Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाइन संगमनेर: नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात सतत सुरू असलेल्या पावसामुळे आज (मंगळवारी) दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान अचानक दरड कोसळल्याची घटना घडली आहे. घाटातून जाणाऱ्या महामार्गावरील मलबा हटवण्याचे काम प्रशासनाकडून वेगाने सुरू आहे. गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे घाटातील मोठे दगड आणि मातीचा ढिगारा कोसळून थेट रस्त्यावर आला आहे. यामुळे या महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या येणारी-जाणारी वाहने एकाच बाजूने वळविण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासकीय यंत्रणा आणि मदतकार्य पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या रस्त्यावरील मोठे दगड आणि मलबा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जिल्ह्यात जोरदार पुनरागमन केले असून भंडारदरा, मुळा आणि कुकडी समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पुनर्वसु नक्षत्राच्या सरींचे तांडव सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले ओसंडून वाहत असून धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. भंडारदरा धरण आज (मंगळवारी) संध्याकाळपर्यंत निम्मे भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, तर मुळा नदीला छोटा पूर आल्याने धरणाचा साठा ३० टक्क्यांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. दरम्यान, अतिवृष्टी आणि सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने भंडारदरा आणि मुळा पाणलोटातील सर्व प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांना पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे. निळवंडे धरणाचा साठाही २० टक्क्यांवर- भंडारदरा धरण क्षेत्रात रविवारी आणि सोमवारी झालेल्या तुफान…

Read More

आजचे राशिभविष्य ​मेष – आज चंद्र बाराव्या स्थानी असल्याने आरोग्याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सर्दी, खोकला किंवा शारीरिक अस्वस्थता जाणवू शकते. इतरांच्या कामात नाहक हस्तक्षेप करणे टाळावे, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी आणि कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार आज करू नयेत. ​वृषभ – आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ आणि फलदायी ठरेल. चंद्र लाभ स्थानात असल्यामुळे धनवृद्धी आणि नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत. व्यापारी वर्गासाठी नवीन करार किंवा सौदे यशस्वी होतील. मित्र आणि कुटुंबियांसोबत आनंदात वेळ व्यतीत होईल. ​मिथुन – नोकरी आणि व्यवसायामध्ये आज आपल्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामगिरीवर प्रसन्न राहतील, ज्यामुळे कामाचा उत्साह वाढेल.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: अयोध्येतील भव्य श्री राम मंदिरामध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची मोठ्या प्रमाणावर चोरी (अपहार) झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर याचे पडसाद उमटत आहेत. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत संगमनेर येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना एक अधिकृत निवेदन सादर करण्यात आले असून, याप्रकरणी संगमनेरमध्ये ‘झिरो एफआयआर’ नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात २५ जून २०२६ रोजी या दान चोरीप्रकरणी एफआयआर क्रमांक ९०/२०२६ अन्वये आधीच गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या विशेष तपास पथकाद्वारे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मात्र, हा गुन्हा केवळ अयोध्येपुरता मर्यादित नसून यामुळे संपूर्ण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासातून संगमनेरकरांची लवकरच शंभर टक्के मुक्तता होईल, असा विश्वास आमदार सत्यजित तांबे यांनी येथे व्यक्त केला. संगमनेर नगरपालिकेच्या वतीने आणि मालपाणी परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या आर्थिक सहयोगातून मालपाणी फार्मच्या आवारात उभारण्यात आलेल्या सुसज्ज श्वान निर्बिजीकरण शस्त्रक्रिया व अँटी रेबीज लसीकरण केंद्राचे उद्घाटन आमदार तांबे यांच्या हस्ते पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या विशेष केंद्राचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी नगराध्यक्ष मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, आरोग्य समिती सभापती किशोर टोकसे, मुख्याधिकारी दयानंद गोरे, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी, जय मालपाणी…

