Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर लहान मुलांचा बहारदार गायन अविष्कार, रामभक्तीच्या साद घालणार्या रचना, गीत गायन-निवेदनातून उलगडणारे रामचरित्र आणि भावभक्तीच्या या सोहळ्यात देहभान हरपून तल्लीन झालेला हजारोंच्या संख्येतील रसिक प्रेक्षक असा माहोल शुक्रवारी संगमनेरच्या जाणता राजा मैदानाने अनुभवला. झी वाहिनीवरील सारेगमप फेम सारंग भालके आणि ध्रुव ग्लोबल स्कूलच्या बाल वाद्यवृंदाचा कलाविष्कार आणि शब्दस्वरांचा अनमोल नजराणा रसिकांसाठी वेगळी आनंदानुभूती देणारा ठरला. उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त संगमनेरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी लिटिलचॅम्प सारंग भालके याच्यासह ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ग. दी. माडगूळकर लिखित व सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायणातील 56 गीतांमधील आठ…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर शहर व तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने रविवारी (ता.१९ फेब्रुवारी) बस स्थानक प्रवेशद्वाराजवळ संगमनेर वकील संघाच्या सहकार्यातून मोफत नेत्र तपासणी व सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने संगमनेरमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा रविवारी साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी सर्व शिवप्रेमी सकाळी आठ वाजता शिवस्मारकाजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यानंतर संगमनेर बस स्थानक येथे रोटरी आय केअर ट्रस्ट संचलित दर्शन रोटरी नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी व सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर सकाळी दहा ते एक या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीला घातक ठरणारा आहे. ठाकरे आणि शिवसेना हे एक समीकरण आहे शिवसेना ठाकरेंपासून वेगळी असू शकत नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात माध्यमांशी बोलत होते. https://twitter.com/bb_thorat/status/1626587873351979014?t=gSOG3tK_PeGjS6b5R03gqg&s=19 थोरात म्हणाले, जो निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे तो लोकशाहीला घातक अशा प्रकारचा आहे. शिवसेना ठाकरेंपासून वेगळी काढू शकत नाही. ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण आहे. ठाकरेंनी पूर्ण आयुष्य शिवसेना संघटना वाढविण्याकरिता घातलेले आहे. कदाचित आयोगाने असा निर्णय दिला असला तरी जनता…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आता शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचिन्ह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेतील बंडानंतर भारतीय जनता पक्षासोबत गेल्यानंतर मुख्यमंत्री पदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. त्यामुळे शिंदे यांनी शिवसेना या नावासोबतच धनुष्यबाण या पक्ष चिन्हावर दावा केला होता. यासंबंधीचे निर्णय घेण्याचा अधिकार न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्यानंतर निवडणूक आयोगाचा हा मोठा निर्णय समोर आला आहे. https://twitter.com/ANI/status/1626572341814919168?t=lKl5K36Bfrbi–PvKwY62A&s=19 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दलच्या सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतर निवडणूक आयोग आपला…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिर्डी, अहमदनगर जिल्ह्याच्या सहलीवर असलेल्या दर्यापूर (जि. अमरावती) येथील अन्नातून विषबाधा झालेल्या ९४ मुले व ५ शिक्षकांना शिर्डीच्या साईनाथ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एकाच व्हिडिओ कॉलद्वारे मुले व शिक्षकांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. या रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्याचे कारण नाही. असे रूग्णालय अधीक्षकांनी कळविले आहे. मुले व शिक्षकांच्या प्रकृतीची सर्वातोपरी काळजी घेण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रितम वडगावे व प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दिल्या आहेत. यावेळी तहसीलदार कुंदन हिरे उपस्थित होते. दर्यापूर (जि.