Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक भोंदू कॅप्टन अशोक खरात याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याला पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर उभे करण्यात आले. अवतार पूजेच्या नावाखाली व्यावसायिकाला एक कोटीहून अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या अशोक खरातला न्यायालयाने चार मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. व्यवसाय जगभरात विस्तारण्याच्या इच्छेचा गैरफायदा घेत आरोपी खरातने एका व्यावसायिकाला १ कोटी ११ लाख रुपयांना गंडा घातल्याचे तपासात समोर आले. आहे. आरोपीने फिर्यादीला ‘अवतार पूजा’ करण्याचे आमिष दाखवून ईशान्येश्वर मंदिर परिसरात बोलावले आणि तिथे बनावट साप दाखवून मृत्यूची भीती घातली. ही पूजा पूर्ण करण्यासाठी २१ देशांत जावे लागेल, अन्यथा नागदंश होऊन मृत्यू होईल, अशी भीती…

Read More

नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा धुराळा खाली बसतो न बसतो, तोच केंद्र सरकारने सामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे आपले क्रूर धोरण पुन्हा एकदा राबवण्यास सुरुवात केली आहे. निवडणुका संपताच महागाईचा भडका उडाला असून, १ मेपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिक, छोटे दुकानदार आणि रेस्टॉरंट चालकांचे कंबरडे मोडले असून, ऐन उन्हाळ्यात महागाईची ही झळ जनतेला सोसावी लागणार आहे. व्यावसायिक सिलेंडर मध्ये झालेल्या दरवाढीचा फटका आता सामान्य कुटुंबाच्या हॉटेल आतील खाद्यपदार्थांना बसणार आहे. नव्या दरवाढीनुसार, राजधानी दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता ३०७१.५० रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईतही हे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, पुणे: पुण्यातील चंदननगर भागात एका तरुणाने प्रेमप्रकरणातील वादातून २२ वर्षीय तरुणीचा ब्लेडने गळा चिरून खून करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. उजालादेवी जसवंतसिंग दोहरे असे जखमी तरुणीचे नाव असून, तिची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक आहे.  याप्रकरणी तरुणीचा भाऊ भगतसिंग दोहरे याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे दोघेही नगर रस्त्यावरील एका मॉलमध्ये एकत्र काम करत होते. त्यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते, मात्र अलीकडे त्यांच्यात खटके उडत होते. बुधवारी, २९ एप्रिल रोजी तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने पठारे वस्ती येथील…

Read More

मुंबई: राज्य सरकारने जून २०२४ मध्ये सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पडताळणी प्रक्रियेचा टप्पा ३० एप्रिल रोजी पूर्ण झाला असून, आतापर्यंत राज्यातील १ कोटी ८९ लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली शेवटची मुदत संपल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे. सुरुवातीला या योजनेसाठी एकूण २ कोटी ४३ लाख बहिणींनी नोंदणी केली होती, मात्र सखोल पडताळणीनंतर तब्बल ५४ लाख अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. योजनेच्या पारदर्शकतेसाठी गेल्या दीड वर्षांपासून विविध मार्गांनी निकषांची तपासणी केली जात आहे. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, निकषात बसत नसतानाही काही महिलांनी लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः…

Read More

मुंबई, विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल करत २१ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  सोमनाथ घार्गे यांची मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालयात सहाय्यक पोलीस महानिरीक्षक पदी रवानगी झाली आहे, तर चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आता अहिल्यानगर जिल्ह्याची सूत्रे हाती घेतील. या बदल्यांच्या सत्रात जालना येथून अजय के. बन्सल यांची महाराष्ट्र राज्य सायबर सुरक्षा पोलीस अधीक्षक पदी, अमरावती ग्रामीणचे सिगुरी विशाल आनंद यांची धुळे पोलीस अधीक्षक पदी आणि नाशिक ग्रामीणचे बाळासाहेब…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: महाराष्ट्रात ‘दैवी शक्ती’ आणि ‘चमत्काराच्या’ नावाखाली सुरू असलेला अंधश्रद्धेचा बाजार पोलिसांनी उखडून टाकण्यास सुरुवात केली आहे. नाशिकमधील कुख्यात भोंदू अशोक खरात याच्या अटकेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली असून, गेल्या ३० दिवसांत पोलिसांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतून एकूण १४ भोंदू बाबांना गजाआड केले आहे. गजाआड केलेल्या या भोंदूंचे अनेक प्रताप पोलीस तपासात समोर येत आहे. या भोंदूनी महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधींची आर्थिक फसवणूक केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नाशिकच्या अशोक खरातवर आतापर्यंत १० गुन्हे दाखल झाले आहेत. त्याने महिलांचे शोषण करण्यासाठी गुंगीकारक पदार्थांचा वापर केल्याची कबुली दिली असून, सध्या SIT (विशेष तपास पथक) या प्रकरणाचा सखोल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, श्रीरामपूर: अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कायद्याची पायमल्ली करून बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा लोणी पोलीस आणि अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाने संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे. राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात सुरू असलेल्या या काळ्या धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून एका बीएएमएस डॉक्टरसह त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, रोख रक्कम आणि तीन आलिशान कारसह तब्बल २४ लाख ९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना पिंपरी निर्मळ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: राज्यात सध्या सर्वत्र उष्णतेचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढत असून, येत्या काही दिवसांत हा तडाखा अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा आणि प्रख्यात कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला आहे. यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक असून अहिल्यानगर जिल्ह्याचे तापमान ४१.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचे सावट असून, संगमनेर परिसरातही ही तीव्रता वाढण्याची…

Read More

प्रतिनिधी / उरण उरण तालुका रिक्षा युनियनचे संस्थापक, विद्यमान अध्यक्ष तथा नागाव-म्हातवलीतील ज्येष्ठ समाज कार्यकर्ते प्रफुल्ल किशोर पुरो यांचे सोमवारी दीर्घ आजाराने देहावसान झाले. मृत्यू समयी ते 75 वर्षांचे होते. वरीष्ठ पत्रकार प्रवीण पुरो यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. प्रफुल यांच्या दुःखद निधनावर शोक व्यक्त करण्यासाठी उरणमधील रिक्षा वाहतूक दुपारनंतर बंद ठेवण्यात आली होती. प्रफुल पुरो यांच्या निधनाने रिक्षा चालक-मालकांचा आधार हरपला असून नागाव आणि म्हातवली क्षेत्रातील सामाजिक कार्यक्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. प्रफुल यांनी दीर्घकाळ समाजसेवा केली, असंख्य गरजू व्यक्तींना मदत केली आणि आपल्या सकारात्मक वृत्तीने त्यांनी सर्वांना प्रोत्साहन दिले. त्यांचं साधं राहणीमान, प्रामाणिकपणा आणि समाजहितासाठी…

Read More

 मोहसीन शेख, संगमनेर – शहरातील दिल्ली नाका परिसरात मध्यरात्री एक अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. आयशर ट्रकचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला धडकून रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या भेळीच्या हातगाडीला जोरदार धडक बसली. या अपघातात हातगाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडला. छत्रपती संभाजीनगरवरून येणाऱ्या आयशर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटल्याने ट्रक थेट हातगाडीवर जाऊन धडकला. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक तत्काळ बाहेर आले. घटनेनंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातात भेळीच्या हातगाडीचे व आयशर ट्रॅकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली असून…

Read More