Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज बहुतांशी गुन्ह्यामध्ये पोलिसांकडून ५०४, ५०६ हे कलम लावले जाते. अशाच एका कलम ५०६ अंतर्गत प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. यामुळे कडू यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषदेमध्ये २ नोव्हेंबर २०१५ मध्ये आंदोलन करण्यात आले होते. अपंग निधी अखर्चित राहिल्याने प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आक्रमक आंदोलन केले होते. या आंदोलना दरम्यान आमदार बच्चू कडू आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर या संदर्भात प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह प्रहारचे मयूर काकडे बलराज रणदिवे बाळासाहेब कसबे आणि चंद्रकांत जाधव या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज क्रिप्टोचा खेळ संपलेला आहे, कोणतीही गुंतवणूक असो त्याला नियमन, कायदे आणि सरकारी नियंत्रण आवश्यक असते. क्रिप्टो हा एक सट्टा आहे, त्यात गुंतवणूक करण्याऐवजी सामान्य व्यक्तीला कोट्याधीश करण्याची क्षमता असलेल्या म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करा व आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत असलेल्या भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हा असा सल्ला अन्फ्फि (AMFI) एमएफडी सुनील कडलग यांनी दिला. नारायणगाव येथील हॉटेल सचिन एक्झिक्यूटिव्ह कॉन्फरन्स हॉलमध्ये जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे शनिवारी आयोजित नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे व रोटरी क्लबचे प्रेसिडेंट डॉ. हनुमंत भोसले होते. डॉ. निलेश थोरात, एनजे वेल्थचे शुभम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल आहे. आयोगाच्या या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधून क्रिया प्रतिक्रियांचा महापूर आलेला असतानाच विरोधी पक्ष नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेला राज ठाकरे यांनी आपल्या ठाकरे शैलीत उत्तर दिले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर भाष्य करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उदाहरण दिलं होत. ते म्हणाले होते, राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक आमदार आहे. या एकमेव आमदाराने जर उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा माझा पक्ष, आणि इंजिन हे निवडणूक चिन्ह देखील माझेच असल्याचा दावा केला तर, तुम्ही शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय घेतला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजाच नव्हते तर ते संत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ घटनाकार नव्हते तर संत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ योद्धा नव्हते तर ते संत होते. महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे. असे प्रतिपादन शंकर गायकर यांनी केले. गायकर म्हणाले, सध्या गोहत्या प्रकरणे मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. त्याला देशपातळीवरील काही राजकीय पक्षाचे नेते खतपाणी घालत आहेत. गोर-गरिबांना चुकीचे आणि खोटे इतिहास सांगून धर्मांतर केले जात आहे. लव्ह जिहाद प्रकार ग्रामीण भागात पोहोचला आहे. अखंड हिंदुस्तानची फाळणी देखील लव्ह जिहादसारख्या गोष्टीतून झाली आहे. सनातन हिंदू धर्म हा कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही, मात्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज २० फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या महाराष्ट्रव्यापी बेमुदत संपाच्या अनुषंगाने साईश्रद्धा अंगणवाडी महिला संघटनेच्यावतीने अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यासंदर्भात अहमदनगरचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जनता दरबारामध्ये पालकमंत्री विखे पाटील यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपामध्ये महाराष्ट्र साईश्रद्धा अंगणवाडी महिला संघटनेची संगमनेर येथील संघटना देखील सहभागी झाली आहे. महाराष्ट्र सरकारकडे अनेक वर्षांपासून विविध मागण्या प्रलंबित आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने सतत याबाबत पाठपुरावा करण्यात आलेला आहे. सविस्तर मागण्या पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केलेल्या असून त्यात प्रामुख्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर तालुक्यातील घारगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साकूर आणि माहुली येथे