अमरावती) येथील आदर्श हायस्कूल मधील २२७ मुले-मुली व १५…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भारतीय जनता पक्षाकडे मात्र नेत्यांची फळी असताना देखील प्रकृती अस्वस्थ असताना देखील खासदार गिरीश बापट यांना गुरुवारी कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराकरिता बोलाविण्यात आले होते. त्यामुळे रासने यांच्या प्रचारासाठी व्हीलचेअरवर केसरी वाड्यात उपस्थित राहिलेल्या बापट यांना शुक्रवारी प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे वजनदार नेते पक्षाकडे असतानाही कसबा पेठ पोटनिवडणुक भाजपसाठी अवघड बनल्याने गुरुवारी प्रकृती अस्वस्थ असतानाही खासदार गिरीश बापट यांना प्रचार करण्यासाठी बोलविण्यात आले. गुरुवारी व्हीलचेअरवर केसरी वाडा येथे कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचार…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क तत्कालीन भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात 1995 मध्ये सामाजिक न्याय आणि क्रीडा मंत्री पद भुषविणार्या शिवसेनेच्या उत्तम प्रकाश खंदारे यांच्यासह महादेव भोसले आणि आणखी एका महिलेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्यावर पुण्यातील शासकीय विश्रामगृहात अत्याचार करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवत व मुलांचा सांभाळ करण्याचे वचन देत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे 37 वर्षीय महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 2012 पासून बिबेवाडीतील बी रेस्ट हाउस, पोकळे वस्ती येथील जाधव निवास या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी भा.द.वि. 376, 377, 406, 420, 506…
नव्या राज्यपालांचा शनिवारी शपथविधी; कोश्यारी यांच्याप्रमाणेच बैस यांची झारखंडमधील कारकीर्द वादग्रस्त
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांचा शपथविधी शनिवारी राजभवनातील दरबार हॉलमध्ये होत आहे. या समारंभात रमेश बैस आपली राज्यपाल पदाची सूत्रे स्वीकारतील. दरम्यान नव्या राज्यपालांकडून महाराष्ट्राचा व महापुरुषांचा सन्मान राखला जावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कोश्यारी यांच्याप्रमाणे नव्या राज्यपालांनी दिल्ली सरकारच्या तालावर नाचणारे कळसूत्री बाहुली म्हणून काम पाहू नये, अशी राज्यातील जनतेची अपेक्षा आहे. त्यांची झारखंड मधील कारकीर्द भगतसिंग कोश्यारी यांच्याप्रमाणेच वादग्रस्त राहिली आहे. 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये बैस केंद्रीय राज्य मंत्री होते. 1999 ते 2004 या काळात त्यांनी केंद्रात माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री तसेच रसायने व खते राज्यमंत्री, 2003 मध्ये केंद्रीय खाण मंत्रालयात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुख्य विद्युत लाईनच्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने जोराचा धक्का बसल्याने एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील साकुर येथे घडली आहे. मोहन भिवाजी मोरे असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास साकुरमधील वनवे नगर येथे हा प्रकार घडला. यासंदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी, जावेद अब्दुल शेख यांच्या घरापासून वीज वितरण कंपनीचे मुख्य प्रवाह असलेले विजेची तार गेलेली आहे. शेख यांच्या घराच्या गच्चीवर मोहन भिवाजी मोरे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास काम करत असताना अचानक त्यांचा या तारेला स्पर्श झाला. त्यामुळे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या संकेत नवले याच्या खून प्रकरणी शहर पोलिसांनी दोन आरोपी निष्पन्न केले असले तरी त्यांच्याकडून पोलिसांना अद्याप कोणतीही माहिती मिळविता आलेली नाही. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने देखील पोलिसांच्या मागणीवरून या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे तांत्रिक बाबींवर तपास सुरू असल्याचे सांगणाऱ्या पोलिसांच्या आत्तापर्यंतच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संकेत नवले या विद्यार्थ्याच्या हत्येचे प्रकरण सर्वत्र गाजत असून आता या हत्येच्या तपासाचे धागेदोरे थेट परदेशात जाऊन पोहोचले असल्याचे पोलीस तपासातून समोर येत आहे. मात्र मिळणाऱ्या माहितीच्या आधारावरच पोलिसांना यातून काय हाती लागेल हे लवकरच समोर येईल. दरम्यान याप्रकरणी अटक केलेले…
