Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या हायटेक बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य आणि देखणे स्मारक उभारण्यासाठी शासनाकडून निधीची मागणी केलेली आहेच; मात्र शासन निधी देण्यास विलंब करत असेल तर केवळ त्यांच्यावर अवलंबून न राहता लोकवर्गणी, नगरपरिषद, आमदार निधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून येत्या वर्षभरात हे स्मारक पूर्ण केले जाईल, असा निर्धार आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला आहे. संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने स्मारकाच्या स्वरूपाबाबत आयोजित करण्यात आलेल्या नागरिक मत नोंदणी अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या मोहिमेला संगमनेरकरांनी पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, हजारो नागरिकांनी आपले मत नोंदवले आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी यावेळी स्मारकाच्या आतापर्यंतच्या प्रवासावर…
नवी दिल्ली: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी ५ मार्च रोजी रात्री उशिरा महाराष्ट्रासह देशातील अनेक महत्त्वाच्या राज्यांच्या राज्यपालांच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या मोठ्या फेरबदलामध्ये त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री आणि तेलंगणाचे विद्यमान राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे पूर्णवेळ राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी उपराष्ट्रपती पदी नियुक्ती झालेल्या सी. पी. राधाकृष्णन यांच्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता, मात्र आता राज्याला जिष्णू देव वर्मा यांच्या रूपाने स्वतंत्र राज्यपाल मिळाले आहेत. संपूर्ण देशात झालेल्या या फेरबदलात अनुभवी नेते आणि निवृत्त अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांची आता…
आजचे राशिभविष्य: शुक्रवार, ६ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होताना दिसेल. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील, मात्र खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वृषभ आज तुम्हाला आर्थिक बाबतीत सावध राहण्याची आवश्यकता आहे. विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता असल्याने नियोजित पद्धतीने पावले उचलावीत. मित्रमंडळींच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात, पण घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. बोलण्यावर ताबा ठेवल्यास वादाचे प्रसंग टाळता येतील. मिथुन आजचा दिवस बौद्धिक कामात यश मिळवून देणारा आहे. नवीन…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर शहर आणि परिसरातील गावांतून बेकायदेशीरपणे टाकण्यात आलेल्या ३३ KV वीज वाहिनीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या धोकादायक वीज वाहिनीच्या विरोधात ‘३३ KV बाधित शेतकरी व नागरिक कृती समिती’ आक्रमक झाली असून, उद्या शुक्रवार, ६ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या संगमनेर कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात समितीने स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. संगमनेर शहर १३२ KV ते धांदरफळ दरम्यान ही वीज वाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, ही वाहिनी टाकताना अनेक गंभीर नियमबाह्य बाबी समोर आल्याचा आरोप…
मुंबई, विशेष प्रतिनिधी – महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत असून राज्यसभेच्या सात जागांसाठी होणारी निवडणूक आता बिनविरोध झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत सात जागांसाठी सातच अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली असून, याबाबतची औपचारिक घोषणा १६ मार्च रोजी केली जाणार आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागांचे वाटप झाले होते. महायुतीच्या वाट्याला सहा जागा आल्या होत्या, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने चार जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. भाजपच्या वतीने राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना संधी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पार्थ पवार यांनी…
संगमनेर, प्रतिनिधी – स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज अधिक प्रभावी, जबाबदार आणि कायदेशीर चौकटीत राबवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कायद्याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संगमनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी केले. संगमनेर नगरपरिषद आणि प्रजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यशाळेत त्या बोलत होत्या. नगरपालिकेचे बजेट आणि नियोजनाच्या अनुषंगाने या महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रामुख्याने ‘महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५’ या कायद्याचा सखोल अभ्यास, नगरसेवकांची कर्तव्ये आणि विविध विषय समित्यांचे महत्त्व यावर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सभागृहातील कामकाजाची नेमकी पद्धत आणि लोकशाहीतील लोकप्रतिनिधींची भूमिका यावर प्रजा फाउंडेशनच्या तज्ञांच्या टीमने नगरसेवकांना मार्गदर्शन…
आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर प्रसन्न होतील. घरातील वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल असून भविष्यात त्याचे चांगले फळ मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर आहार घेण्याला प्राधान्य द्या. वृषभ आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि एखाद्या महत्त्वाच्या कार्यात तुमचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. व्यापारी वर्गाला नवीन संधी प्राप्त होतील ज्यामुळे नफ्यात वाढ होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत खेळीमेळीचे वातावरण राहील. अचानक धनलाभाचे…
मुंबई: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका रोजगारासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील तरुणांना बसला असून, अनेक तरुण सध्या तिथे अडकून पडले आहेत. हा गंभीर प्रश्न आमदार सत्यजीत तांबे यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. इराणमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना राज्य शासनाची सध्याची हेल्पलाईन यंत्रणा अपुरी पडत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. अनेक तरुणांनी हेल्पलाईनशी संपर्क होत नसल्याच्या तक्रारी केल्याचे सांगत, राज्य सरकारने या विषयात अधिक सक्रिय होऊन तातडीने स्वतंत्र व प्रभावी हेल्पलाईन सुरू करावी, अशी आग्रही मागणी तांबे यांनी यावेळी केली. आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडलेल्या या मुद्द्यावर सरकारची बाजू स्पष्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय हालचालींची…
मुंबई, विशेष प्रतिनिधी राज्यातील अनधिकृत प्री-प्रायमरी व नर्सरी शाळांच्या प्रश्नावर आज विधानसभेत आमदार सत्यजीत तांबे यांनी आवाज उठवला. सहा वर्षांपूर्वी शासनाने धोरण जाहीर करूनही अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याबद्दल आमदार तांबे यांनी सरकारला जाब विचारला. राज्यात सध्या प्री-प्रायमरी व नर्सरी वर्ग सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाची कोणतीही अनिवार्य परवानगी आवश्यक नसल्याने अनेक ठिकाणी बंगल्यांमध्ये किंवा दोन खोल्यांमध्ये कोणतीही सुरक्षा व्यवस्था आणि शासकीय नियंत्रणाशिवाय वर्ग सुरू असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून देत या संस्थांची शासनाकडे अधिकृत नोंदणी नसल्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होत असल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच बोलतांना तांबे म्हणाले की, लहान मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे शाळेच्या…
नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील आगामी राज्यसभा द्विवार्षिक निवडणुकीसाठी आपल्या चार अधिकृत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या संदर्भात पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाकडून अधिकृत प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले असून, यामध्ये अनुभवी नेत्यांसह नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आली नसल्याने आघाडीतील पेच अद्यापही कायम आहे. महाविकास आघाडीकडून कोणाच्या नावाची घोषणा केली जाते याची उत्सुकता लागली आहे. भाजप कडून जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार, महायुतीमधील महत्त्वाचे घटक पक्ष असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस…
