Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई | विशेष प्रतिनिधी: राज्यातील गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध छुप्या साम्राज्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि आक्रमक पाऊल उचलले आहे. राज्यातील गुटखा माफियांचे नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी आता थेट ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्याचे धाडसी आदेश एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या २१ वर्षांच्या धडाकेबाज प्रशासकीय कारकिर्दीतील हा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय मानला जात असून, या एकाच निर्णयाने राज्यातील गुटखा माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. आतापर्यंत गुटख्यावरील कारवायांमध्ये केवळ लहान-मोठे पानटपरी चालक किंवा किरकोळ विक्रेतेच पोलिसांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर – सध्याच्या विवाह पद्धतीमध्ये मुहूर्ताकडे होणारे दुर्लक्ष, अनावश्यक खर्च, दिखाऊपणा आणि यामुळे वधूपित्याला सहन करावा लागणारा मानसिक त्रास यावर रामायणाचार्य ढोक महाराज यांनी अत्यंत परखड शब्दांत टीका केली आहे. विवाह सोहळ्यांमध्ये शिस्त राखण्यासाठी गावागावांत युवकांचे ‘दांडके मंडळ’ स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी केली. गुंजाळ मळा येथे आयोजित प. पू. गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहातील रामकथेच्या आठव्या पर्वात ते बोलत होते. या सोहळ्यात ढोक महाराज यांनी आपल्या ओजस्वी, अभ्यासपूर्ण आणि भावस्पर्शी निरूपणातून रामकथेचे विविध पैलू उलगडले. त्यांच्या वाणीतील सात्त्विकता आणि कथनशैलीमुळे संपूर्ण धर्ममंडप भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. गगनगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने उभे राहिलेले हे रामकथा सत्संगाचे…
संगमनेर: देशात सध्या सुरू असलेली लढाई ही केवळ सत्तेची नसून विचारधारेची आहे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची विचारधारा पूर्णपणे एकच असून राज्यघटना, संतांचे विचार, बहुजन समाज आणि पुरोगामी विचारसरणी हा आपल्या सर्वांचा सामायिक पाया आहे, आम्ही फक्त दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहोत इतकाच काय तो फरक आहे, शरद पवार हे प्रतिगामी विचारधारा कधीही स्वीकारू शकत नाहीत, असा विश्वास राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुका दूध संघाच्या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना थोरात यांनी ही महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. थोरात यांच्या या राजकीय विधानामुळे राजकारणात नवे संकेत जुळण्याची चिन्हे दिसू लागली आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई | विशेष प्रतिनिधी: राज्यात बहुचर्चित असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’वरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते यांनी महायुती सरकारच्या आर्थिक नियोजनावर आणि या योजनेच्या निधी वाटपावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी शासनाने समाज कल्याण विभागाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वळवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून सरकारच्या या कारभाराचा जाहीर निषेध केला आहे. उत्कर्षाताई रूपवते यांनी सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याण विभागाचे तब्बल ३४४.७४ कोटी रुपये एका शासन निर्णयाच्या (जीआर) माध्यमातून लुबाडण्यात आले आहेत. ही केवळ निधीची…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक बाबतीत नशिबाची साथ लाभल्याने जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची बाजू उत्तम राहील, मात्र खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जोडीदारासोबत वैचारिक सुसंवाद साधल्याने मन प्रसन्न राहील. वृषभ: आज तुम्हाला मानसिक शांतता आणि समाधान लाभेल. व्यवसायात नवीन योजनांवर काम करण्यासाठी अनुकूल काळ आहे. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि मन हलके होईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहारात घाईगडबड करणे टाळावे, अन्यथा नुकसान…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात गुरुवारी (दि. ११ जून) मोठे फेरबदल करण्यात आले असून, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत जिल्ह्यातील १४ पोलीस निरीक्षक आणि ५ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या यादीशिवाय आणखीनही काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याची माहिती आहे. कायदा व सुव्यवस्था, प्रशासकीय निकड आणि काही अधिकाऱ्यांच्या विनंतीचा विचार करून जनहितार्थ हे बदली आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. आदेशानुसार सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कोणताही पदग्रहण अवधी न घेता तातडीने नव्या जागी हजर होऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहराच्या लगतच असलेल्या आढा ओढा परिसरामध्ये एक धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. या भागात एका अज्ञात व्यक्तीचा पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आढा ओढा परिसरात एक मृतदेह जळालेल्या स्थितीत पडल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती तात्काळ संगमनेर शहर पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून संगमनेर शहर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह ताब्यात घेतला आहे. हा मृतदेह अंदाजे पन्नास वर्षे वयाच्या पुरुष जातीच्या व्यक्तीचा असल्याचे दिसून येत आहे. मृतदेह…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शहरात सातत्याने गंभीर गुन्हे करून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराविरुद्ध पोलीस प्रशासनाने अखेर ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली आहे. संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अकोले नाका परिसरात राहणाऱ्या राहुल भारत सोनवणे (वय २४ वर्षे) या धोकादायक व्यक्तीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले असून, त्याची रवानगी नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल सोनवणे याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मारहाण, लुटमार, जबरी चोरी आणि घातक शस्त्रांनी गंभीर मारहाण करणे यांसारखे तब्बल १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस प्रशासनाने यापूर्वी त्याच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती, तसेच त्याला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: यश, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळविण्याच्या धडपडीत आजचा माणूस स्वतःचे आरोग्य, नातेसंबंध आणि आनंद हरवून बसत आहे. एव्हरेस्टसारखी यशाची उत्तुंग शिखरे सर केली, तरी आयुष्याच्या प्रवासात माणूस एकटा राहता कामा नये. यशाबरोबरच माणसाला आपल्या आयुष्याचा उत्सव साजरा करता आला पाहिजे, असे प्रतिपादन निवृत्त आयएएस अधिकारी व नाम फाऊंडेशनचे व्याख्याते इंद्रजीत देशमुख (काका) यांनी येथे केले. पूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय पाटणकर यांच्या हस्ते इंद्रजीत देशमुख यांचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना देशमुख यांनी ईश्वरनिष्ठ संतांच्या मांदियाळीत या सप्ताहाची सुरुवात होत असल्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन येवला: येवला तालुक्यातील बदापूर येथील शेतकऱ्यांसमोर सध्या एक मोठे संकट उभे राहिले आहे. येथील ‘वर्मा कंपनी’कडून गेल्या महिनाभरापासून रासायनिक आणि दूषित सांडपाणी उघड्यावर तसेच शेताच्या कडेला असलेल्या नाल्यांमध्ये सोडले जात आहे. या निष्काळजीपणामुळे परिसरातील शेतीचे आणि पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत असून, संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. कंपनीतून निघणारे हे घातक केमिकलचे पाणी जमिनीत मुरल्यामुळे परिसरातील विहिरींचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. हे पाणी आता शेतीसाठी किंवा पिण्यासाठी अजिबात योग्य राहिलेले नाही. दुर्दैवाने, याच विहिरींचे पाणी पिकांना दिल्याने शेतातील पिके जळून खाक होत आहेत, तर सुपीक जमीन सातत्याने नापीक बनत चालली आहे. या दूषित पाण्यामुळे मुख्यत्वे…
