Author: अनंत पांगारकर
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती येत असून इतर मागासवर्गीय व सोसायटी विमुक्त जाती भटक्या जमाती या गटाची मतमोजणी पार पडली आहे. या गटातून शेतकरी विकास मंडळाच्या दोन्ही उमेदवारांनी विजय मिळविला आहे. सुधाकर ताजने आणि अनिल घुगे यांचा विजयी उमेदवारात समावेश असून त्यांनी जनसेवा मंडळाच्या शरद गोर्डे आणि संदीप घुगे यांचा पराभव केला आहे. या विजयामुळे शेतकरी विकास मंडळाचे संख्याबळ 6 वरून 8 वर गेले आहे तर अपक्ष सचिन करपे निवडून आले. राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील जनसेवा मंडळाला या निवडणुकीत अद्यापही खाते खोलता आलेले नाही. सोसायटी…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती येत असून ग्रामपंचायत सर्वसाधारण या गटाची मतमोजणी पार पडली आहे. या गटातून शेतकरी विकास मंडळाच्या दोन्ही उमेदवारांनी विजय मिळविला आहे. अरुण वाघ आणि सखाहरी शरमाळे यांचा विजयी उमेदवारास समावेश असून त्यांनी जनसेवा मंडळाच्या जनार्दन आहेर आणि संदीप देशमुख यांचा पराभव केला आहे. या विजयामुळे शेतकरी विकास मंडळाचे संख्याबळ चार वरून 6 वर गेले आहे तर अपक्ष म्हणून निवडून आलेले सचिन करपे थोरात यांच्या समर्थक मानले जातात. विशेष म्हणजे निवडणूक प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील जनसेवा मंडळाला या निवडणुकीत अद्यापही…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती येत असून हमाल मापारी या गटाची मतमोजणी पार पडली आहे. या गटातून अपक्ष सचिन कर्पे यांनी विजय मिळविला आहे. विजयी झालेल्या कर्पे यांनी शेतकरी विकास मंडळाच्या महेंद्र गुंजाळ आणि जनसेवा मंडळाच्या सोमनाथ दिघे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. कर्पे हे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे समर्थक असल्याने ते शेतकरी विकास मंडळ सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळाचे संख्याबळ 5 वर गेले असून विरोधी राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज शुक्रवारी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. अपेक्षेप्रमाणे व्यापारी गटातून शेतकरी विकास मंडळाचे मनसुख भंडारी निसार ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गटातून निलेश कडलग, अनुसूचित जाती जमाती मधून संजय खरात, ग्रामपंचायत गटातून संजय खरात आणि निलेश कडलग मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. बाजार समितीच्या 18 जागांसाठी 45 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यात कृषी पतसंस्था मतदारसंघातून सर्वसाधारण गटात 18, महिला राखीव गटात 4, इतर मागास प्रवर्ग गटामध्ये 2, विमुक्त जाती भटक्या जमाती गटामध्ये 2, ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण जागेवर 6, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून 2, दुर्बल घटक प्रवर्गातून 2, व्यापारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज शुक्रवारी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडले. शांततेत आणि उत्साहात झालेल्या या निवडणुकीत 97.12 टक्के मतदान झाले. संगमनेरच्या जनता नगर मधील राजमाता जिजाऊ शाळेमध्ये शुक्रवारी सकाळी मतदानाला प्रारंभ झाला सायंकाळी चार वाजता मतदान संपले इतर शनिवारी सकाळी याच शाळेमध्ये मतमोजणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. एकूण 3614 मतदारांपैकी 3510 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास मंडळ आणि राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळामध्ये सरळ लढत झाली. कृषी उत्पन्न…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहरासह परिसरात शुक्रवारी (ता.