Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या भारतीय जनगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, यावेळी प्रथमच संपूर्णतः डिजिटल पद्धतीने ही गणना केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून प्रगणक आणि पर्यवेक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे, यंदा नागरिकांना प्रगणकाची वाट न पाहता स्वतःहून आपली माहिती नोंदवण्याची संधी ‘स्व-जनगणना’ (सेल्फ इन्युमरेशन) माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन संगमनेरचे तहसीलदार तथा जनगणना अधिकारी धिरज मांजरे यांनी केले आहे. तालुक्यातील जनगणनेच्या कामकाजासाठी महसूल विभागाने स्वतंत्र कक्ष कार्यान्वित केला असून, तहसीलदार…

Read More

अकोले : आदिवासी समुदायांना स्वशासनाचे अधिकार देणाऱ्या ऐतिहासिक ‘पेसा’ कायद्याच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामसभा मोबिलायझर्सची पदे रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे २००० मोबिलायझर्सवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असून, सरकारच्या या अन्यायकारक धोरणाविरोधात उद्या, ६ मे रोजी पुण्यात तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. पेसा मोबीलायझर संघर्ष समिती आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच यांच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. प्रशासनाने या मागणीची दखल न घेतल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे. पंचायत (अनुसूचित क्षेत्रांचा विस्तार) अधिनियम १९९६ अर्थात पेसा कायदा २४ डिसेंबर १९९६ रोजी देशभर लागू झाला. या कायद्याची…

Read More

संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात कत्तलखान्यांचे रॅकेट पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने धडक कारवाई करत गोवंशाची अवैध वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला आहे. वडगाव पान ते तळेगाव रोडवर हॉटेल अमर जवळ ही कारवाई करण्यात आली. यामध्ये तब्बल दोन मृत बैलांसह २९ जनावरांची सुटका करण्यात आली असून, २३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांना पाहताच चालकाने अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धडक मोहीम राबवण्यात आली. सोमवारी रात्री एका विटकरी रंगाच्या आयशर टेम्पोमधून (क्र. PB 05 L 4157) जनावरांना अत्यंत निर्दयीपणे दाटीवाटीने भरून…

Read More

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होईल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. अडकलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान मिळेल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. प्रिय व्यक्तीशी संवाद साधताना संयम ठेवा, जेणेकरून कोणतेही गैरसमज होणार नाहीत. मिथुन: दिवसाची सुरुवात थोडी धावपळीची होऊ शकते, मात्र दुपारनंतर परिस्थिती तुमच्या नियंत्रणात येईल.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन| संगमनेर: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अमानवीय अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या घटनेचे तीव्र पडसाद संगमनेरमध्ये उमटले आहेत. या क्रूर घटनेच्या निषेधार्थ आणि अत्याचारीत सर्वच बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिकांच्या वतीने भव्य ‘कॅन्डल मार्च’ काढण्यात आला. संगमनेर बसस्थानक परिसरातून निघालेल्या या मोर्चात महिला आणि तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. कॅन्डल मार्च प्रांत अधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर येथे उपस्थित लहान मुलींच्या हस्ते प्रांताधिकारी अरुण उंडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक समीर बारवकर उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने या घटनेचा निषेध करत नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी लावून धरली.…

Read More

बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी २ लाख १४ हजार ९३ मतांच्या विक्रमी मताधिक्याने ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. या निवडणुकीत त्यांना एकूण २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली, तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या २२ उमेदवारांसह ‘नोटा’ला केवळ ४८३७ मतांवर समाधान मानावे लागले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१९ च्या निवडणुकीत प्रस्थापित केलेला १ लाख ६५ हजार २६५ मताधिक्याचा विक्रम सुनेत्रा पवार यांनी मोडीत काढला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, मात्र २२ अपक्ष उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या…

Read More

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत केलेले नियोजन यशस्वी होईल, मात्र अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम राखावा लागेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ: आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. प्रलंबित असलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण कमी होईल. व्यवसायात भागीदारांकडून चांगले सहकार्य मिळेल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रवासाचे योग येतील. मिथुन: आजचा दिवस धावपळीचा राहू शकतो. नवीन कामाच्या संधी उपलब्ध होतील, पण निर्णय घेताना घाई करू नका. नातेवाईकांशी जुन्या मुद्द्यावरून वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात…

Read More

छत्रपती शिवरायांचे गुरू कोण? ते शिवकालीन लढायांचे सूत्रधार कोण? याविषयींच्या वायफळ चर्चा घडवून आणणार्‍या बुवा आणि बाबांचा कोण सुळसुळाट सध्या देशाभर आहे. येनकेन प्रकारेन छत्रपतींच्या मागे त्यांच्या पुण्याईला किंमत न देण्याची ही स्पर्धा होय. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा जो काही पराक्रम केला तो ब्राह्मणांच्या सहभागाशिवाय नव्हता, असं दाखवण्याची सुरू असलेली अहमहिका ही केवळ छत्रपतींची बदनामीच नव्हे, तर त्यांना कमी लेखण्यासाठी केलेला कटच होय. शिवरायांविषयी गरळ ओकणार्‍यांबाबत सत्ताधारी सातत्याने मूग गिळून राहिल्याने त्याचा गैरफायदा देशातील शिवरायांच्या द्वेषींनी घेतला. वादग्रस्त टिपण्ण्या करायच्या आणि सत्ताधार्‍यांना अडचणीत आणणार्‍या वातावरणापासून लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधण्याचा हा प्रयत्न होय. मग कधी राज्यपाल यावर बोलत, तर कधी मंत्री.…

Read More

मुंबई: महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला असून, या संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल सरकारने तातडीने सार्वजनिक करावा, अशी आग्रही मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि जाती अंत संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय समितीने १६ मार्च २०२६ रोजी आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यानंतर १० एप्रिल रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नवी समिती स्थापन करून जनतेकडून ३० एप्रिलपर्यंत यावर आक्षेप आणि मते मागवण्यात आली होती. मात्र, ज्या अहवालावर मते द्यायची आहेत, तो मूळ अहवालच सरकारने अद्याप लोकांसमोर ठेवलेला नाही, याकडे पक्षाने लक्ष वेधले आहे. या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित…

Read More

अहिल्यानगर: जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे निर्माण झालेली पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले असून नागरिकांना दिलासा देण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत टंचाईग्रस्त भागांवर सतत देखरेख ठेवली जात असून सद्यस्थितीत जिल्ह्यातील ३४ गावे आणि १६२ वाड्या-वस्त्यांना ३० टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा केला जात आहे. या पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका संगमनेर, पारनेर आणि नगर तालुक्यांना बसला असून तेथे अनुक्रमे १०, १३ आणि ६ टँकर तैनात करण्यात आले आहेत. एकूण ६४ हजार ५८६ नागरिक या टँकर सुविधेवर अवलंबून आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाने टँकरच्या खेपांचे नियोजन अत्यंत प्रभावीपणे केले असून मंजूर ९०.९२ खेपांपैकी ८८ खेपा पूर्ण केल्या जात…

Read More