Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज कोरोनाच्या संकट काळात राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविकांनी अत्यंत चांगले काम केले आहे. त्या तुटपुंज्या मानधनावर काम करत असून त्यांची मानधन वाढ तात्काळ करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंगणवाडी सेविका व आशा सेविकांचे प्रश्न मांडताना ते म्हणाले, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविका ह्या ग्रामीण व दुर्गम भागात अत्यंत चांगले काम करत आहे. कोरोनाच्या संकट काळात या सर्वांनी चांगले काम केले. हे सर्व राज्याने आणि देशाने पाहिले आहे. त्यांच्या मानधनवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे. मानधन वाढीबाबत सर्व विधानसभेतील सदस्य अनुकूल आहेत. या…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अंगावर स्विफ्ट कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करीत वकिलाला बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी वकिलाला गुप्तीचा धाक दाखवत बोटातील सोन्याची अंगठी लंपास केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी संगमनेर न्यायालयाच्या परिसरात घडला. यासंदर्भात संगमनेर न्यायालयातील वकील ॲड. प्रसाद कडलग यांच्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अनिल पांडुरंग गुंजाळ, प्रवीण (पूर्ण नाव माहिती नाही) सह आणखी चार जणांवर दरोडा, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग तीन दिवसाच्या वादाची परिणती जिवे मारण्याचा प्रयत्न आणि मारहाणीत झाल्याने संगमनेरमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी, ॲड. प्रसाद कडलग हे संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात वकिली करत असून…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे येथे झालेल्या नवव्या राजस्तरीय स्पोर्टस डान्स अजिंक्यपद स्पर्धेत संगमनेरच्या गीता परिवार संचालित संस्कार बालभवनच्या विद्यार्थ्यांनी ७ सुवर्ण आणि ५ रौप्य अशा १२ पदकांची कमाई केली आहे. याशिवाय स्पर्धेतील उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर उपविजेतेपदही पटकाविले आहे. सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि सिनिअर गटातील विद्यार्थ्यांसाठी ही राज्यस्तरीय स्पोर्टस डान्स अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. २१ वर्षांखालील मुलींच्या शास्त्रीय नृत्य प्रकारात ‘दशावतार’ हे शास्त्रीय नृत्य सादर करून संस्कार बालभवनच्या समूहाने सुवर्णपदक मिळविले. या समुहात मिताली भडांगे, आदिश्री झंवर, रिया साकी, मनसा कालडा, आर्या भालेराव, भक्ती रत्नपारखी व अनुष्का जाधव यांचा समावेश होता. याच वयोगटातील मुलींच्या शास्त्रीय लोकनृत्य प्रकारात ‘झूम झूम’ हे…
महाराष्ट्र संवाद न्यूज पिंपरी चिंचवड पोट निवडणुकीत आघाडीचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे तब्बल 44 हजार मते घेत आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या पराभवास कारणीभूत ठरले आहे या मतदारसंघातून पोटनिवडणुकीत भाजपाच्या अश्विनी जगताप निवडून आल्या असल्या तरी राहुल कलाटे यांचे डिपॉझिट जप्त झाले. या मतदारसंघात पराभूत झालेले काटे यांनाच फक्त आपले डिपॉझिट वाचविता आले असून तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या कलाटे यांच्यासह 28 पैकी 26 जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या नाना काटे यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग बंद झाल्याची चर्चा आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांना एकूण मतदानाच्या एक षष्ठांश मते मिळणे आवश्यक असते. मात्र काल झालेल्या मतमोजणीमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई आपल्या पहिल्याच भाषणात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी उद्योग, आरोग्य, शिक्षण आणि युवकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर बोट ठेवले. चांगल्या गोष्टींचे कौतुक करताना त्यांनी काही त्रुटी दाखवून देत त्या दूर करण्याची सरकारला विनंती केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेताना तांबे म्हणाले, राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये ७५ हजार पदांसाठीच्या नोकरभरतीचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र ती कधी होणार, कशी होणार, किती वेळात होणार याबद्दल कुठेही उल्लेख नव्हता. ‘शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होताना दिसत नाही. २ लाखांपेक्षा जास्त जागा रिक्त आहे. मात्र ७५ हजार जागांच्या भरतीने किती युवकांना न्याय मिळणार आहे? सरकारला विनंती आहे की कोविड काळात विद्यार्थी परीक्षा देऊ…
