Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेसचे ज्येष्ठ राष्ट्रीय नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्येचे ट्विटरवर फेक अकाउंट तयार करण्यात आले आहे. या संदर्भात थोरात यांनीच आपल्या ट्विटर अकाउंट वरून या संदर्भात माहिती दिली असून पोलिसांकडे तक्रार केली असल्याचे म्हटले आहे. थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने ट्विटरवर हे खोटे (फेक) अकाउंट तयार केले आहे. या फेक अकाउंट वरून नियमितपणे ट्विट देखील केले जात होते. त्यामुळे काँग्रेस नेते बंटी पाटलांसह अनेकांनी हे ट्विट अकाउंट फॉलो केले आहे.ट्विटर वरील हे बनावट खाते तयार करताना आरोपींनी थोरात यांच्या कन्या शरय देशमुख यांच्या फोटोचा वापर केला असून डीपीवर शरयू देशमुख…
संगमनेर काँग्रेसचा विचार हाच आपला विचार असून काहींनी गैरसमज पसरवत विनाकारण भाजपपर्यंत नेऊन पोहोचवले. अगदी उमेदवारीही वाटून टाकली. हे अत्यंत दुर्दैवी असून काँग्रेसच्या विचारावरच आपली वाटचाल झाली असून या पुढील काळातही याच विचारांवर वाटचाल सुरू राहणार आहे, असे स्पष्ट सांगताना मागील महिन्यात विधान परिषदेच्या निमीत्ताने झालेले राजकारण व्यतीथ करणारे असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्यावतीने जाणता राजा मैदानावर ‘शिंदेशाही बाणा’ या कार्यक्रमानिमित्त ऑनलाइन पद्धतीने तालुक्यातील जनतेशी संवाद साधताना विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, २६ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या अपघातामुळे खांद्याचे ऑपरेशन झाले असून त्यामुळे संगमनेरला येता आले नाही. एक महिनाभर…
संगमनेर एक तालुका एक परिवार ही संकल्पना राज्याला देणारे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात सहभाग घेतला असून तालुक्यातील जनतेने त्यांच्यावर जीवापाड प्रेम केले आहे. त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त झालेल्या शिंदेशाही बाणा कार्यक्रमात विक्रमी गर्दीत नागरिकांनी धमाल केली. जाणता राजा मैदान येथे नामदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्यावतीने आयोजित शिंदे शाहीबाणा हा कार्यक्रम प्रख्यात गायक आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे व उत्कर्ष शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, नाशिक पदवीधरचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, जिल्हा परिषद सदस्य रामहरी…
१८८५ साली स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला त्याग आणि बलिदानाची मोठी परंपरा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी या राष्ट्रीय नेत्यांप्रमाणे महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख या नेतृत्वाची मोठी समृद्ध परंपरा या पक्षाला लाभली आहे. या समृद्ध परंपरेचा विचार जोपासत अडचणीच्या काळात काँग्रेस पक्षाची धुरा यशस्वीपणे सांभाळत या पक्षाला सन्मानजनक विजय मिळवून देत महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभाग मिळवून देण्यात यशस्वी ठरलेले काँग्रेसचे बाजीप्रभू माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षासाठी यशस्वी प्रदेशाध्यक्ष ठरले आहेत. १९८५ मध्ये समाजकारणातून राजकारणात आलेल्या बाळासाहेब थोरात यांची आमदारकी चढत्या क्रमाने वाढत गेली तसे मंत्रीपदही चढत्या क्रमाने वाढत गेले. १९९९ मध्ये राज्यमंत्री, २००४ मध्ये कॅबिनेट, कृषी व जलसंधारण…
लोणी शासकीय कार्यालयांमधून आवश्यक असलेल्या सर्व योजनांसाठीचे कागदपत्र, दाखले नागरीकांना सहज सोप्या पध्दतीने उपलब्ध व्हावेत म्हणून सर्व तालुक्यांमध्ये ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरु करण्यात येणार असून, या माध्यमातून जनतेच्या समस्याही जाणून घेण्याच्या सुचना महसूल विभागातील आधिका-यांना दिल्या असल्याची माहीती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. महसूल विभागातून आवश्यक असलेले दाखले मिळण्यास बहुतांशी वेळा विलंब होतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागपत्रांमध्ये त्रृटीही असतात. त्यामुळे सामान्य माणसाला योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते. शाळा, महाविद्यालयांच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांकरीता विद्यार्थ्यांना निर्माण होणा-या अडचणी प्रवेशापुर्वी दूर व्हाव्यात, शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आवश्यक असलेले कागदपत्र नागरीकांना सहज उपलब्ध…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयातर्फे