Author: अनंत पांगारकर

संगमनेर (प्रतिनिधी): संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, सामान्य नागरिकांच्या मालमत्तेची आणि सुरक्षेची पुरती वाट लागली आहे. भरदिवसा महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले जात असून, बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून रोकड आणि दागिने लंपास केले जात आहेत. या मालिका गुन्ह्यांमुळे संगमनेरमध्ये ‘कायद्याचे राज्य’ उरले आहे की ‘गुन्हेगारांचे वर्चस्व’ वाढले आहे, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. पहिली घटना शहरातील गजबजलेल्या बी.एड. कॉलेज रोडवरील ईदगाह मैदानाच्या गेटजवळ घडली. अनिता संतोष पितळे (रा. सह्याद्री कॉलेजच्या मागे) या आपल्या किराणा दुकानाकडे जात असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जोरात हिसका मारून…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्या वतीने आयोजित दोन दिवसीय मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया शिबिरात परिसरातील सुमारे १५० रुग्णांची तज्ज्ञांमार्फत सखोल तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४७ अत्यंत गरजवंत रुग्णांवर विविध प्रकारच्या प्लास्टिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्याची माहिती प्रकल्प प्रमुख डॉ. सुचित गांधी व राणीप्रसाद मुंदडा यांनी दिली. हे शिबीर दि. ११ व १२ जानेवारी २०२६ या कालावधीत धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये पार पडले. गेल्या २६ वर्षांपासून लायन्स क्लब सातत्याने या उपक्रमाचे आयोजन करत आहे. शारीरिक व्यंगामुळे, विशेषतः फाटलेले ओठ, टाळूवरील छिद्रे, तिरळेपणा, चेहऱ्यावरील डाग, गाठी आणि हाता-पायांच्या जन्मजात दोषांमुळे अनेक व्यक्ती न्यूनगंडाने ग्रासलेल्या असतात. अशा व्यक्तींना आत्मविश्वासाने…

Read More

नामदेव कहांडळ भारत हा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. या युवा पिढीसमोर आज रोजगारापासून ते बदलत्या जीवनशैलीपर्यंत अनेक आव्हाने उभी आहेत. अशा काळात युवकांना केवळ भाषणे ठोकणारा नेता नको, तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालणारा आणि त्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारा मार्गदर्शक हवा असतो. नेमकी हीच भूमिका बजावत जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी समाजकारण, आरोग्य, शिक्षण आणि सहकार क्षेत्रात आपल्या अभ्यासू वृत्तीने स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आज ते उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर जनसामान्यांचे ‘हक्काचे मित्र’ म्हणून ओळखले जातात. डॉ. सुधीर तांबे यांचा प्रवास एका निष्णांत सर्जनपासून…

Read More

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक ठरेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ: आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस मध्यम राहील. व्यवसायात गुंतवणूक करताना सावध राहा. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनावरचा ताण हलका होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. मिथुन: रखडलेली कामे आज पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. प्रवासाचे योग आहेत, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कर्क: आज तुम्हाला नवीन संधी प्राप्त होऊ शकतात, त्यामुळे सतर्क राहा. पैशांचे नियोजन करणे गरजेचे आहे कारण अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून तुम्हाला अपेक्षित…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – ग्रामीण भागातील कलागुणांना वाव मिळावा आणि सामाजिक प्रश्नांची सोडवणूक व्हावी या उदात्त उद्देशाने धांदरफळ बुद्रुक येथे आयोजित ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ व ‘स्वदेश कला उत्सव २०२६’ उत्साहात पार पडला. राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाची सांगता माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या उत्सवाचे उद्घाटन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. सांगता समारंभाप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, धांदरफळ बुद्रुक गावाने ग्रामविकासाची वेगळी दिशा दर्शविली असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोकोपयोगी उपक्रम राबवून या गावाने प्रगतीची घोडदौड सुरू ठेवली आहे. श्री…

Read More

संगमनेर | प्रतिनिधी राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल हाती येत असतानाच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीला मिळणारे यश आणि विरोधकांना बसलेला फटका या पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी एक सूचक ट्विट करत राज्यातील ‘युवा नेत्यांचे’ कान टोचले आहेत. “केवळ आपल्या मनासारखा निकाल लागला नाही म्हणून निवडणूक प्रक्रियेवर संशय घेणे हे लोकशाहीसाठी घातक आहे,” अशा शब्दांत त्यांनी आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. आमदार तांबे यांनी आपल्या ट्विटमध्ये लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांवर विशेष भर दिला आहे. ते म्हणतात की, महापालिका निवडणुकीचे निकाल समोर येत असताना अनेक पक्षांमधील ‘युवा नेते’ आपल्या अपयशाचे खापर…

Read More

​मेष – उद्याचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील आणि वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खुश होतील. मात्र, घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, पण आरोग्याबाबत थोडी जागरुकता बाळगणे आवश्यक आहे. ​वृषभ – आर्थिक दृष्टीकोनातून उद्याचा दिवस लाभदायक ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि एखाद्या शुभ कार्याचे नियोजन होऊ शकते. नवीन व्यावसायिक संबंध जोडले जातील, ज्याचा भविष्यात मोठा फायदा होईल. ​मिथुन – तुमच्या बोलण्याच्या चातुर्यामुळे उद्या तुम्ही कठीण कामेही सहज पूर्ण कराल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. मित्रमंडळींसोबत वेळ मजेत जाईल. परदेशात जाण्याची इच्छा असलेल्यांना काही…

Read More

संगमनेर – अहिल्यानगर जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील अकोले, कोपरगाव आणि संगमनेर या तीनही तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करून त्यांचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रूपांतर करण्यास शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे.  आरोग्य मंत्री आणि शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांच्या उपचाराचा प्रश्न मार्गी लागणार आहे. ​जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, या तीनही तालुक्यांतील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची…

Read More

​संगमनेर | प्रतिनिधी: प्रवरा नदीपात्रातून सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाबाबत महसूल आणि पोलीस प्रशासनाने आता अत्यंत कठोर भूमिका घ्यावी. अवैध वाळू उपसा करणारी व्यक्ती किंवा कार्यकर्ता कोणाचाही असो, त्याला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी न घालता थेट कायदेशीर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. ​लोणी येथे गुरुवारी आयोजित ‘जनता दरबार’ उपक्रमात मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यभरातून व जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची निवेदने स्वीकारून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जनता दरबारात प्रवरा नदीपात्रातून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत पालकमंत्र्यांनी महसूल…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि प्रवाशांच्या मनाला प्रसन्नता देणारा इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानक हा ‘हॅपी हायवे’ सध्या विविधरंगी फुलांनी सजला आहे. राज्याचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कल्पकतेतून साकारलेला हा ९ किलोमीटरचा चौपदरी रस्ता केवळ मजबूत बांधकामासाठीच नाही, तर उत्कृष्ट सौंदर्यीकरणासाठी राज्याचा ‘ट्रेडमार्क’ ठरला आहे. ​या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकांवर गुलाबी, पिवळा, सफेद आणि लाल अशा विविधरंगी फुलांची आकर्षक झाडे लावण्यात आली आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या पादचारी मार्गावरील दाट वृक्षवल्लीमुळे संपूर्ण परिसराला निसर्गरम्य स्वरूप प्राप्त झाले असून, हा रस्ता प्रवाशांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, या मार्गावर अनेक नामांकित महाविद्यालये असल्याने…

Read More