Author: अनंत पांगारकर

संगमनेर, प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान इतिहासाचा वारसा जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही संगमनेर शहरात शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी ‘शिवजयंती उत्सव युवक समिती’ सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर समितीच्या नवनिर्वाचित नूतन पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, अध्यक्षपदी विनायक गरूडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ‘आपली समिती, आपली ताकद’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून या युवक समितीने आपल्या कार्याचा श्रीगणेशा केला आहे. समितीच्या या नूतन कार्यकारिणीत अनुभवी आणि उत्साही तरुणांचा समावेश करण्यात आला आहे. उपाध्यक्ष म्हणून हर्षल जेधे आणि विजय चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली असून, किरण वर्पे यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. समितीच्या कामात गती आणण्यासाठी…

Read More

आजचे राशीभविष्य: शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ ​मेष ​आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा आणि नवीन ऊर्जेचा राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कर्तुत्वाला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण राहील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. ​वृषभ ​आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. प्रलंबित असलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. धनलाभाचे योग असून जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. घरासाठी नवीन वस्तूची खरेदी करण्याचे बेत आखाल. ​मिथुन ​आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. विचारांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होऊ शकते. व्यवसायात सावधानता…

Read More

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार सत्यजित तांबे यांनी राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करत सरकारकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी विशेषतः शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर, शेतकऱ्यांचा हमीभाव, बिबट्यांचा वाढता प्रादुर्भाव आणि शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर आपली भूमिका मांडली. शेती क्षेत्राबद्दल बोलताना आमदार तांबे म्हणाले की, सरकारने ‘एआय फॉर ॲग्री’ सारख्या उपक्रमांतून तंत्रज्ञानावर भर दिला आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे औषधे आणि पाण्याचा वापर ३० ते ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो, ज्यामुळे उत्पादन खर्च घटेल. मात्र, तंत्रज्ञानापेक्षाही शेतकऱ्यांसाठी ‘हमीभाव’ हा अधिक महत्त्वाचा विषय आहे. अमेरिकेसोबत झालेल्या ट्रेड डीलचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गेल्या…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि शासकीय विभागांमधील अनागोंदी कारभारावरून आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळात राज्य सरकारला धारेवर धरले. प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी विशेषतः अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि आरोग्य विभागातील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधत प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. संगमनेर तालुक्यातील सामान्य जनता, शेतकरी आणि रुग्णांच्या हितासाठी त्यांनी विधिमंडळात आक्रमक पवित्रा घेतला. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कामकाजावर बोलताना आमदार खताळ यांनी स्पष्ट केले की, हा विभाग थेट गोरगरीब आणि कष्टकऱ्यांशी जोडलेला असतानाही तिथे अनेक अडचणींचा डोंगर उभा आहे. अनेक अन्न योजना स्थगित किंवा मर्यादित केल्यामुळे स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला असून, गरजू…

Read More

अहिल्यानगर: सोशल मीडियावर सध्या ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ या नावाने एक पत्रक मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून हे पत्रक पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहे. या पत्रकाद्वारे असा दावा केला जात आहे की, १ मार्च २०२० नंतर ज्या मुलांच्या एका किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू झाला आहे, अशा १८ वर्षांखालील मुलांना दरमहा ४ हजार रुपयांची मदत दिली जाईल. या अफवेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि तालुका स्तरावरील शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत असून शासकीय कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासनाने यासंदर्भात महिला व बाल विकास विभाग तसेच समाज कल्याण विभागाकडून अधिकृत माहिती घेतली असता, राज्यात अशी कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याचे…

Read More

कारवाईमुळे बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड झाले असून पोलीस आता या प्रकरणाच्या अधिक मुळाशी जात आहेत. मालेगाव: येथील छावणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बनावट नोटांच्या प्रकरणाचा छडा लावण्यात मालेगाव परिमंडळ पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी थेट छत्रपती संभाजीनगर येथील बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार संतोष उत्तमराव केळसकर याला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी पाचशे रुपयांच्या २०० बनावट नोटांसह नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण २ लाख ३६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाची सुरुवात २३ जानेवारी २०२६ रोजी झाली, जेव्हा सटाणा नाका येथील एचडीएफसी बँकेत एका फायनान्स कंपनीचे…

Read More

आजचे राशिभविष्य ​मेष ​मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात आपल्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ आपल्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करतील. व्यापारात नवीन गुंतवणूक करण्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मात्र जीवनसाथीसोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करावा जेणेकरून विनाकारण वाद होणार नाहीत. ​वृषभ ​वृषभ राशीच्या लोकांसाठी आज धनलाभ होण्याचे संकेत आहेत. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. नोकरीमध्ये बदल करू इच्छिणाऱ्यांना नवीन संधी चालून येतील. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस सामान्य आहे, पण बाहेरचे अन्न खाणे टाळावे. संध्याकाळचा वेळ मित्रांसोबत मजेत जाईल, ज्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. ​मिथुन ​मिथुन राशीच्या व्यक्तींना आज संमिश्र फळे मिळतील. घाईघाईत…

Read More

संगमनेर: अखिल भारतीय किसान सभा आणि ‘सिटू’च्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेला ‘लॉग मार्च’ आता अत्यंत आक्रमक वळणावर पोहोचला असून, अहिल्यानगर लांब आहे, आता लोणी हेच आंदोलनाचे केंद्र असेल, अशी गर्जना डॉ. अजित नवले यांनी केली आहे. गुरुवारी हा मोर्चा संगमनेर येथून निझर्णेश्वरच्या दिशेने रवाना झाला असून, शुक्रवारी (दि. २७) मागण्या मान्य होईपर्यंत थेट पालकमंत्र्यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर (वाडा) मुक्काम ठोकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे एकेकाळी पुणतांब्यातून ऐतिहासिक शेतकरी संप सुरू झाला होता, त्याच धर्तीवर आता आहार कर्मचारी आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप लोणीतूनच सुरू केला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. रेल्वेचे प्रश्न, ग्रामपंचायत कर्मचारी, बांधकाम…

Read More

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक रचनेत ऐतिहासिक फेरबदल करण्यात आले असून, राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी सुनेत्रा पवार यांची निवड होणे निश्चित मानले जात होते. वरळी डोम येथील सभागृहात पार पडलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने आणि हात उंचावून पाठिंबा दर्शवला. या निवडीनंतर प्रफुल पटेल यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाचा गौरव करताना त्यांना एका खऱ्या सेनापतीची उपमा दिली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेरच्या तहसील कार्यालयातील लिपिक कैलास विठ्ठल खाडे (रा. अकोले) याला १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी रंगेहात पकडले. अवघ्या आठवडाभरात महसूल विभागात झालेली ही दुसरी मोठी कारवाई असल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. समजलेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराला त्यांच्या मालमत्तेचा वाटप पत्राचा आदेश करून हवा होता. यासाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर कागदपत्रे पूर्ण असतानाही, लिपिक कैलास खाडे याने या कामासाठी १३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने वारंवार विनंती करूनही खाडे लाचेच्या मागणीवर ठाम होता. अखेर कंटाळून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, गुरुवारी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४…

Read More