Author: अनंत पांगारकर
लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी भाजपाच्या धर्मांध व्यवस्थेला उखडून टाका: काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यात आणि देशात हुकूमशाही पद्धतीने सध्या कारभार सुरू आहे. भाजप जाती-जातीत आणि धर्मामध्ये फुट पाडून राजकीय पोळी भाजत आहे. विरोधकांचा आवाज दडपण्याचे काम सुरू आहे. हे लोक देशातील लोकशाही आणि संविधान संपवण्याचे काम करत असून, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे याचाच भाग आहे. लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी भाजपाच्या धर्मांध व्यवस्थेला उखडून टाका, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. पटोले म्हणाले, मनुवादी व्यवस्थेने अन्नदाता, गरीब माणूस, छोटे दुकानदार यांना बरबाद करण्याचे काम केले. मोदी- अदाणींचा संबंध काय? अदाणींच्या कंपनीत शेल कंपन्यांचे २० हजार कोटी रुपये कुठून आले? फक्त अदानीलाच देशातील आणि परदेशातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज देश सध्या एका वेगळ्या संक्रमणातून जात आहे. सार्वभौम लोकशाही व्यवस्था आणि संविधानाला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाल्याने संविधान वाचावं, लोकशाही वाचावी या उद्देशाने काँग्रेसने राज्यात वेगवेगळी आंदोलने सुरू केली असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हा प्रतिनिधी मधुकरराव नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समवेत मिलिंद कानवडे होते. नवले म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना ही जगातील सर्वात सामर्थ्यवान राज्यघटना असून सध्या याच घटनेच्या तत्त्वांची पायमल्ली होत आहे. विरोधात बोलणाऱ्या विरोधकांचा आवाज बंद करण्याचे काम लोकशाहीला घातक असून सर्वांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज स्वतःला महाविकास आघाडीचे नेते म्हणून घेणारे सोयीनुसार राजकारण करत आहे. पदवीधर निवडणुकीत त्यांना महाविकास आघाडी आठवली नाही, तेव्हा ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला. आत्ताही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोचा वापर करत पोपटपंची करणारे महाविकास आघाडीशी तरी प्रामाणिक आहेत का? असा सवाल राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत २७ कोटी रुपयांचा नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व एक कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला. अध्यक्षस्थानी बापूसाहेब गुळवे…
महाराष्ट्र संवाद न्यूज मावळत्या आर्थिक वर्षासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने संगमनेर तालुक्याला दिलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करतानाच तालुक्याने महसूल वसुलीचा नवा उच्चांक तयार केला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात संगमनेर तालुक्याची १४१% वसुली झाली असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. कोरोना महामारीनंतर अर्थव्यवस्था पुन्हा वेग घेताना दिसत आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी संगमनेर विभागाला १५ कोटी ६९ लक्ष रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३१ मार्च अखेर हे उद्दिष्ट ओलांडत संगमनेर तहसीलने तब्बल २२ कोटी २० लाख रुपयांची महसूल वसुली केली आहे. टक्केवारी मध्ये हा आकडा १४१% इतका आहे. गत आर्थिक वर्षात देखील संगमनेर तालुका महसूल विभागाने १२५% वसुली पूर्ण करण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी: रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ न करता राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा निर्णय महसूल विभागाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. या जनहितार्थ निर्णयामुळे जनतेला दिलासा मिळेल असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला. वार्षिक बाजार मुल्य दर म्हणजेच रेडी रेकनरचे दर प्रत्येक वर्षी १ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येतात. त्यानुसार स्थावर व जगंम मालमत्तेचे सरासरी दर निश्चित करण्यात येतात. यावर्षी क्रेडाई, विकासक व इतर सामान्य नागरिकांकडून जमीन व इमारत या मिळकतींचे दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात येऊ नये अशी विनंती राज्य शासनास करण्यात येत होती. या निवेदनांचा सकारात्मक विचार करुन रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर: जिल्ह्यात २९ मार्च ते ११ एप्रिल २०२३ या कालावधीत सण, उत्सव, जयंती, साजरे होणार आहेत. पोलीस भरती परीक्षा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अन्वये जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या आदेशानुसार वरील कालावधीत अहमदनगर शहर व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अहमदनगर शहर व संपूर्ण जिल्हा हद्दीत सण, उत्सव, सभा, आंदोलने त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरील पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही किरकोळ घटनावरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात २९ मार्च ते ११ एप्रिल २०२३ या कालावधीत…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध व्यक्तिगत लाभाच्या योजनांपोटी संगमनेर तालुक्यातील १९ हजार १२३ लाभार्थ्यांना मार्च २०२३ अखेर १ कोटी ५३ लाख २४ हजार रुपयांचे अनुदान मंजुर झाले आहे. महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग झाले आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून विविध सामाजिक योजनांची अंमलबजावणी केली जाते. सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वर्गासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटूंबलाभ योजना अशा…
महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील देवस्थान परिसर सुशोभीकरण कामांसाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ३ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात देण्यात आलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने मोठा निधी मिळवला असून तालुक्यातील प्रत्येक गावातील वाडी वस्तीसाठी विकासाच्या योजना राबवल्या आहेत. आ. थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या मागणीवरून व पाठपुराव्यातून तालुक्यातील विविध गावांकरता प्रादेशिक पर्यटन विकास योजना २०२२-२३ अंतर्गत जिल्हास्तरावरील नवीन कामांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहर आणि परिसरामध्ये गुरुवारी राम नवमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आजी-माजी मंत्र्यांसह विद्यमान आमदारांच्या सहभागामुळे शोभा यात्रेची रंगत आणखी वाढली होती. श्रीराम नवमी निमित्ताने विश्व हिंदू परिषद बजरंग दल, दुर्गावाहिनी-मातृशक्ती आयोजित शोभायात्रेला अभिनव नगर मधील श्रीराम मंदिरात सायंकाळी साडेपाच वाजता हनुमान चालीसा व आरतीने सुरुवात करण्यात आली. गीता परिवाराच्यावतीने यावेळी हनुमान चालीसांचे वाटप करण्यात आले. बस स्थानक परिसरात रामराज्य प्रतिष्ठानने केलेली विद्युत रोषणाई पाहण्यासाठी संगमनेरकरांनी गर्दी केली होती. शोभायात्रेत सुरुवातीला सनई चौघडे, घोडे, उंट, लहान मुले श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, हनुमान,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : नाशिकच्या नवरचना माध्यमिक विद्यालयातील संस्कृत विभागप्रमुख आणि संगमनेर स्वायत्त महाविद्यालयाच्या संस्कृत संशोधन केंद्रातील विद्यार्थिनी शकुंतला मुदलियार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान केले आहे. त्यांनी संगमनेर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातील माजी विभाग प्रमुख डॉ. रुपाली कापरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदवी प्राप्त केली. याबद्दल शकुंतला मुदलियार यांचे संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. अरुण गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र तासिलदार, बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भावे, श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. आप्पासाहेब गुंजाळ, महाविद्यालयाचे कुलसचिव संतोष फापाळे आदींसह प्राध्यापक उपस्थित होते. प्रोफेसर गायकवाड म्हणाले, शकुंतला मुदलियार यांनी विद्यार्थी दशक संगमनेर महाविद्यालयात…