Read More

अनंत पांगारकर- कचऱ्याचे साम्राज्य, जागोजागी पडलेले ढीग आणि दुर्गंधीच्या विळख्यात अडकलेल्या एखाद्या शहराचे रूप पालटून त्याला राज्यातील एक प्रगतशील, स्वच्छ आणि ‘झाडांचे शहर’ बनवणे ही अत्यंत आव्हानात्मक गोष्ट असते. मात्र, जेव्हा एखादी महिला आपल्या शहराला केवळ एक भौगोलिक क्षेत्र न मानता स्वतःचे मोठे घर मानते, तेव्हा तिथे परिवर्तनाची एक नवी आणि सोनेरी पहाट उजाडते. संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष आणि जयहिंद महिला मंचच्या अध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी नेमका हाच अद्भूत चमत्कार संगमनेर शहरात करून दाखवला आहे. म्हणूनच, ‘कचऱ्यात हरवलेली बाई’ अशी स्वतःची प्रांजळ आणि सार्थ ओळख करून घेत, त्यांनी कचरा निर्मूलनाचा आणि शहर सौंदर्यीकरणाचा जो वसा घेतला, तो आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – या राशीच्या व्यक्तींना आज कामाच्या ठिकाणी अत्यंत सकारात्मक वातावरण अनुभवायला मिळेल. व्यवसायात नवीन हितसंबंध जोडले गेल्याने भविष्यात मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होईल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, त्यांच्या मार्गदर्शनाने आज तुमची काही कठीण कामे सुलभ होतील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि संध्याकाळचा वेळ आनंदात जाईल. वृषभ – आज आर्थिक नियोजनासाठी अत्यंत उत्तम दिवस असून जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होऊ शकतात. कार्यक्षेत्रात तुमच्या सहकाऱ्यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे रखडलेले प्रकल्प गतीने पुढे सरकतील. नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी कानावर आल्याने घरातील वातावरण प्रफुल्लित राहील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रिमझिम पावसाच्या धारा, हिरवाईने नटलेला परिसर आणि विठूनामाच्या जयघोषात शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरसाठी निघालेल्या या पालखीचे पारेगाव बुद्रुक येथे सुमारे वीस हजार वारकऱ्यांसह आगमन झाले. यावेळी वारकरी संप्रदायाचे पाईक आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालखीचे भक्तीभावाने स्वागत करून दर्शन व पूजन केले. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, डॉ. जयश्रीताई थोरात, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. हसमुख जैन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह अनेक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: डी. एस. गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय बौद्ध वधू-वर परिचय संमेलन रविवारी (दिनांक १२ जुलै) संगमनेर-लोणी रोडवरील गणपती मंदिराजवळील वसंत लॉन्स येथे होणार असल्याची माहिती पत्रकार गौतम गायकवाड यांनी दिली. सन २०११ पासून प्रतिष्ठानच्या वतीने बौद्ध समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींसाठी या सामाजिक उपक्रमाचे सातत्याने व विनामूल्य आयोजन करण्यात येत आहे. डी. एस. गायकवाड प्रतिष्ठानने सुरू केलेल्या या कौतुकास्पद उपक्रमाला समाजातील सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आला आहे. यापूर्वी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कालकथित प्रेमानंद रूपवते, कालकथित स्नेहाजाताई रुपवते, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकरराव सोनवणे,…

Read More

प्रिय डीजी सदानंद दाते साहेब, अत्यंत सचोटीचे पोलीस अधिकारी म्हणून सारा महाराष्ट्र आपल्याकडे पाहत आहे. कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर, कठोर अशा असंख्य उपाध्या आपल्या नावामागे आहेत. देशात जबाबदारी पेलताना आपण महाराष्ट्रात आल्यानंतर पोलीस दलात सारं काही अलबेल होईल, आपल्यासारखा प्रामाणिक कारभार करण्याचा प्रयत्न आपल्या हाताखालचे अधिकारी व कर्मचारी करतील, अशी धारणा होती. एखाद्या संस्थेचा कारभार त्या संस्थेच्या प्रमुखाच्या नावाने ओळखला जातो. संस्थेतील यशापयश प्रमुखाच्याच खात्यावर नोंदवले जाते. यामुळे आपल्यासारखा कारभार इतरांनीही करावा, ही अपेक्षा गैर नाही. मात्र दुर्दैवाने तसे घडताना दिसत नाही. सक्षम नेतृत्व असूनही महाराष्ट्राच्या पोलिसांना झालंय काय, असा प्रश्न आता पडू लागला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती माधव जामदार…

Read More