Author: अनंत पांगारकर
मुंबई, विशेष प्रतिनिधी – संगमनेरमध्ये प्रशिक्षित आरोग्य सेवकांचे जाळे निर्माण व्हावे, यासाठी प्रस्तावित नर्सिंग कॉलेजला तातडीने प्रशासकीय मंजुरी देण्याची विनंती करत हे महाविद्यालय सुरू झाल्यास स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि आरोग्य व्यवस्थेला हक्काचे मनुष्यबळ उपलब्ध होईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न आमदार अमोल खताळ यांनी मांडला. मतदारसंघातील सरकारी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपकरणांची कमतरता, औषधांचा अपुरा साठा आणि डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त असलेल्या जागांमुळे सर्वसामान्यांना उपचारांसाठी मोठी कसरत करावी लागत असल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. संगमनेरचा विस्तार पाहता स्थानिक पातळीवर सक्षम आरोग्य सुविधा नसल्याने गंभीर रुग्णांना उपचारांसाठी…
मुंबई: भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचे बिगुल वाजवले असून, यामध्ये महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी आणि पुणे जिल्ह्यातील बारामती या दोन महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे. राहुरीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामतीचे आमदार अजित अनंतराव पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. आयोगाच्या या घोषणेमुळे दोन्ही मतदारसंघांमध्ये तातडीने आचारसंहिता लागू करण्यात आली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ३० मार्च २०२६ रोजी निवडणुकीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. इच्छुकांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ६ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली असून, ७ एप्रिल रोजी अर्जांची छाननी…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील साकूर शिवारात एका पन्नास वर्षीय शेतकऱ्याचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी घडली आहे. पाराजी धोंडीबा देवगिरे असे या मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण साकूर आणि देवगिरे वस्ती परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाराजी देवगिरे हे साकूर येथील देवगिरे वस्तीवर वास्तव्यास होते. त्यांची बोराटे वस्ती परिसरात शेती असून तिथे त्यांनी शेतीच्या पाण्यासाठी अलीकडेच नवीन शेततळे उभारले होते. रविवारी (१५ मार्च) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ते शेतीच्या कामासाठी या शेततळ्यावर गेले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. शेवटी शेततळ्याकडे जाऊन पाहिले असता…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने नुकतेच स्थापन करण्यात आलेल्या ‘रक्षक दलाने’ अवघ्या काही दिवसांतच आपली उपयोगिता सिद्ध केली आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये या दलाने तातडीने हस्तक्षेप करत एका विद्यार्थिनीची छेडछाड रोखली, तर दुसऱ्या घटनेत मंगळसूत्र चोरांना जेरबंद करून पोलिसांच्या हवाली केले. नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या दलाच्या कामगिरीमुळे शहरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी संगमनेर नगरपरिषदेने हे विशेष सुरक्षा रक्षक दल कार्यान्वित केले आहे. शुक्रवारी (१३ मार्च) हे दल अकोले बायपास परिसरात अतिक्रमण विरोधी मोहिमेत व्यस्त असताना, एसटी बसस्थानक परिसरात काही…
संगमनेर, प्रतिनिधी- रोटरी क्लब संगमनेर आणि दीपक इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने संग्राम निवासी मूकबधिर विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत “रंग बरसे रंगोत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दि. ९ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत रोटरी क्लबच्या सदस्यांनी रंग खेळत आनंद वाटण्याचा अनोखा आणि भावनिक क्षण अनुभवला. रंगांच्या उधळणीत विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले आणि संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमादरम्यान पवनकुमार वर्मा यांनी विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या ताज्या सफरचंदांसह विविध फळाहाराचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे रोटेरियन दीपकजी मणियार (दीपक इंडस्ट्रीज) यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांसाठी…
राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील चौकशीच्या अहवालांनी आता राज्यातल्या जनतेची मतीच गुंग होऊ लागली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी एकीकडे अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार प्रयत्नांची पराकाष्टा करत असताना दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी मंत्री प्रफुल्ल पटेल मौन साधून तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते रोहित पवारांना खोटं पाडण्याकरता कामाला लागले आहेत. रोहित पवार यांनी पुराव्यानिशी व्यक्त केलेल्या संशयाने अपघाताची जागा घातपाताने केव्हाच घेतली आहे. पण तो घातपात नाही, असं म्हणणारे ना स्वत:हून याचा खुलासा करत ना त्यांच्या यंत्रणेकरवी तपास करत. एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विमान अपघाताची अशी स्थिती होणं हे अजिबात स्वीकारार्ह…
दैनिक राशिभविष्य: १५ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे चीज होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामावर प्रसन्न राहतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, विशेषतः जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे, तरीही आहारावर नियंत्रण ठेवणे फायद्याचे ठरेल. प्रलंबित कामे मार्गी लागल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. वृषभ आज तुम्हाला आर्थिक बाबतीत सावध राहण्याची आवश्यकता आहे. गुंतवणुकीचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. व्यवसायात नवीन ओळख निर्माण होईल, परंतु घाईघाईने कोणतेही वचन देऊ नका. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. मानसिक शांततेसाठी अध्यात्माकडे कल राहील. जोडीदाराशी संवाद साधताना संयम…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेरमध्ये एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या कॅन्सर तपासणी शिबिराचा १४३ जणांनी लाभ घेतला असल्याची माहिती देण्यात आली. धावपळीची जीवनशैली, वाढता मानसिक तणाव आणि असंतुलित आहार यामुळे समाजात कॅन्सरचे प्रमाण चिंताजनक रित्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून एकविरा फाउंडेशनच्या वतीने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत स्वतंत्र विभाग करून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे शिबिर पार पडले. एकविरा फाउंडेशन, एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट आणि इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या संयुक्त…
अहिल्यानगर- जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त ७३ पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या वेळेत प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात आला आहे. ही परीक्षा १५ मार्च २०२६ रोजी नियोजित वेळेनुसार सकाळी ११.०० ते १२.३० या वेळेत होणार होती, मात्र आता ती त्याच दिवशी म्हणजे रविवारी दुपारी ४.०० ते ५.३० या वेळेत घेतली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ही लेखी परीक्षा ‘न्यू कॉमर्स बिल्डिंग, न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, बॉईज हॉस्टेल गेट, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर’ या केंद्रावर पार पडणार आहे. परीक्षेच्या बदललेल्या वेळेनुसार उमेदवारांनी परीक्षेच्या दोन तास आधी म्हणजेच दुपारी २.०० वाजेपर्यंत…
अहिल्यानगर: न्यायालयातील दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रकरणे अल्पावधीत निकाली काढण्यासाठी पक्षकारांनी लोकअदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. विशेषतः तडजोडपात्र प्रकरणांमध्ये सकारात्मक भूमिका घेऊन सामंजस्याने तोडगा काढणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आशिष पाटील यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बार असोसिएशन आणि सेंट्रल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून उत्साहात पार पडले. यावेळी उपस्थित पक्षकार आणि विधी क्षेत्रातील मान्यवरांना मार्गदर्शन करताना न्यायाधीश पाटील बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश-३…
