Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून वंचित राहिलेल्या घटकांना लाभ देण्यासाठी संगमनेर शहरात दिनांक २७ व २८ डिसेंबर रोजी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध योजनांसाठी पात्र असलेले परंतु लाभापासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणे , जनजागृती करणे याबरोबरच लाभार्थ्यांशी संवाद करून या विकसित यात्रेत अंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. शहरातील बस स्थानक परिसर येथे उद्या, दि. २७ रोजी दुपारी २.३० वाजता व २८ डिसेंबर रोजी सकाळी १०…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : आगामी निवडणुकीत भाजपाला ३५० ते ३७५ जागा मिळतील आणि पुन्हा भाजपा सत्तेत येईल. भाजपा देशात उत्तम काम करत आहे. त्यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपला नक्कीच यश मिळेल आणि पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील. देशाकडे भाजपाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे मोठे वक्तव्य नाना पाटेकर यांनी केले आहे. नाना पाटेकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. ज्यावेळी त्यांनी निवडणुका आणि देशाचे राजकारण याबाबत वक्तव्य केले आहे. नानांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकारणात याबाबतची जोरदार चर्चा रंगली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांनाच लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. ज्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष हे…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून काही दिवसांपूर्वी मानद डॉक्टरेट ही पदवी देण्यात आली होती. आता त्या पाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली जाणार आहे. मंगळवारी संध्याकाळी मुंबई विद्यापीठाच्या दिक्षांत सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे. फडणवीस यांनी केलेल्या कार्याची दखल घेत ही पदवी प्रदान केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीसांचे जपानमध्ये मराठमोळ्या पद्धतीने जोरदार स्वागत करण्यात आले होते. जपान आणि भारतातले संबंध दृढ करण्यासाठी हा दौरा त्यांनी केला होता. त्यानंतर आज जपानकडून त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात येणार आहे. विशेष बाब…
संगमनेरमध्ये विद्यार्थ्यांवर उपचार सुरू महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरकडे येणाऱ्या एसटी बसचा एक्सेल तुटल्याने एसटी बस पलटी झाली. या अपघातामध्ये साधारणता ४० विद्यार्थी जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी संगमनेरमध्ये आणण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस राहुरीहून सकाळी संगमनेरच्या दिशेने येत असताना पिंपरणे गावाच्या शिवारात हा अपघात झाला. या बसमध्ये बहुसंख्य विद्यार्थीच होते. हे सर्वजण संगमनेरला येत असताना मंगळवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक आणि यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – मानवता हाच जगातील सर्वात मोठा धर्म आहे. सुख समाधान व शांतीसाठी सर्वांनी प्रेमाने एकत्र राहावे, हा संदेश देणारा नाताळ सण असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी करीत नाताळ व नवीन वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी ‘गाणी येशू जन्माची’ या कार्यक्रमानंतर शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, विश्वास मुर्तडक, प्रा. बाबा खरात, आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. बाबा खरात यांच्या मार्गदर्शनाखाली जॉर्ज चोपडे, ॲड. अरविंद राठोड, सत्यानंद कसाब, विजय खंडीझोड, राजेंद्र सांगळे, स्वप्नील कसाब, भाऊसाहेब नेटके, डॉ. हेमलता राठोड, प्रतीक खरात, प्रांजल…
