Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी – शिबलापूर ग्रामपंचायत कार्यालयातील घंटागाडीची दुरावस्था आणि महापुरुषांच्या प्रतिमा गोदामात फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर, याविरोधात कायदेशीर लढा देणारे तक्रारदार संजय तबाजी मंतोडे यांना अखेर मोठे यश मिळाले आहे. सुरुवातीला तक्रारदारालाच खोटे ठरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाने अखेर लेखी माफीनामा सादर करत आपली चूक मान्य केली आहे. या निर्णयामुळे सत्य समोर आले असून परिसरातून समाधान व्यक्त होत आहे. संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायतीमध्ये महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान होत असल्याची आणि शासकीय मालमत्तेची हेळसांड होत असल्याची तक्रार संजय मंतोडे यांनी प्रशासनाकडे केली होती. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वस्तुस्थिती मांडणारी बातमी प्रसिद्ध केली होती. मात्र, ही बातमी समोर…
दैनिक राशीभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साही आणि फलदायी ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकता आणि धाडसाचे कौतुक होईल. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची साथ उत्तम असल्याने तुम्ही अधिक कार्यक्षमतेने काम कराल. वृषभ – आज तुम्हाला आर्थिक नियोजनावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. गुंतवणुकीच्या दृष्टीने दिवस चांगला असला तरी घाईने निर्णय घेणे टाळावे. नोकरीमध्ये सहकाऱ्यांच्या मदतीमुळे एखादा कठीण प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. प्रवासाचे योग येतील, मात्र प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे गरजेचे आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. मिथुन – तुमच्या संवादकौशल्यामुळे आज अनेक…
संगमनेर/जळगाव – महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये सध्या प्रचंड गोंधळाची स्थिती असून भाजपच्या खेळीमुळे राज्याच्या सुसंस्कृत राजकारणाचे मोठे नुकसान होत आहे. गटातटाचे राजकारण राज्यासाठी दुर्दैवी असून सरकारने आता तरी राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे आणि त्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. थोरात सध्या विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांनी अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. शेतकऱ्यांची कर्जमाफी आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या दौऱ्यादरम्यान जळगाव जामोद येथे माजी आमदार कृष्णराव इंगळे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘सातपुडा कृषी प्रदर्शना’चे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी बोलताना त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर…
सिन्नर – नाशिक-पुणे जलदगती रेल्वेचा मूळ आराखडा बदलून तो शिर्डीमार्गे वळवण्याच्या निर्णयामुळे सिन्नर तालुक्यातील शेतकरी आणि रेल्वे कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ ३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आणि नाशिक-पुणे महामार्गावर एकाच वेळी ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक-पुणे रेल्वेचा मूळ मार्ग नाशिक–सिन्नर–अकोले–संगमनेर–नारायणगाव–चाकण असा निश्चित करण्यात आला होता. मात्र, नारायणगाव येथील ‘जीएमआरटी’ (GMRT) या आंतरराष्ट्रीय खगोल निरीक्षण प्रकल्पाच्या कामात रेल्वेमुळे अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन, प्रशासनाने नवीन पर्यायी मार्ग पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक असा प्रस्तावित केला आहे. या बदलाची माहिती समोर आल्यापासून मूळ मार्गावरील भागात तीव्र अस्वस्थता असून, हा बदल…
संगमनेर | अनंत पांगारकर – संगमनेर नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडी काल (सोमवारी) पार पडल्या असून, यामध्ये एका महिला नगरसेविकेची कामगिरी सध्या संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. सत्तेत असलेल्या नगरसेवकांना देखील ज्या समित्यांवर स्थान मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, तिथे विरोधी पक्षाच्या एकमेव महिला नगरसेविकेने सर्वच समित्यांवर आपले स्थान निश्चित करून एक नवा राजकीय विक्रम प्रस्थापित केला आहे. सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार धीरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे तसेच उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विशेष सभेत या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. संगमनेर पालिकेत आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील सेवा समितीचे…