महाराष्ट्र संवाद न्यूज सध्या राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. सोयाबीन, कापूस, भाजीपाला उत्पादकांसह कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. ज्या-ज्या वेळेस शेतकरी अडचणी आला त्या-त्या वेळेस सरकारने मदत करण्याची परंपरा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीबाबतचे स्पष्ट धोरण सरकारने त्वरित जाहीर करावे, अशी आग्रही मागणी माजी मंत्री आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बोलताना आमदार थोरात म्हणाले, भाजीपाला, कापूस, सोयाबीनसह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. नाशिकसह इतर तालुक्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. कांदा पिकासाठी उत्पादनासाठी खर्च ही मोठा आहे. यामुळे सध्या मातीमोल परिस्थिती निर्माण झाली…
महाराष्ट्र संवाद न्यूज महाराष्ट्रामध्ये पुण्यात कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने एक जागा गमावली असताना दुसरीकडे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या पक्षाने महाराष्ट्राबाहेर नागालँडमध्ये भरारी घेतली आहे. आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे दोन उमेदवार नागालँडच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. केंद्रीय मंत्री असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्रात एकही आमदार नाही. तरी देखील राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत असलेल्या आठवले यांनी आपल्या पक्षाचे नागालँडमध्ये खाते खोलले आहे. आठवले गटाचे थेट नागालँडमध्ये आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे आठवले यांची पुन्हा एकदा सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. नागालँडच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला असताना चिंचवडमध्ये मात्र महाविकास आघाडीतील फुटीमुळे भाजपला मोठे यश मिळविता आले. चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तब्बल ३६०९१ मतांनी विजयी झाल्या आहेत. कसबा पेठ मतदार संघातील आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कुटुंबातील उमेदवार न देता भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. याचा मोठा फटका भाजपला बसला असताना चिंचवड मध्ये मात्र भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पिंपरी चिंचवड मधून निवडणूक लढविण्यासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज आश्वी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या मध्यान्ह भोजनाची प्रभावी अंमलबजावणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने सुरू झाली असून संगमनेर तालुक्यातील आश्वी मधील ३१ गावामधील नोंदणीकृत ५ हजार ९१६ बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळण्यास प्रारंभ झाला आहे. असंघटीत कामगारांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ३२ विविध योजनांची सुरूवात करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने इमारत व बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन देण्याची योजना महत्वपूर्ण मानली जाते. ग्रामीण भागातील इमारत व बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ मिळावा म्हणून कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून कार्यवाही सुरू झाली असून शिर्डी मतदार संघाने यामध्ये आघाडी घेतल्याचे दिसून येते.…
महाराष्ट्र संवाद न्यूज पतसंस्थेच्या थकीत कर्जदारांना कर्ज वसुलीची नोटीस बजावणीचे कलम 101 प्रमाणे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात पंधरा हजार पाचशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे. लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणारे तक्रारदार हे पाथरे बुद्रुक ता. सिन्नर जि. नाशिक येथील साई लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत वसुली विभागात काम करतात. थकीत कर्जदारांवर संस्थेमार्फत कलम 101 प्रमाणे कारवाई करण्यासाठी सहकार विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक असते. सिन्नरच्या सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक एकनाथ प्रताप पाटील यांनी या प्रमाणपत्रासाठी एका नोटीस करिता प्रत्येकी दीड हजार रुपयांची मागणी केली होती. सतरा नोटीस करिता पाटील यांनी पंचवीस हजार पाचशे…