महाराष्ट्र संवाद न्यूज जिथे आपण सर्वजण एकत्र राहतो, एकमेकांना आधार देतो, सुखदुःखे वाटून घेतो. ती वास्तू फक्त आनंदी नसावी तर समाधानी असावी. आनंद हा भौतिक पातळीवर असतो आणि समाधान आत्मिक पातळीवर असते. साखर, लिंबू, मीठ हे सारे पदार्थ आपापल्या आनंदात एकत्र रहातात. पण जेंव्हा ते एकमेकांत मिसळतात, तेंव्हाच विलक्षण मधुर चवीचे सरबत तयार होते. त्यासाठी लिंबाला कापून आणि पिळून घ्यावे लागते तर मीठ व साखरेला पाण्यात विरघळून एकजीव व्हावे लागते. म्हणून पती-पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत. कारण गृहमंदिरात जर पती-पत्नी मनाने एकरूप झाले, तर चवदार सरबत नाही तर मधुर-अमृत तयार होईल. आपले आईबाबा एकमेकांशी किती प्रेमाने वागताहेत हे बघून…
महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – मैत्रिणींसह अकोले तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या सांदण दरीचे निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी आलेल्या मुंबईतील तरुणीचा दरीत कोसळून मृत्यू झाला. ऐश्वर्या खानविलकर (वय 24 वर्ष, रा. दहिसर, मुंबई) असे या तरुणीचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून राजुर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत या तरुणीचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठविला आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. मुंबईतून काही मैत्रिणी भंडारदरा धरण परिसरासह सांदण दरी बघण्यासाठी आल्या होत्या. यावेळी यातील ऐश्वर्या खानविलकर हिचा खडकावरून पाय घसरल्याने ती खाली पडली. खडकावर पडल्याने डोक्याला मार लागून या तरुणीचा मृत्यू झाला. घटनेची…
महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री, काँग्रेस नेते, आमदार सुनील केदार यांना न्यायालय पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आता केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर नागपूर पोलिसांनी विधीमंडळाला केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली. यासंबंधीचे न्यायालयाचे आदेश देखील विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवण्यात आले आहे. त्यानंतर केदार यांची २२ डिसेंबर पासून आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला. २००१-२००२ मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्विसेस आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्विसेस या खाजगी कंपन्यांच्या मदतीने बँकेच्या रकमेतून सरकारी रोखे खरेदी केले होते.…
महाराष्ट्र संवाद न्यूज प्रवीण पुरो @ 9869991868 प्रचंड तटबंदी असलेल्या लोकसभेच्या सभागृहात दोन तरुणांनी अनाहुत केलेल्या प्रवेशाने सारा देश अचंबित झाला. असुक्षित म्हणून ज्या जुन्या संसद भवनावर बोट दाखवणार्या सत्ताधार्यांनी उभ्या केलेल्या नव्या संसद भवनाचा तट ओलांडून थेट संसदेच्या सभागृहात उड्या मारत हल्ला करता येऊ शकतो, हे या तरुणांनी सार्या देशाला आणि जगाला दाखवून दिलं. नवं संसद भवन आणि त्याला असलेली सुरक्षा किती तकलादू आणि कामचलाऊ आहे, याचं प्रत्यंतर या घटनेने देशाला दिलं आहे. आता या तरुणांचे पाठीराखे कोण याचा शोध घेऊन त्या घटनेशी काँग्रेस वा इतर विरोधकांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न होईल. लातूर आणि चेन्नईच्या नावामुळे त्या चर्चेला ऊत आला…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – एरव्ही त्याच्या दहशती आणि जीवघेण्या कृत्याबद्दल सर्वच ऐकून होते. शुक्रवारच्या सकाळीच त्याने नासिक-पुणे महामार्ग ओलांडत मालपाणी लॉन्समध्ये प्रवेश केला. थोडा वेळ तेथे रेंगाळल्यानंतर त्याने भिंतीवरून उडी घेत थेट मागच्या बाजूला असलेल्या पद्मनगर तेथून जवळच्याच आदर्श कॉलनीमध्ये प्रवेश केला. थांबण्यासाठी तेथे त्याला पत्र्याचे शेड दिसली आणि त्याने तेथेच काही काळ मुक्काम ठोकला. परिसरासह आसपास असलेल्या नागरिकांचे भीतीने गाळण उडाली आणि बघता बघता ही वार्ता शहरात पसरली. शुक्रवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास नाशिक पुणे हायवेलगत असलेल्या मालपाणी लॉन्स मध्ये एका बिबट्याने प्रवेश केला होता. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार पाहिल्यानंतर त्याने लगेचच तेथील कर्मचाऱ्यांना याची माहिती…