संगमनेर, प्रतिनिधी – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सध्या सुरू असलेल्या काँक्रिटिकरणाच्या कामाबाबत ‘RGSS’ टीमने आक्रमक पवित्रा घेतला असून, थेट मैदानावर उतरून कामाची गुणवत्ता तपासली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शिंदे यांनी तात्काळ आपल्या तज्ज्ञ टीमला पाचारण केले आणि प्रत्यक्ष घटनास्थळी तपासणीचे आदेश दिले. मालपाणी ट्रक टर्मिनसपाशी असलेल्या उड्डाणपुलावर करण्यात येत असलेल्या सिमेंट काँक्रिट अस्तरीकरणाच्या जाडीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, RGSS टीमने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कामाची सखोल चौकशी करत पाहणी केली. नाशिक पुणे महामार्गावर मालपाणी इंडस्ट्रीज लगत असलेल्या उड्डाणपुलावर सुरू असलेल्या काँक्रिटिकरणाची जाडी काही ठिकाणी ठरवून दिलेल्या निकषांपेक्षा कमी असल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. यासंदर्भात RGSS कडे…
संगमनेर, प्रतिनिधी – राजकारणापलीकडे जाऊन जेव्हा समाजकारण केले जाते, तेव्हा सामान्यांचे प्रश्न कसे मार्गी लागतात, याचा प्रत्यय संगमनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये आला आहे. नगरसेवक योगेश (चिकू) जाजू यांच्या तत्परतेमुळे परदेशपुरा आणि जुम्मा मशीद परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ड्रेनेजचा प्रश्न निकाली निघाला असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. संगमनेरमधील परदेशपुरा आणि जुम्मा मशीद हा दाट लोकवस्तीचा भाग आहे. या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेजची मोठी समस्या निर्माण झाली होती. सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत होती, याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत होता. अनेकदा मागणी करूनही तांत्रिक कारणांमुळे हे काम रखडलेले होते. ३-४ दिवसांपूर्वी नगरसेवक…
संगमनेर, प्रतिनिधी – विषय समित्या हा खऱ्या अर्थाने नगरपालिकेचा आत्मा असून, गेल्या काही काळातील त्यांची मरगळ झटकून या समित्यांना अधिक शक्तिशाली आणि लोकाभिमुख करण्यावर आपला भर असेल, अशी ग्वाही आमदार सत्यजीत तांबे यांनी देत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संगमनेर शहराच्या आगामी विकासाची आणि प्रशासकीय शिस्तीची एक व्यापक दिशा स्पष्ट केली. संगमनेर नगरपालिकेच्या विशेष विषय समित्यांच्या सदस्य, सभापती निवडीचा कार्यक्रम सोमवारी तहसीलदार धीरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे उपस्थित होत्या. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या स्वागत समारंभावेळी आमदार तांबे बोलत होते. तांबे यांनी विषय समित्यांच्या घसरलेल्या प्रभावावर भाष्य केले. बजेट आणि अधिकारांच्या मर्यादांमुळे या समित्यांकडे दुर्लक्ष झाले होते,…
दैनिक राशीभविष्य: मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जावान आणि उत्साहाचा असेल. तुमच्या प्रलंबित कामांना गती मिळेल आणि नियोजित उद्दिष्टे वेळेत पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कार्यक्षमतेचे कौतुक होईल, मात्र घाईघाईत निर्णय घेणे टाळावे. कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील. आरोग्याच्या दृष्टीने आज दिवस चांगला असला तरी डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो, त्यामुळे वेळेवर विश्रांती घेणे आवश्यक आहे. वृषभ: आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अत्यंत फलदायी ठरेल. गुंतवणुकीचे जुने व्यवहार आज तुम्हाला नफा मिळवून देऊ शकतात. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील आणि व्यापारात वाढ होण्याची चिन्हे आहेत. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवल्याने घरातील वातावरण आनंदी राहील. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे…
संगमनेर: प्रतिनिधी संगमनेर शहराची जीवनवाहिनी असलेल्या प्रवरा-म्हाळुंगी नदीच्या पात्रातून सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई केली. शांतीघाट परिसरात वाळू तस्करी सुरू असताना पथकाने छापा टाकला. यावेळी पळून जाणाऱ्या तस्करांचा थरारक पाठलाग करत दोघांना रंगेहात पकडण्यात आले, तर अन्य आठ जण उसाच्या शेतातून निसटले. या कारवाईत वाळूसह रिक्षा जप्त करण्यात आली असून १० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संगमनेरमधील शांतीघाट परिसरात रिक्षाच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा व वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत तहसीलदारांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार महसूल आणि पोलीस विभागाचे…
