Author: अनंत पांगारकर
√ शिर्डी श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन व पूजा √ मंदिरातील नवीन दर्शनरांग संकुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन √ निळवंडे धरण प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे जलपूजन करून लोकार्पण √ राज्यातील ८६ लाखांहून अधिक शेतकरी लाभार्थ्यांना लाभ देणाऱ्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेची सुरूवात √ महाराष्ट्रातील सुमारे ७५०० कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, २६ ऑक्टोंबर २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या भेटीत प्रथम श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. यावेळी मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनही ते करणार आहेत. अकोले तालुक्यातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : मोबाईल नंबर ब्लॉक केला या कारणावरून संगमनेरमध्ये दोघाजणांनी महिलेवर कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. एकीकडे दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजन सुरू असताना दुसरीकडे मात्र कोयत्यासारख्या शस्त्रानेच महिलेवर वार करण्याच्या प्रकारामुळे शहरात पोलिसांचा धाक उरला नसल्याचे दिसत आहे. संगमनेर शहर पोलिसांनी राजेश जंबूकर व वैभव दांदे (रा. ढोलेवाडी, संगमनेर) या दोघांविरुद्ध महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजन केले जाते. मात्र संगमनेरात शस्त्राचा वापर करीत एका माहीलेला जखमी करण्यात आले आहे. मोबाईल नंबर ब्लॉक का केला याचा राग येत आरोपीने थेट फिर्यादीला कोयत्यानेच मारहाण केली. फिर्यादी ही मित्र…
माझा माणूस उन्हात असताना मी सत्तेच्या सावलीत कशी राहू शकते ? महाराष्ट्र संवाद न्यूज भगवान भक्ती गड (बीड) : माझ्या कारखान्यावर रेड झाली तेव्हा तुम्ही दोन दिवसांत 11 कोटी जमा केले. पण आज माझ्याकडे तुम्हाला बसण्यासाठी अंथरायला सतरंजीसुद्धा नाही. तुम्ही उन्हात म्हणून मी पण उन्हात आहे. माझा माणूस उन्हात असताना मी सत्तेच्या सावलीत कशी राहू शकते असे म्हणत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कारखान्यावर झालेल्या कारवाईबाबत खुलासा केला. सावरगाव येथील भगवान बाबा भक्ती गडावर पोहचल्यावर पंकजा मुंडे भगवान बाबांचे दर्शन, आरती, कन्या पूजन करून व्यासपीठावर आल्या. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे या तिघी बहिणी यावेळी एकत्र होत्या.…
महाराष्ट्र संवाद न्यूज मतिमंद २१ वर्षीय मुलीला घरातून जवळच्या जंगलात नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतून १० हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने सोमवारी दिले आहेत. अर्जुन अण्णासाहेब जोशी (रा. पट्टेवाडी, जवळे बाळेश्वर, ता. संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अत्याचारित महिला मतिमंद असल्याने अतिशय गुंतागुंतीच्या ठरलेल्या या खटल्यामध्ये सहाय्यक सरकारी वकिलांनी अतिशय कौशल्याने आरोपी विरोधात गुन्हा सिद्ध करत आरोपीला शिक्षेपर्यंत नेले. दरम्यान या प्रकरणी तपासातील काही कमकुवत बाबी देखील समोर आल्या असून न्यायालयाने याबाबत आपले निष्कर्ष नोंदविले आहेत. त्यामुळे हे निष्कर्ष…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सत्ताधारी काँग्रेस पक्षाने संगमनेर नगर परिषदेत गेल्या ३० वर्षात केले नाही ते आता आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये करून दाखविणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी म्हटले आहे. जहागीरदार यांनी म्हटले आहे की, गेल्या ३० वर्षांपासून संगमनेर नगर परिषदेमध्ये आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आहे. संगमनेर नगरपलिकेत दर चार वर्षानी मालमत्तेचे (घरपट्टी) रिव्हिजन होते. रिव्हिजनचा अर्थ असा होतो की, नगरपलिका हद्दीतील जी मालमत्ता आहे त्यात काही बदल झाल्यास, नवीन इमारती, जुन्या इमारतीच्या जागेवर नवीन इमारत, जागेत बदल झाल्यास त्याचे फेर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ९ ते १२ जून २०२४ या कालावधीत अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील क्लार्क काउंटीत असलेल्या कोलंबिया नदीच्या उत्तर तीरावरील