स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडियाद्वारा मध्यप्रदेशात आयोजित केलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्र संघाने धमाका केला. मुला-मुलींच्या स्वतंत्र गटात झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार्या योगासनपटूंनी पश्चिम बंगाल, हरयाणा, तामीळनाडू व मध्यप्रदेशच्या संघांशी एकतर्फी लढत देत उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर ही स्पर्धा गाजवली. या संपूर्ण स्पर्धेत योगासनांमध्ये वर्चस्व राखणार्या महाराष्ट्र संघाने पुन्हा एकदा दोन्ही गटाच्या अजिंक्यपदाचा किताबही पटकाविला. उज्जैन येथे पार पडलेल्या या स्पर्धेतील मुलांच्या पारंपरिक प्रकारात महाराष्ट्राच्या सुमित बंडाळे याने सुवर्ण तर स्वराज फिस्के याने कांस्य पदक मिळवले. याच प्रकारात मुलींच्या गटात निरल वाडेकरने रौप्य पदक प्राप्त केले. कलात्मक प्रकारात स्वराज फिस्केने सुवर्ण…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ऊस तोडणी मजुराच्या नऊ वर्षाच्या मुलाचा प्रवरा डावा कालव्यामध्ये पाय घसरून पडल्याने कालव्याच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे रविवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. रितेश संदीप राठोड (रा. जळगाव) असे कालव्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. प्रवरा नगरच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस तोडणी सध्या सुरू आहे. ऊस तोडणी साठी या कारखान्याकडे जळगाव जिल्ह्यातील करगाव येथून काही ऊस तोडणी मजूर आलेले आहेत. ते आश्वी बुद्रुक येथील प्रवरा डाव्या कालव्याजवळील महादेव पुलाजवळ शेळके वस्तीवर हे मजूर कोप्या टाकून राहत आहे. रविवारी यातील संदीप राठोड आणि त्यांची पत्नी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क तब्बल 32 आरोपींनी संगणमत करून बँकेचा विश्वासघात करत सुमारे 69 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बँकेच्या गोल्ड व्हॅल्युवरसह 32 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शहरातील नामांकित बँकेमधील गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. संगमनेर, अकोले, राहता येथील तब्बल 32 जणांचा आरोपी मध्ये समावेश असल्याने बँकिंग क्षेत्रात व ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये सोनेतारण करताना आरोपींनी बनावट सोने गहाण ठेवत त्या बदल्यात तब्बल 68 लाख 94 हजार रुपयांचे कर्ज उचलले आहे. बँकेच्या लेखापरीक्षणामध्ये बनावट सोनेतारण प्रकरणाची काही पाकिटे सापडल्याने ही खाती बनावट…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महावितरण कंपनीने ग्राहकांच्या माथी दरवाढ लादण्याचा प्रयत्न चालविला आहे. असे झाल्यास मोठ्या प्रमाणात ग्राहकांना वीज वापराबद्दल भुर्दंड बसेल. याचा विरोध करण्यासाठी ग्राहकांनी पुढे येण्याची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी संभाव्य वीज दरवाढी संदर्भात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला पत्र पाठवत हरकत नोंदवण्याचे आवाहन शिर्डी काँग्रेसचे नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांनी केले आहे. संभाव्य दरवाढी संदर्भात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने १५ फेब्रुवारीपर्यंत वीज ग्राहकांकडून हरकती मागविल्या आहेत. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना पगारे म्हणाले, सध्या विजेचा दर प्रति युनिट ३.३६ रुपये असून येत्या दोन वर्षात तो ४.५० ते ५.१० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. सदर दरवाढ झाल्यास याचा वीज ग्राहकांना मोठा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क २० लाख रुपयांनी तोट्यात असलेला व्यवसाय वार्षिक १०० कोटींचा होतो. आपत्ती आली तरी आपण सकारात्मक वृत्तीने सामोरे गेल्यास ही प्रगती होते. उघड्या डोळ्यांनी स्वप्न पहा, भावना जपून व्यवसाय करण्याऐवजी बुध्दी चातुर्याने करा, प्रत्येक संधीचा लाभ घ्या, आपला इगो शून्य करा, पैशांसाठी व्यवसाय करण्यापेक्षा उद्दिष्टांसाठी व्यवसाय करा असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य व साई ऍक्युम्युलेटर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड संगमनेरचे व्यवस्थापकीय संचालक निलेश चव्हाण यांनी केले. सिन्नर येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या भिकुसा हायस्कूल येथे करियर मार्गदर्शन उपक्रमांतर्गत ‘ उद्योजक आपल्या भेटीला ‘ या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सोमनाथ जगदाळे…
