Author: अनंत पांगारकर
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्या तुम्ही अत्यंत आत्मविश्वासाने पूर्ण कराल. आर्थिक बाजू मजबूत राहील आणि जुने रखडलेले पैसे परत मिळू शकतात. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, परंतु जोडीदारासोबत बोलताना संयम बाळगणे आवश्यक आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे. व्यवसायात नवीन भागीदारी किंवा फायदेशीर करार होण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. सामाजिक कार्यात तुमची आवड वाढेल आणि मानसन्मान लाभेल. घरातील सदस्यांशी असलेले मतभेद मिटतील आणि वातावरण शांत राहील. संध्याकाळचा वेळ कुटुंबियांसोबत आनंदात जाईल.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, राहाता अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात असणाऱ्या चंद्रपूर गावातील साठवण तलावात बुडून एमबीए (MBA) शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवार, २८ मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. मृत तिघेही लोणी येथील पायरेन्स आयबीएमए (IBMA) कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकत होते. एकाच वेळी तीन तरुण विद्यार्थ्यांचा अंत झाल्याने महाविद्यालयीन वर्तुळासह संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजचे काही विद्यार्थी चंद्रपूर परिसरातील साठवण तलावाजवळ फिरण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान काही जण पाण्याच्या कडेला गेले असता, पाण्याचा आणि पाण्याच्या खाली असलेल्या खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तिघेही अचानक पाण्यात बुडू लागले. सोबत असलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: पुण्यातील नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील खटल्याची सुनावणी गुरुवारी विशेष न्यायालयात पार पडली. पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या १५ दिवसांत या प्रकरणाचे दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले होते. या पार्श्वभूमीवर, घटनेच्या २८ दिवसांच्या आतच न्यायालयाने मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्यावर न्यायालयीन प्रक्रियेनुसार सर्व आरोप निश्चित केले आहेत. आरोपीविरोधात ‘प्राईमा फेसी’ (प्रथमदर्शनी) सबळ पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आता या खटल्याची सुनावणी दररोज ‘इन कॅमेरा’ पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या उपस्थितीत पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्ट, वैद्यकीय चाचण्या, लैंगिक चाचणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, पुणे एका उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर तरुणीने मुठा नदीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली आहे. प्रियकराने केलेल्या फसवणुकीमुळे आलेल्या नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे एका चप्पल विक्रेत्यासोबत प्रेमसंबंध होते. काही महिन्यांपूर्वीच तिने आपल्या कुटुंबीयांना या नात्याबद्दल सांगून लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. कुटुंबाचाही या विवाहाला होकार होता. मात्र, मे महिन्यात अचानक प्रियकराने तिला विसरून जाण्यास सांगत तिची फसवणूक केली. प्रियकराने केवळ आपला वापर केल्याचे समजल्याने ही तरुणी तीव्र मानसिक तणावाखाली होती. भावाने तिला समजावून सांगण्याचा आणि या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि आरोपी नातेवाईकांची नावे वगळण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नाशिकमधून ताब्यात घेतले आहे. जयेश गांगुर्डे असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून, नुकतीच त्याची सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली होती आणि त्याची नाशिक येथे बदलीही करण्यात आली होती. अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास गांगुर्डे याच्याकडे होता. या गुन्ह्यात तक्रारदाराच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी त्याने सुरुवातीला दोन लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर, पोलीस मुख्यालय परिसरात झालेल्या संभाषणादरम्यान एक लाख रुपये लाच घेण्याचे तडजोडीअंती निश्चित झाले. दरम्यान,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जयेश मोतीलाल गांगुर्डे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असून, त्यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या मामासह अन्य १५ नातेवाईकांवर दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी त्यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील तक्रारदाराच्या नातेवाईकांवर ११ मे २०२६ रोजी नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करत होते. या तपासात सहकार्य करण्यासाठी गांगुर्डे यांनी सुरुवातीला दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने १८ मे २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी वेळ उत्तम आहे. व्यवसायात धनलाभाचे योग येत आहेत. कुटुंबातील सदस्यांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. मानसिक शांतता लाभेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची बाजू उत्तम राहील, मात्र खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आर्थिक बाबतीत आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. अचानक धनखर्च होण्याची शक्यता असल्याने पैशांचे नियोजन काळजीपूर्वक करा. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, पण सहकाऱ्यांशी वाद टाळणे हिताचे राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत आनंदात जाईल. मिथुन: आज तुम्हाला नशिबाची चांगली साथ लाभणार आहे. तुमच्या बोलण्यातील गोडव्यामुळे समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर पोलिसांनी अवैध गोवंश आणि गोमांस तस्करीविरोधात एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी वेगवेगळ्या भागात छापे टाकून तब्बल ३९ गोवंश ताब्यात घेतले असून, त्यांची अंदाजे किंमत २६ लाख ७० हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २८ आणि २९ मे रोजी साजरा होणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात तसेच परिसरात कोणत्याही प्रकारे अवैध गोवंश किंवा गोमांसाची वाहतूक व विक्री होऊ नये, यासाठी जास्तीत जास्त कारवाया करण्याचे आदेश अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिले होते. या सूचनांचे गांभीर्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: शहरालगतच्या अकोले-नाशिक बायपास रोडवरील विठ्ठलनगर येथील विठ्ठल मंदिर आणि ह.भ.प. किसन महाराज हारदे आश्रमाच्या आवारात येत्या ३० मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका समाधी भूमीपूजन कार्यक्रमावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे अनधिकृत असून त्याविरोधात तीव्र निषेध आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ह.भ.प. किसन महाराज हारदे शिष्य मंडळाने प्रशासनाला दिला आहे. या संदर्भात मंडळाच्या वतीने अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करून हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलनगर येथील विठ्ठल मंदिरात दि. ३० मे २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता दिवंगत ज्ञानेश्वर महाराज जाधव यांच्या समाधीचा भूमीपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक: उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या शेजाऱ्यांवर काळाने घाला घातल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना कश्यपी धरणावर घडली आहे. या भीषण दुर्घटनेत एकाच परिसरातील चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, यामुळे संपूर्ण परिसरात आणि मूळ गावी तीव्र शोककळा पसरली आहे. दरम्यान, एका धाडसी महिलेच्या सतर्कतेमुळे दोन वर्षांची चिमुरडी सुदैवाने बचावली असली, तरी तिच्या डोक्यावरचे आई-वडिलांचे छत्र कायमचे हरवले आहे. मूळचे संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील रहिवासी असलेले सचिन कैलास ठोंबरे हे सध्या नाशिकच्या मखमलाबाद भागात वास्तव्यास होते. सुटी साजरी करण्यासाठी सचिन ठोंबरे, त्यांची पत्नी रोहिणी, दोन वर्षांची मुलगी आणि त्यांच्या शेजारी राहणारी दोन मुले…
