Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाभारताचे युद्ध पांडवांनी जिंकले याचे कारण त्यांचा सल्लागार कृष्ण होता. आपल्या जीवनामध्ये आर्थिक नियोजनासाठी आणि आपले ध्येय प्राप्त करण्याकरता तज्ज्ञ सल्लागार असेल तरच ते ध्येय साध्य होईल, असे प्रतिपादन आर्थिक गुंतवणूक तज्ज्ञ सुनील कडलग यांनी केले. येथील औद्योगिक वसाहतीमधील सह्याद्री ऍग्रोव्हेेटतर्फे कामगारांच्या जीवनामध्ये आर्थिक नियोजनासाठी मार्गदर्शन मेळावा म्हणून ‘चला अर्थसाक्षर होऊयात’ हा उपक्रम राबवण्यात आला. त्यावेळी कडलग बोलत होते. अध्यक्षस्थानी सह्याद्री ॲग्रोव्हेटचे संचालक नितीन हासे होते. व्यासपीठावर धनश्री हासे, टीव्ही अभिनेते सुरेश डोंगरे आदी उपस्थित होते. कडलग म्हणाले, जीवनामध्ये सल्लागाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या जीवनात मुला-मुलींचे शिक्षण, त्यांचे लग्न, आपली सेवानिवृत्ती आणि जीवनामधील अल्पकालीन व दीर्घकालीन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान तक्रारदारा विरोधात आणखी गुन्हे दाखल आहेत का याची चौकशी करून न्यायालयात अहवाल देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा परिविक्षा अधिकारी महेश अनंतराव पाटील यांना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. पाटील यांच्या विरोधात नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथील तक्रारदाराविरोधात २०२० मध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे.न्यायालयाने या तक्रारदारा विरोधात आणखी काही गुन्हे दाखल आहेत का याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिविक्षा अधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शहरालगतच्या समनापुर बायपासवर शहर पोलिसांनी एका संशयास्पद टेम्पोमधून सुमारे दोन लाखाचे गोमांस ताब्यात घेतले आहे. टेम्पो आणि गोमांस असा सुमारे नऊ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांच्या या कारवाईवरून ऐन दिवाळीतही शहरातील कत्तलखाने सर्रासपणे सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संगमनेरातील गोहत्या थांबणार कधी? असा प्रश्न गो प्रेमींनी उपस्थित केला आहे. गोवंश कत्तलीचे संगमनेर हे राज्यातील सर्वाधिक मोठे केंद्र म्हणून समोर येत आहे येथील बेकायदेशीर कत्तलखान्यांमध्ये सर्रासपणे जनावरांचे हत्या करून त्यांचे मांस राज्यासह देशाच्या विविध भागात पाठविले जाते. वारंवार होणाऱ्या पोलिसांच्या कारवाया आणि यातून बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात हाती लागणारा मुद्देमाल, यामुळे येथील कत्तलखाण्याची महती लक्षात येते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आता सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रायव्हेट प्रॅक्टिस केली तर त्यांना थेट सेवेतून डिसमिस केले जाणार आहे. प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी हा शेवटचा इशारा असेल, रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा आणि हेळसांड सहन केली जाणार नाही असे सांगत डॅशिंग आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.धडाकेबाज निर्णय आणि कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी डॅशिंग अधिकारी म्हणून नावलौकिक असलेल्या तुकाराम मुंढे यांनी आरोग्य सेवा तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदाचा पदभार घेताच पुन्हा एकदा धडाकेबाज निर्णयांना सुरुवात केली आहे. याची प्रचिती त्यांच्या मराठवाड्यातील दौऱ्यात आली आहे. आरोग्य विभागाचा पदभार हाती घेतल्यानंतर मुंढे मराठवाड्यातील बीडच्या जिल्हा रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेस अध्यक्षपदी वर्णी लागतात मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसमध्ये धक्कादायक निर्णयांना सुरुवात केली आहे. पदभार हाती घेताच त्यांनी काँग्रेसचा आत्मा समजली जाणारी काँग्रेस वर्किंग कमिटी (CWC) बरखास्त करीत नवी सुकाणू समिती जाहीर केली. काँग्रेसच्या नव्या सुकाणू समितीत अनेक बड्या नेत्यांना दूर ठेवण्यात आले असल्याचे दिसते. नव्या वर्किंग कमिटीमध्ये महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता काँग्रेसमध्ये आहे. या समितीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा खासदार सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना स्थान देण्यात आले आहे. जोपर्यंत काँग्रेसची नवी कार्यकारिणी स्थापन होत नाही तोपर्यंत पक्षाचे कामकाज या सुकाणू समितीच्या माध्यमातून चालणार आहे. नवीन समिती सहजपणे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पुस्तकांचं गाव भिलार (महाबळेश्वर) येथे शनिवारी (२९ ऑक्टोबर) होणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते