Author: अनंत पांगारकर
https://x.com/i/status/2069734732120612878 महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेवर नवरा-नवरीच्या नावापुढे जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याच्या राज्य शासनाच्या संभाव्य विचारावर आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला असून, असा निर्णय घेणे पुरोगामी महाराष्ट्रासाठी हास्यास्पद ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी यासंदर्भात एक ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, एका बाजूला बालविवाह रोखण्यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, सक्षम यंत्रणा उभारणे आणि व्यापक स्तरावर जनजागृती करणे यांसारखे अनेक ठोस आणि प्रभावी मार्ग उपलब्ध आहेत. असे असताना शासन अशा केवळ प्रतीकात्मक आणि वरवरच्या उपायांवर भर देत आहे, जे अजिबात योग्य नाही. इतर काही राज्यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: चेक बाऊन्स प्रकरणात संगमनेर न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्याचा चेक घेऊन फौजदारी खटला दाखल करणे फिर्यादीला चांगलेच महागात पडले आहे. कायदेशीर त्रुटींमुळे न्यायालयाने आरोपी संभाजी पांडुरंग पवार यांची निर्दोष मुक्तता केली आहे. फिर्यादी डॉ. अमोल संताजी कर्पे आणि आरोपीचा मुलगा डॉ. विक्रम पवार हे दोघेही एकाच व्यवसायातील असल्याने त्यांची ओळख होती. वायनरी व्यवसाय सुरू करण्यासाठी आरोपी व त्यांच्या मुलाने डॉ. कर्पे यांच्याकडून ५ लाख रुपये उसने घेतले होते. त्यातील दीड लाख रुपये परत केल्यानंतर, उर्वरित ३ लाख ५० हजार रुपयांच्या वसुलीसाठी फिर्यादीला एक चेक देण्यात आला. हा चेक बँकेत…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत होणाऱ्या वीजखंडितीच्या प्रश्नावर आमदार अमोल खताळ यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला आहे. राज्यातील लोडशेडिंगच्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधत त्यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना होत असलेला त्रास सभागृहात मांडला. हे लोडशेडिंग तातडीने बंद करून ग्रामीण भागाला अखंड आणि सुरळीत वीजपुरवठा देण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. राज्यात कुठेही लोडशेडिंग होत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असले, तरी संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील वस्तुस्थिती अत्यंत वेगळी असल्याचे आमदार खताळ यांनी निदर्शनास आणून दिले. महावितरणचे स्थानिक अधिकारी वरिष्ठ स्तरावरून वीज व्यवस्थापन…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: अमली पदार्थांचा समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात ‘अमली पदार्थविरोधी स्वतंत्र युनिट’ उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात केली. संगमनेर शहर आणि ग्रामीण भागासह राज्यभरात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात आता प्रशासनाकडून अत्यंत कठोर पावले उचलली जाणार आहेत. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात वेळोवेळी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे. संगमनेर तालुक्यात अमली पदार्थांचा पुरवठा, तस्करी आणि विक्रीचे प्रमाण वाढत असल्याने स्थानिक नागरिकांकडून तीव्र चिंता व्यक्त केली जात होती. युवकांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या घातक प्रवृत्तीला तातडीने आळा घालण्याची आग्रही मागणी आमदार अमोल खताळ यांनी गृहमंत्री…
आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस नवीन कामांचा श्रीगणेशा करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. जुन्या मित्रांच्या अचानक झालेल्या भेटीमुळे रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि व्यवसायात भागीदारीतून मोठा धनलाभ संभवतो. प्रवास करताना मात्र थोडी काळजी घ्या, कारण मानसिक स्वास्थ्यात काही अंशी चढ-उतार जाणवू शकतात. वृषभ: आज तुम्हाला कार्यक्षेत्रात आणि व्यवहारात अत्यंत सतर्क राहावे लागेल. कायदेशीर आणि न्यायालयीन प्रकरणांमधील जुने वाद संपुष्टात आल्यामुळे मोठा दिलासा मिळेल. मुलांकडून एखादी अतिशय आनंदाची बातमी समजेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा. मिथुन: आज सामाजिक क्षेत्रात संवाद कौशल्याच्या जोरावर तुम्ही कठीण प्रश्न सहज सोडवू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांची कृपा लाभेल, ज्यामुळे पदोन्नतीचे मार्ग मोकळे…
अहिल्यानगर: लग्नाचे आमिष दाखवून तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील एका तरुणाच्या फिर्यादीवरून ‘लुटेरी दुल्हन’सह तिच्या मावशीवर, स्थानिक महिला एजंट आणि मध्यस्थाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. अजय भीमराज रोहोम (वय ३१, रा. एकरुखे, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) या तरुणाने या संदर्भात रीतसर फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल ज्ञानदेव पिंजारी (रा. श्रीरामपूर), संगीता शिंदे (रा. आळे, जुन्नर), सोनाली मोहन भोसले (रा. परतूर, जालना) आणि नवरी मुलगी राधा रमेश काळे (रा. जालना) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय लग्नासाठी मुलगी पाहत असताना त्याचा मित्र अमोल…
आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामगिरीचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. आर्थिक बाजू भक्कम राहील, परंतु नको त्या गोष्टींवर खर्च करणे टाळावे. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेली कामे आज गतीने पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होईल. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुम्हाला मोलाचे ठरेल. रखडलेले धन परत मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक नियोजन नीट…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक मोठी कारवाई करत ५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या एका खाजगी इसमाला रंगेहात पकडले आहे. मंडळ अधिकाऱ्याच्या नावाने ही लाच मागण्यात आली होती. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपीविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नाशिक एसीबीच्या पथकाने ही धडक कारवाई केली. नितीन किसन खर्डे (वय २९ वर्षे, रा. चंदनापुरी झोळे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असे लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आलेल्या खाजगी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली खांडवी यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर जाणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा स्पष्ट सूचना आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालखी मार्गावरील सुविधा, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छता व सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. राज्य शासनाच्या माध्यमातून पालखी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून, त्याद्वारे सर्व आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार खताळ यांनी दिले. बैठकीनंतर त्यांनी नाशिक आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: डोंगराच्या कुशीत वेल्हाळे परिसरातील अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय प्रांगणात नवनिर्मित आंतरराष्ट्रीय आकाराच्या ‘लोकनेते बाळासाहेब थोरात फुटबॉल मैदाना’चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. राज्याचे माजी महसूल व शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते या मैदानाचा लोकार्पण सोहळा पार पडला. जागतिक स्तरावर कमालीची लोकप्रियता असलेला फुटबॉल खेळ संगमनेरच्या मातीत रुजावा आणि येथून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत, अशी अपेक्षा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केली. या मैदानावर आता प्रत्येक रविवारी ‘संगमनेर संडे लीग’ अंतर्गत फुटबॉल सामन्यांचे आयोजन केले जाणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी खेळाडूंना मेडल…
