Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आणि संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या आणि शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनु ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस राष्ट्रीय स्तरावरील ब्ल्यू रिबन पुरस्काराने महाबळेश्वरमध्ये गौरविण्यात आले आहे. महाबळेश्वर येथे झालेल्या बँको या संस्थेच्यावतीने पुरस्कार वितरण प्रसंगी बँकोचे राष्ट्रीय अध्यक्ष जोतींद्रभाई मेहता यांचे हस्ते हा पुरस्कार बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी, उपाध्यक्ष  ॲड. नानासाहेब शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी यांनी स्वीकारला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्त व विचारांवर बँकेची वाटचाल सुरू असून बँकेने सातत्याने ऑडिटचा ‘अ’ दर्जा मिळून शेतकरी व सर्वसामान्य मदत केली आहे. अमृतवाहिनी बँकेने नुकताच दुग्धविकास…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांमधील प्रभारी राज संपुष्टात आणत जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. नव्याने नियुक्ती मिळाल्याने आता अधिकाऱ्यांना प्रत्येक पोलिस ठाण्यात कामातून गुन्हेगारी संपुष्टात आणावी लागणार आहे. अहमदनगर जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यात अधिकाऱ्यांना नव्या नियुक्त्या दिल्या आहेत. अनेक वादग्रस्त आणि काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची उचल बांगडी झाल्याने त्यांच्या रिक्त जागांवर आता नवे पोलीस अधिकारी काम करणार आहेत. जिल्ह्यात नव्याने आलेल्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षकांना नियुक्त देण्यात आल्या आहे. मध्यावधी, प्रशासकीय, विनंती आणि नव्याने नेमणुका करण्यासंदर्भातील बदल्यांचा यात समावेश…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी स्वातंत्र्यसेनानी, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी सुरु केलेल्या दंडकारण्य अभियानासह राज्यातील चौदा संस्था, व्यक्तींचा “सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात पर्यावरण संवर्धन” पुरस्काराने पुण्यामध्ये गौरव करण्यात आला आहे. थोरात यांनी सुरू केलेले दंडकारण्य अभियान पर्यावरणाच्या दृष्टीने लोक चळवळ ठरले असून या अभियानाची दखल जागतिक स्तरावर युनोने देखील घेतली आहे. पुण्याच्या हरित मित्रपरिवार, गुरुकृपा संस्था, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्र यांच्यावतीने “सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार” दिले जात असून नुकताच हा सोहळा पुण्यामध्ये पार पडला आहे. पर्यावरण आणि संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध चौदा संस्थांना यावेळी सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज कोपरगाव : कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांच्यावर परिचारिकेचा विनयभंग करत कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केल्याच्या कारणावरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा खोटा असल्याचे म्हणत मंगळवारी (ता. २९) सकाळपासून कोपरगाव तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तलाठी व महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले. कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे हे शनिवारी सकाळी ग्रामीण रुग्णालयाला भेट देण्यासाठी गेले असता, त्या ठिकाणी उपस्थित परिचारिका आणि कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवत त्यांच्याविरोधात परिचारिकेने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा खोटा असल्याचे म्हणत तलाठी व महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने काम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज भारतीय पोलीस सेवेतील पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील तिघा अप्पर पोलीस महासंचालकांसह चार विशेष पोलीस महानिरीक्षक आणि एका पोलीस उपमहानिरीक्षकांना राज्य सरकारच्या गृह विभागाने मंगळवारी नियुक्ती दिली आहे. या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश राज्याच्या गृह विभागाने काढले आहेत. पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले अप्पर पोलीस महासंचालक बिपिन कुमार सिंह यांची अप्पर पोलीस महासंचालक आर्थिक गुन्हे शाखा मुंबई या पदावर, प्रभात कुमार यांची अप्पर पोलीस महासंचालक व उप महासमादेशक होमगार्ड मुंबई या पदावर आणि विनीत अग्रवाल यांची अप्पर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी म्हाडा मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांची नियुक्ती विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण…

Read More

सुनिल नेवासकर ॥ संगमनेर संत निरंकारी मिशन आणि संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांचे संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने व प. पु. बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशाने प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन हा उपक्रम रविवारी (ता. २६) सकाळी ७ ते १२ या वेळेत विजयघाट, गंगामाई परिसर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रकल्प अंतर्गत विजयघाट व नदीपात्राची साफसफाई करण्यात आली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश जलसंरक्षण हा असून यामध्ये प्रामुख्याने पाण्याचे स्त्रोत शुध्दीकरण आणि स्वच्छ करण्याप्रती जनजागृती करणे हा आहे. हा उपक्रम संपूर्ण भारतात ११०० ठिकाणी राबविला गेला. यामध्ये समुद्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अखेर राज्य सरकार नमलं असून अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला मोठे यश आलं आहे. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाची दखल राज्य सरकारला अखेर घ्यावी लागली. राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाच हत्यार उपसले होते. रायगड किल्ला तसेच मुंबईतल्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. मुंबईतील आझाद मैदावर आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. मागण्या पूर्ण होईपर्यंत मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतला. राज्य सरकारनं साडेपाच तर केंद्रानं गेली साडेचार वर्षे मानधनात कुठलीही वाढ दिलेली नाही. यासह अनेक मागण्यासाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर हा प्रश्न विधानसभेतही उपस्थित करण्यात आला. त्यानंतर अंगणवाडी सेविकांसोबत राज्य सरकारने सकारात्मक चर्चा केली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमाचा 2022-23 या शैक्षणिक वर्षाचा उत्कृष्ट राज्यस्तरीय प्राचार्य प्रवर्तक पुरस्कार सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील यांना मुंबई येथे प्रदान करण्यात आला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बीएसटी महाविद्यालयाने सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी काम केले आहे. गुणवत्तेबरोबरच विविध उपक्रमामुळे हे महाविद्यालय राज्यपातळीवर लौकिकास्पद ठरले आहे . नवीन शैक्षणिक धोरणानुसार बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांप्रमाणे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सेवाभावी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा निकाल कधी लागणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच या महत्त्वाच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी भाष्य केले आहे. त्यामुळे सामान्यांचं सरकार म्हणून ओळख सांगणारं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार खरंच वैध आहे की नाही, याचा निकाल आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी आणखी फार काळ चालणार नाही. तारीख पे तारीख अशी स्थिती या केसची आता होणार नाही तर हा युक्तिवाद याच आठवड्यात संपवून निकालदेखील लवकरच मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी याबाबतीत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक येथील ज्येष्ठ साहित्यिक कार्यकर्ते प्रा. गंगाधर अहिरे यांना यावर्षीचा स्मृतीशेष कवी दिनकर साळवे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती पुरस्कार समितीचे अध्यक्ष के. जी. भालेराव यांनी दिली. रविवारी १२ मार्चला संगमनेरच्या व्यापारी असोसिएशन सभागृहामध्ये समीक्षक प्रा. मिलिंद कसबे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असून माजी आमदार डॉ. सुधीर तांबे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. संगमनेरमधील ज्येष्ठ लेखक समीक्षक स्मृतीशेष कवी दिनकर साळवे स्मृती पुरस्कार गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आला आहे. गतवर्षी हा पुरस्कार शेवगाव येथील लेखक आणि वंचितचे नेते प्राध्यापक किसन चव्हाण यांना देण्यात आला होता. दुसऱ्या वर्षीच्या पुरस्कारासाठी प्रा. अहिरे यांची निवड करण्यात आली आहे.…

Read More