व्हँकुव्हर या शहरात होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत एचडीएफसी लाईफ इ्शुरन्स कंपनीची अभिकर्ता धनश्री सुनील कडलग ही तरुणी सहभागी होत आहे. येथील एचडीएफसी लाईफ इ्शुरन्स कंपनीची अभिकर्ता असलेल्या धनश्री कडलगला विमा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा एमडीआरटी हा सन्मान प्राप्त झाला आहे. यामुळे ती अमेरिकेत होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत सहभागी होत आहे. धनश्री हिला एमडीआरटी होण्यासाठी तिचे वडील ‘कडलग इन्व्हेस्टमेंट’चे संस्थापक सुनील कडलग यांच्यापासून प्रेरणा मिळाली. सुनील कडलग हे गेल्या २७ वर्षापासून म्युच्युअल फंड वितरक, जीवन व मेडिक्लेम विमा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. येथील…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष लेख @ प्रवीण पुरो भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या स्वप्नातल्या दुनियेत वावरत असावेत. त्यांना भाजपच्या प्रचंड शक्तीचा इतका अहंकार जडला आहे की कोण जाणे. यामुळेच ते आता भाजप म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे भाजप अशा समीकरणात जगत आहेत. भाजपची राज्य जबाबदारी त्यांच्याकडे आल्यापासून काय करू आणि काय नको, असं त्यांचं झालेलं दिसतं. त्यांना 2024 च्या निवडणुकीत भाजपला विजयी करायचं आहे, ते ही 48 पैकी 45 जागा घेऊन. प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाला जिंकून आणणं ही त्यांची जबाबदारीच आहे. पण 48 पैकी 45 जागा जिंकणार म्हणजे सहकार्यांच्या वाट्याला ते तीनच खासदार देणार आहेत. बाजार खुळ्यांचा का ते…
फसवणूक करून घारगाव पोलिसांनी केली लाय डिटेक्टर (पॉलीग्राफ) चाचणी.. मयताच्या बँक खात्यातील लाखो रुपये गायब ? घारगाव पोलिसांच्या भूमिकेबाबत आणि तपासाबाबत अनेक शंका, तक्रारी आणि आरोप महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील पठार भागात घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वृद्ध व्यक्तीच्या खून प्रकरणाचे चांगलेच पडसाद उमटले असून या गुन्ह्यात अद्याप खुनी सापडलेला नसताना पोलिसांकडून मयताच्या नातेवाईकांची चौकशी आणि त्यांना त्रास देण्याचे काम चालू असल्याचा आरोप मयताचे मावसभाऊ भागाजी आवटे यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास संशयास्पद असून ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचे काम चालू आहे. मयताचा खून हा जमीन आणि प्रॉपर्टी साठी झाला असल्याचा आरोप देखील आवटे यांनी केला आहे. एप्रिल…
शिक्षणाचे खासगीकरण व कंत्राटीकरण थांबवा थांबविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह संघटनांचे पदाधिकारी उतरले रस्त्यावर… शिक्षणाची प्रयोगशाळा थांबवा- आमदार तांबे महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर -शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असून गोरगरीब, आदिवासी, शेतमजूर यांच्या मुलांचा शिक्षणाचा हक्क शासन चुकीच्या धोरणातून हिरावून घेत आहे. सरकारने शिक्षणाची प्रयोगशाळा तातडीने बंद करावी, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे युवा आमदार सत्यजित तांबे यांनी केली. शिक्षणाचे खाजगीकरण, कंत्राटी भरती, समूह शाळा या निर्णयाविरोधात संगमनेर तालुका समन्वय समितीच्यावतीने विद्यार्थी, पालक, शिक्षक, विविध शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांसह विविध संघटनांच्यावतीने यशोधन कार्यालय ते प्रांताधिकारी कार्यालय असा विराट जनआक्रोश मोर्चा शनिवारी काढण्यात आला होता. यामध्ये विधान परिषदेचे युवा आमदार सत्यजित तांबे, माजी…
महाराष्ट्र संवाद न्यूज समन्यायी पाणी वाटपाचे तत्व हे तत्कालीन काळजीवाहू सरकारच्या काळात अधिकारी पातळीवर ठरविले गेले होते. हे तत्व आपल्याला देखील मान्य नसल्याने या विरोधात सर्वप्रथम संगमनेरनेच आंदोलने करीत आवाज उठविला असल्याचे स्पष्ट करत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी, त्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आपण निळवंडे धरण आणि कालव्यांचा प्रश्न मार्गी लावल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते जलनायक, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर,…