२८) दुपारी अवकाळी पावसासह तुरळक गारा पडल्या. वादळी वाऱ्याने गुंजाळवाडीच्या आरगडेमळा येथील भाऊसाहेब सोमनाथ आरगडे यांच्या दोन खोल्यांचे पत्रे उडून मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी छोटे वृक्ष छोटे वृक्ष उन्मळून पडले तर फ्लेक्स बोर्ड फाटले होते. साकुरमध्ये सकाळी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. संगमनेर तालुक्याच्या बहुतांशी भागात शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तुरळक गाराही पडल्या. त्यानंतर वादळी वाऱ्याला सुरूवात झाली आणि काही क्षणातच वाऱ्याचा वेग प्रचंड वाढल्याने अनेक ठिकाणी छोटे वृक्ष उन्मळून पडले. वादळामुळे फ्लेक्स देखील अस्ताव्यस्त होऊन फाटले होते. शहरालगतच्या गुंजाळवाडी येथे भाऊसाहेब आरगडे यांच्या दोन खोल्यांचे पत्रे थेट उडून हजार…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरच्या पेटलेल्या वाळू तस्करीमुळे जर महसूल खाते बदनाम होणार असेल तर मला तुमच्यावर कारवाई करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही, अशा स्पष्ट शब्दात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरमधील तलाठी, ग्रामसेवकांना इशारा दिला आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल मंत्रीपदाचा पदभार हाती घेतल्यानंतर संगमनेरच्या अवैध वाळू तस्करीकडे आपले लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे येथील वाळू तस्करीला काही अंशी लगाम बसला. तसेच राज्यभरातील वाळू तस्करी लक्षात घेत त्यांनी वाळू संदर्भात नवीन धोरण आणले आहे नव्या धोरणाची अंमलबजावणी येत्या महाराष्ट्र दिनापासून (१ मे) करण्यात येणार आहे. असे असले तरी संगमनेर शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू…
महाराष्ट्र संवाद न्यूज तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गुंठेवारी प्रकरणे केल्याच्या तक्रारी मोठ्या प्राप्त झाल्या आहेत. या सर्व प्रकरणांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आढावा बैठकीत दिली. मंत्री विखे यांच्या उपस्थितीत संगमनेरमध्ये जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात होते. बैठकीत घुलेवाडी, संगमनेर खुर्द या जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये सुरु असलेल्या शासकीय योजनांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. उपस्थित ग्रामस्थ आणि पदाधिका-यांनी केलेल्या विविध प्रश्नांबाबत गांभिर्याने दखल घेण्याच्या सुचना मंत्र्यांनी दिल्या. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, गटविकास आधिकारी अनिल नागणे यांच्यासह सर्व शासकीय विभागाचे आधिकारी, वसंतराव देशमुख, गुलाबराव सांगळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, शहराध्यक्ष श्रीराम…
महाराष्ट्र संवाद न्यूज वर्दळीच्या नवीन नगर रोड परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून एका दुकानात काम करणाऱ्या मुलीचा सलग दोन दिवस पाठलाग करत तिची छेड काढणाऱ्या तरुणाविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुरुवारी रात्री पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमान शब्बीर सय्यद (कब्रस्थान जवळ, नाईकवाडपुरा, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. सर्वत्र लव्ह जिहादचे प्रकार समोर येत असताना संगमनेरातील अशा वाढत्या घटनांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत माहिती अशी, नुकतेच बारावीचे पेपर दिलेली साडे सतरा वर्षाची मुलगी गेल्या चार-पाच दिवसांपासून नवीन नगर रोड परिसरातील एका दुकानांमध्ये काम करत असून बुधवारी डोक्यात मुस्लिम समाजात घातली जाते तशी पांढरी टोपी…
महाराष्ट्र संवाद न्यूज तब्बल तीन मंत्री, प्रमुख अधिकाऱ्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर महसूलमंत्र्यांच्या लोणीच्या दिशेने निघालेले लाल वादळ अखेर संगमनेरच्या सीमेवर थांबले आहे. सरकार आंदोलकासोबत असल्याचा विश्वास आंदोलकांना दाखविण्यात आला. मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले. संगमनेरच्या प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर यासंबंधीची घोषणा तीनही मंत्र्यांनी आंदोलन स्थळी केली. शेतकरी, आदिवासी आणि कामगारांचे विविध प्रश्न घेत राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर महा मुक्कामासाठी अकोल्याहून किसान सदस्य विविध संलग्न संस्थांनी बुधवारी पायी मोर्चा सुरू केला होता. शनिवारी मोर्चा धांदरफळमध्ये (संगमनेर) मुक्कामाला होता. मोर्चा अकोल्यातून सुरू होण्यापूर्वी महसूल तथा पालकमंत्री विखे पाटील यांनी मोर्चेकर्यांना सकारात्मक…
