Author: अनंत पांगारकर

अहिल्यानगर – प्रतिनिधी जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एका मोटार अपघात दाव्यात तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांची विक्रमी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. अपघातात मयत झालेल्या महेश काठमोरे यांच्या वारसांना व विमा कंपनीमध्ये यशस्वी मध्यस्थी होऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पाथर्डी तालुक्यातील शिरपूर येथील महेश तुकाराम काठमोरे (वय ३४) यांचा २० डिसेंबर २०२३ रोजी अहिल्यानगर – कल्याण महामार्गावर दुर्दैवी मृत्यू झाला होता. कुटुंबाचा आधार गमावल्याने त्यांच्या पश्चात पत्नी प्राजक्ता, अज्ञान मुले व वयोवृद्ध आई-वडील यांच्यावर मोठे संकट कोसळले होते. या पार्श्वभूमीवर, वारसांना जलद न्याय व आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी हा खटला लोकअदालतीत ठेवण्यात आला होता. मयत काठमोरे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या अवघ्या २२ वर्षीय विवाहितेचा सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अकोले शहरात घडली आहे. विशेष म्हणजे बाळ सुखरूप असले तरी, प्रसूतीच्या आनंदाऐवजी या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली असून, नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांवर उपचारात घोर हलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला आहे. रुपाली विठ्ठल गोधडे (रा. आश्वी खुर्द, संगमनेर) असे मृत मातेचे नाव आहे. प्रसूतीसाठी त्या माहेरी आल्या होत्या. गर्भधारणेचे नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर प्रसूती वेदना सुरू झाल्याने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बाळ सुखरूप जन्माला घातले. मात्र, त्यानंतर रुपाली यांची प्रकृती…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील हृदयद्रावक घटनेनंतर, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सिद्धेश सूरज कडलग (वय 4) या बालकाच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्यासह कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरीत सामावून घेण्याची आग्रही मागणी आमदार अमोल खताळ यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात केली आहे. जवळे कडलग येथील कडलग वस्तीवर शनिवारी (१३ डिसेंबर) ही दुर्दैवी घटना घडली. सिद्धेश हा घराजवळ खेळत असताना गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या नरभक्षक बिबट्याने त्याच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. बिबट्याच्या दातांनी गळा आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्याने सिद्धेशचा जागीच मृत्यू झाला. सिद्धेशचे कुटुंब शेती आणि दुग्ध व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करते. घटनेच्या वेळी कुटुंबातील सदस्य शेतात…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) – संगमनेर तालुका बिबट्यांच्या वाढत्या दहशतीमुळे भयभीत झाला असून, नरभक्षक बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी उद्या सोमवारी, (१५ डिसेंबर) २०२५ संगमनेरात भव्य जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांनी ही माहिती दिली. सोमवारी सकाळी दहा वाजता संगमनेर बस स्थानक ते प्रांताधिकारी कार्यालय यादरम्यान हा जन आक्रोश मोर्चा हजारो संगमनेर करांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या संगमनेर तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे शेतकरी, नागरिक आणि लहान मुलांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. या वाढत्या हल्ल्यांमुळे अनेक नागरिकांना जखमी व्हावे लागले आहे, तर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर तालुक्याला बिबट्याच्या वाढत्या दहशतीने ग्रासले असतानाच, जवळे कडलग गावातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतात खेळत असलेल्या अवघ्या चार वर्षांच्या सिद्धेश सुरज कडलग या चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला आणि या हल्ल्यात त्याचा करुण अंत झाला. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या भीषण घटनेमुळे संपूर्ण तालुका हळहळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडे सहा ते सात वाजेच्या सुमारास सिद्धेश हा आपल्या घराच्या अंगणात खेळत होता, तर त्याचे आजी-आजोबा आणि कुटुंबीय शेतीत व्यस्त होते. याच वेळी गवतात लपून बसलेल्या एका बिबट्याने संधी साधून सिद्धेशवर झेप घेतली. आजीच्या डोळ्यांदेखत बिबट्याने या निष्पाप बाळाच्या मानेला धरून त्याला शेतात ओढत…