रविवारी रात्री घडलेल्या दोन घटनांनी पठार भाग हादरला आहे. तीन अज्ञात चोरट्यांच्या टोळीने एका तरुणाला शस्त्राचा धाक दाखवत त्याला मारहाण करुन लुटल्याची घटना घडली तर त्यापाठोपाठ काही वेळातच साकूरमधील एका पेट्रोलपंपावर पेट्रोल भरत कर्मचाऱ्यांना रिव्हाल्व्हर आणि चाकुचा धाक दाखवत पेट्रोल पंप लुटल्याची घटना घडली. पठार भागात असलेल्या स्वतंत्र घारगाव पोलीस ठाण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेलाच चोरट्यांनी आव्हान दिल्याचे यातून समोर आले. पेट्रोलपंपावरील घटनेतदेखील एकजण जखमी झाल्याची माहिती मिळते. पहिल्या घटनेत माहुली येथे तीघा चोरट्यांनी एका लक्ष्मी टायर वर्क्समध्ये असलेल्या अनुदेव शैले या तेवीस तरुणाला रात्री दहा वाजण्याच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज भाऊसाहेब वाकचौरे ॥ अकोले आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील पैठण येथील मुलींच्या आश्रम शाळेत व्हायरल इन्फेक्शनमुळे तब्बल दीडशे विद्यार्थिनी आजारी पडल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. यातील काही विद्यार्थिनी आपल्या गावी परतल्या असून काहींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अकोले तालुक्यातील पैठण येथे असलेल्या मुलींच्या आश्रम शाळेमध्ये जवळपास चारशे विद्यार्थिनी असून दोन दिवसांपूर्वी टप्प्याटप्प्याने साधारणत: दीडशे विद्यार्थिनींना थंडी, ताप, उलट्या व जुलाबाची लागण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या विद्यार्थिनींना मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी तातडीने कोतुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यातील काही विद्यार्थिनींना लोणी आणि संगमनेर येथे उपचारासाठी नेण्यात आले. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज देशातील जेष्ठ नागरिकांचा विचार करणारा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपाने प्रथमच देशाला मिळाला. राष्ट्रीय वयोश्री योजनेपासून ते जलजीवन मिशन पर्यतच्या सर्व योजनांमधून सर्वसामान्य नागरीकांचे हित जोपासण्याचा प्रयत्नच केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन नगरचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. केंद्र सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या राष्ट्रीय वयोश्री योजनेतील पात्र लाभार्थींना साधन साहीत्याचे वाटप करण्यासाठी संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खा. विखे पाटील यांनी स्व. अशोकराव मोरे यांच्या कार्याची आठवण करून त्यांना सुमनांजली अर्पण केली. कार्यक्रमास भाजपाचे तालुका अध्यक्ष सतीश कानवडे, डॉ. अशोक इथापे, वसंतराव देशमुख, बापुसाहेब गुळवे, रोहीदास डेरे, डॉ. सोमनाथ कानवडे, अशोक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर रोटरीच्या ११८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब संगमनेरतर्फे आनंदी रस्ते या बहुप्रतिक्षीत उपक्रमाचे रविवारी (दि. २६ फेब्रुवारी) आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह मान्यवर संगमनेरकरांचा या उपक्रमास प्रतिसाद लाभला. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या रोटरी क्लबने धकाधकीच्या जीवनात संगमनेरकरांना काही आनंदी क्षण मिळावेत या हेतुने या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांचेसमवेत संगमनेरचे नागरिक, बाळगोपाळ, रोटरी सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावर्षी या उपक्रमाचे हे 7 वे वर्ष होते. परिसराची साफसफाई, रस्त्यांवर आकर्षक चित्र, सजावट, रंगेबीरंगे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे नाव जिल्ह्याला देणे भूषणावह आहे. त्यांचे कर्तृत्व फार मोठे आहे. याबाबत निर्णय झाला तर, निश्चितच आम्ही त्याचे स्वागत करू. अशा शब्दात राज्याचे महसूल व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगरच्या नामांतरास अनुकूलता दर्शविली आहे. संभाजीनगर आणि धाराशिव या नावांना अंतिम मंजुरी मिळाल्याबद्दल सरकारचे आभार मानताना अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे नाव देण्याच्या निर्णयाचे आपण स्वागत करणार असल्याचे ते म्हणाले. छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव या नावांना केंद्राकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर आता अहमदनगर जिल्हा नामांतराचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबतची मागणी केल्यानंतर महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री…

Read More