Author: अनंत पांगारकर
लोणी शासकीय कार्यालयांमधून आवश्यक असलेल्या सर्व योजनांसाठीचे कागदपत्र, दाखले नागरीकांना सहज सोप्या पध्दतीने उपलब्ध व्हावेत म्हणून सर्व तालुक्यांमध्ये ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरु करण्यात येणार असून, या माध्यमातून जनतेच्या समस्याही जाणून घेण्याच्या सुचना महसूल विभागातील आधिका-यांना दिल्या असल्याची माहीती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. महसूल विभागातून आवश्यक असलेले दाखले मिळण्यास बहुतांशी वेळा विलंब होतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागपत्रांमध्ये त्रृटीही असतात. त्यामुळे सामान्य माणसाला योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते. शाळा, महाविद्यालयांच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांकरीता विद्यार्थ्यांना निर्माण होणा-या अडचणी प्रवेशापुर्वी दूर व्हाव्यात, शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आवश्यक असलेले कागदपत्र नागरीकांना सहज उपलब्ध…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयातर्फे स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडियाद्वारा मध्यप्रदेशात आयोजित केलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्र संघाने धमाका केला. मुला-मुलींच्या स्वतंत्र गटात झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार्या योगासनपटूंनी पश्चिम बंगाल, हरयाणा, तामीळनाडू व मध्यप्रदेशच्या संघांशी एकतर्फी लढत देत उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर ही स्पर्धा गाजवली. या संपूर्ण स्पर्धेत योगासनांमध्ये वर्चस्व राखणार्या महाराष्ट्र संघाने पुन्हा एकदा दोन्ही गटाच्या अजिंक्यपदाचा किताबही पटकाविला. उज्जैन येथे पार पडलेल्या या स्पर्धेतील मुलांच्या पारंपरिक प्रकारात महाराष्ट्राच्या सुमित बंडाळे याने सुवर्ण तर स्वराज फिस्के याने कांस्य पदक मिळवले. याच प्रकारात मुलींच्या गटात निरल वाडेकरने रौप्य पदक प्राप्त केले. कलात्मक प्रकारात स्वराज फिस्केने सुवर्ण…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ऊस तोडणी मजुराच्या नऊ वर्षाच्या मुलाचा प्रवरा डावा कालव्यामध्ये पाय घसरून पडल्याने कालव्याच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे रविवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. रितेश संदीप राठोड (रा. जळगाव) असे कालव्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. प्रवरा नगरच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस तोडणी सध्या सुरू आहे. ऊस तोडणी साठी या कारखान्याकडे जळगाव जिल्ह्यातील करगाव येथून काही ऊस तोडणी मजूर आलेले आहेत. ते आश्वी बुद्रुक येथील प्रवरा डाव्या कालव्याजवळील महादेव पुलाजवळ शेळके वस्तीवर हे मजूर कोप्या टाकून राहत आहे. रविवारी यातील संदीप राठोड आणि त्यांची पत्नी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क तब्बल 32 आरोपींनी संगणमत करून बँकेचा विश्वासघात करत सुमारे 69 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बँकेच्या गोल्ड व्हॅल्युवरसह 32 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शहरातील नामांकित बँकेमधील गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. संगमनेर, अकोले, राहता येथील तब्बल 32 जणांचा आरोपी मध्ये समावेश असल्याने बँकिंग क्षेत्रात व ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये सोनेतारण करताना आरोपींनी बनावट सोने गहाण ठेवत त्या बदल्यात तब्बल 68 लाख 94 हजार रुपयांचे कर्ज उचलले आहे. बँकेच्या लेखापरीक्षणामध्ये बनावट सोनेतारण प्रकरणाची काही पाकिटे सापडल्याने ही खाती बनावट…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महावितरण कंपनीने ग्राहकांच्या माथी दरवाढ लादण्याचा प्रयत्न चालविला आहे. असे झाल्यास मोठ्या प्रमाणात ग्राहकांना वीज वापराबद्दल भुर्दंड बसेल. याचा विरोध करण्यासाठी ग्राहकांनी पुढे येण्याची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी संभाव्य वीज दरवाढी संदर्भात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला पत्र पाठवत हरकत नोंदवण्याचे आवाहन शिर्डी काँग्रेसचे नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांनी केले आहे. संभाव्य दरवाढी संदर्भात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने १५ फेब्रुवारीपर्यंत वीज ग्राहकांकडून हरकती मागविल्या आहेत. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना पगारे म्हणाले, सध्या विजेचा दर प्रति युनिट ३.