Read More

राज्यातल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारच्या कारभाराची वर्षपूर्तीचे बरेच नगारे वाजले. वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने विविध वर्तमानपत्र आणि त्यांच्यासाठी काम करणार्‍या कथित सर्वेक्षण संस्थांच्या निकालांनी या सरकारची भलतीच भलामण केली आहे. सर्वच आघाड्यांवर हे सरकार कसं यशस्वी ठरलंय, हे दाखवण्याचा प्रयत्न करताना जणू आपण राज्यातल्या तेरा कोटी जनतेचाच हवाला देत असल्याचा आवही या सर्वेक्षणांनी आणला. हव्यासापोटी आपण किती लाचार बनतो आहोत, याचं भान न राहिल्याचं हे उत्तम उदाहरण. गोदी म्हणून इतरांना हसण्याचा अधिकार महाराष्ट्राने गमावल्याचं हे चित्र. आता तर आपण दिल्लीतील लाचारांहून भाट झालोत की काय, असं वाटावं, अशी ही सर्वेक्षणाची मांडणी म्हणावी लागेल. आपल्यासोबत कोणी तरी आहे, याचा आनंद…

Read More

मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक असेल. कामात गती मिळेल आणि अपेक्षेनुसार प्रगती कराल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ : आर्थिक बाजू बळकट होण्याची शक्यता आहे. जुनी येणी वसूल होतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा गैरसमज होऊ शकतो. धार्मिक कार्यात मन रमवा. मिथुन : नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यांचा भविष्यात फायदा होईल. मित्रांशी संवाद वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. प्रवासाचे योग आहेत. कर्क : घरातील वातावरण शांत आणि समाधानी राहील. आई-वडिलांकडून विशेष प्रेम व सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी थोडा ताण जाणवू शकतो, पण तो व्यवस्थापित कराल. सिंह : तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी उत्तम दिवस…

Read More

नागपूर –  नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचा तिढा आता विकोपाला गेला असून, हा प्रस्तावित मार्ग संगमनेरवरून अचानक शिर्डी मार्गे वळवल्याने आमदार सत्यजित तांबे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा रेल्वे मार्ग मंजूर झाला होता आणि ‘महारेल’ विभागाने सिन्नर, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, खेड, चाकण या मार्गासाठी सर्वेक्षणही पूर्ण केले. तांबे यांनी सभागृहात सांगितले की, या मार्गासाठी राज्य शासनाने 100 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण केले असून त्यावर 316 कोटी रुपयांचा मोठा खर्च झाला आहे. हा मार्ग अत्यंत नैसर्गिक आणि सोयीस्कर असताना आता तो शिर्डी-अहिल्यानगर मार्गे कोणत्या उद्देशाने वळवला गेला, असा थेट सवाल आमदार तांबे यांनी…

Read More

संगमनेर –  शेतकरी कष्ट करून अन्न पिकवतो आणि जवान ऊन, वारा, पाऊस अशा कठीण परिस्थितीत सीमेवर देशाचे रक्षण करतो. या दोघांचेही देशातील नागरिकांच्या जीवनात मोठे महत्त्व आहे. ज्या युवकांना देशसेवेची संधी मिळाली, त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आपल्या कुटुंबाचे आणि तालुक्याचे नाव मोठे करावे, सैनिकांचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काढले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शनिवारी (१३ डिसेंबर) संगमनेर तालुका युवक काँग्रेस व एकविरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सैन्यात आणि पोलीस दलात निवड झालेल्या ६१ तरुण-तरुणींचा आणि त्यांच्या पालकांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कॅन्सरतज्ञ…

Read More

संगमनेर –  सुकेवाडी (संगमनेर) येथील गांजा तस्करी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी तुषार पडवळ उर्फ दमल्या याला अखेर संगमनेर पोलीस आणि नारकोटिक्स टास्क फोर्सच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे. संगमनेर शहरालगत असलेल्या सुकेवाडी परिसरात दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या नारकोटिक्स टास्क फोर्सच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापेमारी करत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा गांजा हस्तगत केला होता. टास्क फोर्सच्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा पकडण्यात आल्याने स्थानिक पोलिसांचे अपयश समोर आले होते.  शहरालगत ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये तब्बल सव्वा कोटी रुपये किमतीचा ४५६ किलो गांजाचा साठा जप्त करण्यात आला. कारवाईदरम्यान मुख्य आरोपी असलेला तुषार पडवळ उर्फ…

Read More