Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेरमध्ये पोलीस यंत्रणेचा धाक संपुष्टात आल्याने शहरातील गजबजलेल्या ठिकाणी अकोल्या नाका परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण लंपास केले आहे. चोरटे पसार झाले असून त्यांचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. गुन्हेगारांवर धाक निर्माण करण्याचे काम पोलीस यंत्रणेचे असते मात्र शहरात गेल्या काही दिवसांपासून हे चित्र दुर्मिळ बनले आहे शहरातील गुन्हेगारीत मोठी वाढ झाली असून दररोज दुचाकी चोऱ्या सुरू असतानाच आता महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र देखील धूम स्टाईलने लंपास करण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. वरवर हे प्रकार किरकोळ दिसत असले तरी पोलीस यंत्रणा मात्र याबाबतीत फारशी गंभीर दिसत नाही. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात खासगीरित्या व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी तसेच कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी राज्यात प्रथमच राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. या समितीच्या स्थापनेचा शासन आदेश निर्गमित झाला असून, 11 सदस्यांच्या समितीची संरचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पशुसंवर्धन आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत होणाऱ्या या समितीत पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, सहायक आयुक्त, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे समन्वयक, कंत्राटी पद्धतीने मांसल कुक्कूट व्यवसाय करणारे तीन शेतकरी, ओपन पद्धतीने मांस कुक्कूट व्यवसाय करणारे शेतकरी, कुक्कूट अंडी उत्पादन करणारे पाच शेतकरी, कुक्कूट…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गायरान जमिनीवरील सरसकट सर्व अतिक्रमणे येत्या 31 डिसेंबर 2022 पर्यंत निष्कसित करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या निष्कासनाच्या  कारवाई करण्यापूर्वी सर्व  प्रशासनाने गायरान जमिनीवरील अतिक्रमनाबाबत 2011 साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. गायरान जमिनीवरील अनुसूचित जाती जमातीचे अतिक्रमण; शाळा; दवाखाने आणि शेती यांना वगळून अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे आहेत. त्या निर्देशांचे पालन करून अतिक्रमण निर्मूलनची कारवाई करताना  दलितांवर अन्याय होता कामा नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अस्मितेला हात घालत बेताल वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपतींविषयी एकाच वेळी दोघांनी केलेल्या विधानामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात राज्यभर आंदोलनांचा सिलसिला सुरू आहे. कोश्यारी यांची हकालपट्टी करावी तसेच भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात असताना आता, खासदार उदयनराजे भोसलेदेखील आक्रमक झाले आहेत. संतापलेले उदयनराजे म्हणाले, कोश्यारी यांचे वय झालेले आहे. आपण काय बोलत आहोत, हे त्यांना समजत नाही. राज्यपालांना कुठेतरी लांब फेकून दिले पाहिजे.…

Read More

यापुढे बेताल वक्तव्य कराल तर राज्यात फिरू देणार नाही; तुमचं धोतर फेडल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाराष्ट्राच्या अस्मितेविरोधात सातत्याने बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने सोमवारी अनोखे आंदोलन केले. डमी राज्यपालांच्या वेशात धोतर, टोपी आणि कोट घालत आंदोलन स्थळी आलेले शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत राज्यपाल कोश्यारी छत्रपतींची माफी मागत असल्याचा प्रसंग उभा केला. वारंवार आपल्या वादग्रस्त विधानांमुळे टीकेचे लक्ष होणारे महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतेच “शिवाजी महाराज हे जुन्या काळचे आदर्श होते” असे वादग्रस्त विधान करून पुन्हा महाराष्ट्रातील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान फोन केला असल्याचे ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावर विविध पक्षाकडून टीका सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील गांधींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. यामुळे विकास आघाडीच्या एकसंघतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र आता खासदार गांधी आणि खासदार राऊत यांच्यातील फोननंतर महाविकास आघाडीतील घटक असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसमधील हे नाते आणखी घट्ट झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. शिवसेना नेते असलेल्या खासदार संजय राऊत यांना ईडीने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क चॅनलमधील मुली साडी का घालत नाहीत, शर्ट आणि ब्राउझर का घालतात, मराठी भाषा बोलताना मराठी संस्कृतीसारखे कपडे आपण का नाही घालत? आपण सगळ्या गोष्टीचे वेस्टनॉयझेशन करत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील पत्रकारांच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद उद्भवण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याचा धागा पकडत भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी समाचार घेतला आहे. ‘टिकलीवर टीका करणारे साडीवर या नेत्यांना सोडणार का…? चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या’ बिंदी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाची चांगलीच झाडाझडती घेतली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आपला कारभार सुधारण्यासाठी त्यांनी महिनाभराचा अवधी दिला आहे त्यानंतर मात्र अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. पालकमंत्री विखे यांच्या उपस्थितीत शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या कामासंदर्भातील आढावा बैठक झाली. यावेळी माजी मंत्री आमदार राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, शिवाजी कर्डिले, वैभव पिचड, बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आदींसह पदाधिकारी उपस्थित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क “नफरत छोडो, भारत जोडो”चा नारा लहान-थोरांमध्ये आता चांगलाच लोकप्रिय झाला आहे. गावामध्ये दुतर्फा उभ्या असलेल्या गर्दीला भारत यात्री साद घालताच त्यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यावरुन ही यात्रा घराघरात पोहचल्याचे दिसत होते. वडशिंगी (जिल्हा बुलढाणा) मध्ये हे चित्र पाहायला मिळाले. हजारो आदिवासी आपल्या मागण्या घेऊन यात्रेत पुढे चालत होते. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील आदिवासी सांगत होते की, वडिलोपार्जित कसलेल्या जमिनींची मालकी मिळावी, सातबारा नावावर करून मिळावा, अशी त्यांची प्रमुख मागणी होती. त्यासोबत शिक्षण, आरोग्य सारख्या मूलभूत सोयी मिळाव्यात या मागण्या घेऊन हजारो आदिवासी महिला पुरुष यात्रेत सहभागी झाले होते. लाल, भगव्या, साड्या, डोक्यावर पदर तर पुरुषांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क प्रबोधनकार म्हणजेच केशव सिताराम ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. प्रबोधनकारांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे नातू म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले आहे. याशिवाय आज ‘प्रबोधनकार डॉट कॉम’या संकेतस्थळाचे लोकार्पण माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होत आहे. प्रबोधनकारांच्या संकेतस्थळाचे निमित्ताने हे दोन्ही नेते आज एकाच व्यासपीठावर येत आहेत. सायंकाळी साडेसात वाजता दादरच्या शिवाजी मंदिरात संकेतस्थळाचा लोकार्पण कार्यक्रम होत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रबोधनकार पोहोचवावे या उद्देशाने ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. दरम्यान, १७ सप्टेंबर २०१० रोजी प्रबोधनकारांच्या…

Read More