Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी – संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जयहिंद लोकचळवळीच्या वतीने गुरुवारी, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी या कार्यक्रमाबाबत माहिती दिली असून, ४० कलावंतांच्या संचात सादर होणारे हे महानाट्य शिवभक्तांसाठी एक विशेष पर्वणी ठरणार आहे. या सोहळ्याला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे आणि उपनगराध्यक्ष…
आजचे राशीभविष्य: १७ फेब्रुवारी २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जावान ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाला दाद मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आर्थिक बाबतीत काही नवीन योजना आखण्यासाठी काळ अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा विनाकारण वाद होऊ शकतात. जोडीदारासोबतचा वेळ आनंदाचा जाईल आणि आरोग्य उत्तम राहील. वृषभ: आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभल्याने प्रलंबित कामे पूर्ण होतील. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यामुळे तुमचा मान-सन्मान वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर…
श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी – वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अरेरावी करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीस श्रीरामपूरचे सत्र न्यायाधीश एस. एस. देशपांडे यांनी दोन महिने सश्रम कारावासाची आणि ५००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपी गणेश रूपचंद गांगुर्डे याला न्यायालयाने दोषी ठरवत हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. घटनेची पार्श्वभूमी अशी की, ५ ऑक्टोबर २०१५ रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे वसुली पथक श्रीरामपूर येथील वॉर्ड नं. २, सुभेदार वस्ती भागात थकीत वीज बिल वसुलीसाठी आणि कनेक्शन तोडण्यासाठी गेले होते. ग्राहक रूपचंद गांगुर्डे यांच्या घरी पथक पोहोचले असता, ग्राहक, त्यांचा मुलगा गणेश गांगुर्डे आणि पत्नी बबीता गांगुर्डे यांनी वीज बिल…
संगमनेर: प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्यातील प्रगत आणि व्यापारी केंद्र असलेल्या संगमनेर शहराला आता ‘स्मार्ट’ आणि ‘शिस्तबद्ध’ बनवण्यासाठी नगरपरिषदेने कंबर कसली आहे. यामुळे संगमनेर करांच्या दैनंदिनी मध्ये एक महत्त्वाचे वळण येणार आहे. ‘संगमनेर २.०: इट्स टाइम टू अपग्रेड’ या विशेष मोहिमेद्वारे शहराचा सर्वांगीण कायापालट करण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला असून, येत्या १ मार्च २०२६ पासून शहरात नवीन आणि कडक नियमावली लागू केली जाणार आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी शहरवासीयांना, व्यापाऱ्यांना आणि व्यावसायिकांना शहराच्या सुव्यवस्थेसाठी मनापासून सहकार्य करण्याचे भावूक आवाहन केले आहे. शहरातील वाढती वाहतूक आणि पादचाऱ्यांची होणारी कुचंबणा लक्षात घेता, सार्वजनिक रस्ते आणि पदपथ (फुटपाथ) मोकळे असणे ही काळाची…
अकोले: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध रित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका स्विफ्ट डिझायर कारवर श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ४ लाख ८१ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (१६ फेब्रुवारी) श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी त्यांच्या कार्यालयातील पथकाला अकोले पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे, पोलीस नाईक संदीप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाढे आणि राजेंद्र बिरदवडे हे पथक गस्त घालत होते. यावेळी धामणगाव पाट…
संगमनेर, प्रतिनिधी – मालेगाव येथील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्याच्या घटनेचे समर्थन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या विधानाचा निषेध करण्यासाठी संगमनेर बसस्थानक परिसरात शिवसेना-भाजप महायुतीच्यावतीने मंगळवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची आणि जाज्वल्य इतिहासाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, अशी भावना आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली. सपकाळ यांनी केलेले विधान हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणारे असून, यामुळे प्रत्येक शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या गेल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. मालेगावमधील फोटो प्रकरणाने आधीच चीड…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहर आणि परिसराची तहान भागवणाऱ्या निळवंडे धरणाच्या मुख्य पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनवरच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने चक्क वीज पोल उभे करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर चुकीमुळे हजारो नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, राहुल गांधी समर्थक संघ (TEAM RGSS) महाराष्ट्र आणि स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. निळवंडे धरण प्रकल्पातून संगमनेरसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ही पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र, महावितरणने कोणत्याही नियोजनाशिवाय या पाईपलाईनच्या अगदी वरून आणि बाजूने वीज पोल रोवले आहेत. यामुळे पाईपलाईनच्या संरक्षक आवरणाला आधीच मोठी इजा झाली असून, भविष्यात पाईपलाईन फुटल्यास मोठी…
संगमनेर: शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाला दिलेल्या सूचनानंतर आता शहरात वारंवार समोर येणाऱ्या गोवंश कत्तलीच्या घटनांची गंभीर दखल घेत, प्रशासनाने आज अवैध कत्तलखान्यांविरुद्ध मोठी मोहीम राबवली. आज सकाळपासूनच मोठ्या पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या (बुलडोझर) साहाय्याने हे अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. संगमनेरमधील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर वारंवार झालेल्या कारवाईनंतर देखील हे कत्तलखाने सुरू असल्याचे अधोरेखित झाले आहे. या विरोधात आंदोलने करणाऱ्या संघटना देखील गेल्या काही महिन्यांपासून या प्रश्नी मूग मिळून होत्या. अशा परिस्थितीत गेल्या महिनाभराच्या कालावधीमध्ये स्थानिक पोलिसांच्या सुरू असलेल्या या कत्तलखान्यांवर अहिल्यानगरच्या एलसीबीने मोठ्या कारवाया केल्या होत्या. या कारवायांमुळे संगमनेर मधील अवैध कत्तलखान्याचे प्रस्थ समोर…
संगमनेर, प्रतिनिधी – तालुक्यातील निमगावजाळी येथील माधुरी मनोज अरगडे (वय २८) या विवाहितेने सासरच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून शेततळ्यात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. या धक्कादायक घटनेप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात पती मनोज भास्कर अरगडे आणि सासू मीराबाई भास्कर अरगडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधुरी यांचा विवाह १० वर्षांपूर्वी झाला होता. सुरुवातीचे काही महिने सुखात गेल्यानंतर, पती आणि सासूने किरकोळ घरगुती कारणावरून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. या जाचाला कंटाळून त्या काही काळ आपल्या मुलांसह माहेरी (अंभोरे) राहण्यास गेल्या होत्या. मात्र, नातेवाइकांच्या मध्यस्थीनंतर त्या पुन्हा सासरी परतल्या होत्या. ७ फेब्रुवारी रोजी माधुरी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती.…
आजचे राशीभविष्य: मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र बोलताना संयम ठेवावा. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः उष्णतेचे विकार त्रास देऊ शकतात. वृषभ: आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्यामुळे मन प्रसन्न राहील. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम असून भविष्यात त्याचे चांगले फळ मिळेल. व्यावसायिकांना नवीन कंत्राट मिळण्याची चिन्हे आहेत. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनावरचा ताण हलका होईल. मिथुन: आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील.…