३६ रुपये असून येत्या दोन वर्षात तो ४.५० ते ५.१० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. सदर दरवाढ झाल्यास याचा वीज ग्राहकांना मोठा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क २० लाख रुपयांनी तोट्यात असलेला व्यवसाय वार्षिक १०० कोटींचा होतो. आपत्ती आली तरी आपण सकारात्मक वृत्तीने सामोरे गेल्यास ही प्रगती होते. उघड्या डोळ्यांनी स्वप्न पहा, भावना जपून व्यवसाय करण्याऐवजी बुध्दी चातुर्याने करा, प्रत्येक संधीचा लाभ घ्या, आपला इगो शून्य करा, पैशांसाठी व्यवसाय करण्यापेक्षा उद्दिष्टांसाठी व्यवसाय करा असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य व साई ऍक्युम्युलेटर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड संगमनेरचे व्यवस्थापकीय संचालक निलेश चव्हाण यांनी केले. सिन्नर येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या भिकुसा हायस्कूल येथे करियर मार्गदर्शन उपक्रमांतर्गत ‘ उद्योजक आपल्या भेटीला ‘ या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सोमनाथ जगदाळे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील खंडोबा देवस्थानच्या परीसर विकासासाठी तिर्थक्षेत्र विकास योजनेतून २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. प्रतिजेजूरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील देवगड येथील श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थानचा यात्रा उत्सव माघी पोर्णीमेला सुरू झाला. यात्रेच्या पहील्याच दिवशी मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते श्री खंडोबाची महाआरती करण्यात आली. देवस्थानच्यावतीने स्मृतिचिन्ह देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी धर्मदाय आयुक्त उषा पाटील, संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजित देशमुख, देवस्थानचे अध्यक्ष सगाजी पावसे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, गुलाबराव सांगळे, काशिनाथ पावसे, भिमराज चत्तर, जावेद…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिकलेल्या पदवीधर आणि राज्यातील शिक्षकांनी कोणाला निवडून दिले हे आपण निकालातून बघितले आहे. शिकलेल्या मतदाराने दिलेला कौल कशा प्रकारचा आहे हे आपण बघितले पाहिजे. शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांच्या बाबतीत आमची चूक झाली त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. पवार शनिवारी रात्री बारामती येथे झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. सभेतच पवारांनी तांबे यांच्या बद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करत त्यांच्या पाठीशी असल्याचे सुचित केले. शुक्रवारी सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी…
रविवार विशेष | प्रवीण पुरो काही लोकांच्या जिभेलाच हाड नसतं, असं म्हणतात. स्वत:चं महत्व वाढवण्याकरता समाजासाठी काही करण्याऐवजी ते दुसर्याला कमी लेखण्यात आणि दोष देण्यात धन्यता मानतात. राज्य भाजपचे प्रदेश प्रमुख झाल्यापासून चंद्रशेखर बावनकुळे असंच काही बाही बडबडू लागले आहेत. प्रदेश प्रमुख झालं की असंच बोलावं लागतं अशी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची बोली बनली आहे. याआधी कोल्हापूरचे चंद्रकांत पाटीलही असंच काही बोलायचे. त्यांच्याही जिभेला टेकू नव्हता. त्यात राष्ट्रवादीवर टीका केली की पक्षात बक्षिसी मिळते आणि पवारांवर टीका केली की प्रमोशन. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे भाजपच्या नेत्यांसाठी सोपं टार्गेट असतं. केवळ जीभ आहे म्हणून अशिष शेलार, नितेश राणेंसारखे नेतेही पवारांवर टीका…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नासिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या आरोपांना उत्तर देताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ज्यांच्या व्हाट्सअपचे स्क्रीन शॉट माध्यमांना पत्रकार परिषदेत दाखविले त्या सचिन गुंजाळ यांनी आपली भूमिका एका पत्राद्वारे ट्विटरवर व्यक्त केली आहे. ‘महाराष्ट्र संवाद’च्या वाचकांसाठी या पत्राचा तपशील आणि अधिक माहिती देत आहोत. सन्माननीय अतुल लोंढेजी, आपण प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आहात. आपण माहिती घेऊन बोलले पाहिजे. अगदीच पत्रकार परिषद घेण्या अगोदर आपण माझ्याशीही बोलण्याचा प्रयत्न केला असता, तरीही मी वास्तविकता सांगितली असती. आपण चुकीची माहिती देऊ नये ही अपेक्षा आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ एबी फॉर्म वाटपासंदर्भात जे घडले ते आपणास सांगतो. सर्वात…