होणार असून अधिवेशनाच्या अध्यक्षपदी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील तर स्वागताध्यक्षपदी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, स्वागत कार्याध्यक्षपदी सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे उपस्थित राहणार असल्याची माहिती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक ,अध्यक्ष राजा माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी संघटनेच्यावतीने राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिल्या जाणाऱ्या “महाराष्ट्र महागौरव” पुरस्कारांची घोषणा करण्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सर्वत्र दीपावली पाडव्याच्या सण उत्साहात साजरा होत असताना संगमनेर तालुक्यातील साकुरमधून दुःखद घटना समोर आली आहे. सातपूर नजीक पिंपळगाव देपा गावात झालेल्या दुचाकी आणि छोटा हत्ती टेम्पोच्या अपघातात मोटरसायकलवरील दोघा तरुणांचा मृत्यू झाला.ओम राहूल पेंडभाजे (वय १९ वर्ष) व शुभम सदाश‍िव टेकुडे (वय १८ वर्ष, दोघे रा. देवगिरी वस्ती, साकूर, ता. संगमनेर) अशी अपघातात ठार झालेल्या दोघा तरूणांची नावे आहेत. घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास साकुरहून मोटार सायकलवर हे दोघे तरुण संगमनेरच्या दिशेने येत असताना संगमनेरकडून साकुरच्या दिशेने जाणाऱ्या छोटा हत्ती टेम्पोने या तरुणांच्या दुचाकीला पिंपळगाव देपा गावाच्या शिवारात जोराची धडक दिली.अपघातानंतर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी फोनवर ‘वंदे मातरम’ म्हणावे, वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्या पिस्क्रीप्शनवर ‘श्रीहरी’ लिहावे, अशा सरकारच्या फतव्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वेगळीच मागणी केली आहे. या मागणी संदर्भात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र देणार आहेत. देशात सुख-समृद्धी हवी असेल तर भारतीय रुपयांवर महात्मा गांधींसोबत लक्ष्मी-गणेश यांचे छायाचित्र असायला हवे असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले आहे. बुधवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी ही मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. केजरीवाल म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीतून जात आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे दिवसेंदिवस अवमूल्यन होत आहे. याचे परिणाम सर्वसामान्यांवर दिसू लागले आहेत. देशातील सामान्यांचे हाल होत असून हा देश समृद्ध…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेनेत उद्भवलेला पेच अद्यापही कायम आहे. आपल्या गटाला समर्थन असल्याचे सिद्ध करण्यासाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रापैकी तब्बल अडीच लाख प्रतिज्ञापत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने अवैध ठरविले आहे. तर उर्वरित प्रतिज्ञापत्र वैध असल्याचा निर्वळा आयोगाने दिला आहे.चार महिन्यांपूर्वी झालेल्या शिवसेना फुटीनंतर तात्पुरत्या स्वरूपात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविल्यामुळे पक्षाच्या अडचणी वाढल्या असतानाच आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा नवीन निर्णय समोर आला आहे. दरम्यान शिवसेना नावावर आणि धनुष्यबाण चिन्हावर ठाकरे आणि शिंदे दावा केल्यानंतर हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला होता.त्यामुळे आपल्याच गटाला पदाधिकारी कार्यकर्त्यांचे समर्थन असल्याचे दावा करणारे प्रतिज्ञापत्रे ठाकरे-शिंदे गटातर्फे निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. ठाकरे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क बालकांच्या हृदयरोगाबाबत झालेली जनजागृती आणि सर्वसामान्य रुग्णांच्या मागणीमुळे या महिन्यात पुन्हा एकदा एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये बालकांच्या हृदय उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महिन्यात तब्बल आठवडाभर बालकांवर मोफत हृदयउपचार करण्यात येणार आहेत.गेल्या दोन महिन्यांत आयोजित करण्यात आलेल्या बालकांवरील मोफत हृदयउपचार आरोग्य शिबिरास भरघोस प्रतिसाद मिळाला. तब्बल ८२ बालकांवर यशस्वी हृदय उपचार करण्यात आले. ठाणे, पालघर जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांचा या आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला. आज २६ ऑक्टोंबरपासून या शिबिरास सुरुवात होणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी संपर्क साधावा असे आवाहन एसएमबीटी हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारांवरील उपचार होत आहेत. गंभीर आजारांवरील…

Read More