्या डोक्यात मुलाच्या मदतीने खोऱ्याने मारत त्याचा खून करणाऱ्या बाप-लेकाला अकोले पोलिसांनी अटक केली. अकोले तालुक्यातील केळी कोतुळ येथील गोडेवाडीमध्ये ही घटना घडली. मनोहर सावळेराम लेंभे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून मयताची पत्नी सोनाबाई मनोहर लेभें (वय ४०) रा. गोडेवाडी, केळी-कोतुळ ता. अकोले यांनी या संदर्भात अकोले पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश सावळेराम लेंभे, राजाराम उर्फ राहुल सुरेश लेंभे या बाप-लेका विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी (ता. १६ एप्रिल) सायंकाळच्या वेळी शेतातील जनावरे दीर सुरेश सावळेराम लेंभे यांच्या रिकाम्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली : दिल्लीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतःच ट्विट केलेला एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. केजरीवाल यांनी आज भर विधानसभेत आमदारांना एक गोष्ट ऐकवली. मोदींच्या डिग्री प्रकरणावरून केजरीवाल यांनी या गोष्टीद्वारे त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधल्याचं म्हटलं जातंय. केजरीवाल म्हणाले, एक चौथी पास राजा होता. त्याने एमएची खोटी डिग्री तयार केली. माहितीच्या अधिकाराखाली याची माहिती मागितली तर लोकांवर त्याने २५-२५ हजार रुपयांचा दंड ठोठवला. एक दिवस रात्री ८ वाजता राजाने सगळ्या चलनी नोटा बंद केल्या. देशात हाहाकार माजला. लोकांचे धंदे बंद पडले. लोकांकडे रोजगारही उरला नाही. त्यानंतर शेतकरी कायदे केले. मूर्खपणाने या राजाने ते तीन काळे कायदे मंजूर…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरच्या अर्थकारणात महत्त्वाचे योगदान असलेल्या राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजकुमार गांधी यांची तर उपाध्यक्षपदी आनंद दरडा यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष कांतीलाल गांधी, उपाध्यक्ष प्रितेश पारख यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याने पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम उपनिबंधक कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला होता. यासाठी सोमवारी सहकार अधिकारी ए. एस. शेख यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीदरम्यान अध्यक्षपदासाठी राजकुमार गांधी आणि उपाध्यक्षपदासाठी आनंद दरडा यांनी आपले अर्ज दाखल केले होते. अध्यक्षपदी राजकुमार गांधी व उपाध्यक्षपदी आनंद दरडा या दोघांच्याही निवडी बिनविरोध पार पडल्या. अध्यक्षपदासाठी राजकुमार गांधी यांचे नाव…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमध्ये येत्या शनिवारी २२ एप्रिलला अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मालपाणी उद्योग समुहाच्यावतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मागील २५ वर्षांपासून सुरु असलेल्या या परंपरेत यंदा संगमनेर तालुक्यातील २५ जोडपी विवाहबद्ध होतील. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून जवळपास दहा हजार पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती मालपाणी उद्योग समुहाचे संचालक मनीष मालपाणी यांनी दिली. मालपाणी उद्योग समुहाचे अध्वर्यू स्वर्गीय ओंकारनाथ व स्वर्गीय माधवलाल मालपाणी यांनी १९९७ साली या उपक्रमाची सुरुवात केली. लोकहिताचा हा उपक्रम जनतेच्या उस्त्फुर्त प्रतिसादाने रौप्यमहोत्सवी ठरला आहे. गेल्या अडीच दशकांत या सोहळ्याच्या माध्यमातून बाराशेहून अधिक परिवार एकमेकांशी जोडले गेले. अवघ्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज वादळामुळे शेतामध्ये तुटून पडलेल्या वीजवाहक तारेचा धक्का लागल्याने कृषी व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे रविवारी (१६ एप्रिल) सकाळी घडली. विजय साहेबराव पवार (वय ४६) असे मृत व्यावसायिकाचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विजय पवार हे रविवारी सकाळी आपल्या शेतामध्ये डाळिंब बागेला औषध मारत होते. शनिवारी झालेल्या वादळामुळे वीजवाहक तारा तुटून त्यांच्या शेतात पडलेल्या होत्या. या तारेतून वीज प्रवाह सुरू असल्याने पवार यांचा झालेला धक्का लागला. त्यामुळे जोराचा शॉक बसल्याने ते जागीच कोसळले. त्यामुळे त्यांना तातडीने संगमनेरमध्ये उपचारासाठी खासगी रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू…
संगमनेर – महाराष्ट्र संवाद न्यूज तू फिर्यादीशी लग्न केलेस काय, तू त्याच्याजवळ झोपतेस अशी विचारणा करत दोघांनी तिचा ब्लाउज फाडून विनयभंग केला तर फिर्यादी घरी परतल्यानंतर त्याला दारातच अडवून बांबू आणि कोयत्याने मारहाण करत जखमी केल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सात आरोपीं विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी कामानिमित्ताने संगमनेर येथे आलेला होता. त्याचवेळी आरोपींनी गैर कायद्याची मंडळी एकत्रित जमवत फिर्यादीच्या घरी जाखुरी येथे जात फिर्यादीकडे कामास असलेल्या महिलेस तू फिर्यादीशी लग्न केलेस काय, तू त्याचे जवळ झोपतेस, असे म्हणत दोघा आरोपींनी तिचा ब्लाउज फाडून…
महाराष्ट्र संवाद | रविवार विशेष गौतम अदानींना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे, पूर्वी टाटा, बिर्ला यांचीही अशीच नावं घेतली जायची, या प्रकरणाची जेपीसी चौकशीची आवश्यकता नाही, जेसीपीत सत्ताधाऱ्यांचा भरणा असतो, मोदींना त्यांच्या शिक्षणावरील मुद्यावर जाणीवपूर्वक अडवलं जात आहे. ही सारी वक्तव्य बारामतीच्या पवार कुटुंबाकडून उघडपणे येऊ लागली तेव्हाच पाल चुकचुकली. काहीतरी विपरीत घडतं असल्याची चाहूल लागली. देश मोदींच्या नावाने खडे फोडत असताना बारामतीच्या शरद पवारांना आणि त्यांचे पुतणे अजित पवारांना अदानी आणि मोदींचं भरतं आलेलं पाहून सारा देश चकित झाला. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात हे दोघं नवा अध्याय तयार करायला निघाले आहेत असा साऱ्यांचा समज होता. त्यांना वाटलं लोक आपल्या…
