Author: अनंत पांगारकर
मुंबई – विशेष प्रतिनिधी पुढील पिढीला प्रदूषणमुक्त वातावरण देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व पेट्रोल पंपांवर ‘नो पीयूसी, नो फ्युएल’ (नो प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, नो पेट्रोल) हे धोरण लवकरच सक्तीने लागू केले जाईल. या अनुषंगाने परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत परिवहन मंत्री बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सह सचिव (परिवहन) राजेंद्र होळकर यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ठरलेल्या धोरणानुसार, पेट्रोल पंपांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने प्रत्येक वाहनाचा क्रमांक स्कॅन केला जाईल, जेणेकरून त्याच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची (PUC) वैधता तपासली जाईल. जर एखाद्या वाहनाकडे वैध पीयूसी प्रमाणपत्र नसेल, तर त्याला…
दोन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप श्रीरामपूर – श्रीरामपूर तालुक्यात एका दोन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घृणास्पद घटनेत, विशेष न्यायालयाने आरोपी भास्कर धाकू मोरे याला मरेपर्यंत जन्मठेप आणि १० हजार रुपयांच्या दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. या निकालाने पीडितेला न्याय मिळाला असल्याचे मानले जात आहे. पीडित चिमुरडीला लघवी करताना त्रास होऊ लागला. कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी आणले असता, तपासणी करणाऱ्या परिचारिकेला तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे लक्षात आले. अधिक चौकशी केली असता, चिमुरडीने आरोपी भास्कर मोरे याने केलेल्या कृत्याची माहिती दिली. तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेची गंभीर दखल घेत, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तात्काळ भारतीय दंड…
संगमनेर – ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक यावर्षी केवळ धार्मिक उत्सवापुरती मर्यादित न राहता, सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण ठरली आहे. पैगंबर मोहम्मद यांच्या शांतता, स्वच्छता आणि मानवतेच्या शिकवणुकीवर आधारित विविध उपक्रमांची दखल घेत, ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन आणि न्यूज एन एम पी परिवाराने काही संस्थांना पुरस्कार जाहीर केले आहेत. यावर्षीच्या मिरवणुकीदरम्यान अनेक गट सक्रिय झाले होते. काही स्वयंसेवकांनी मिरवणूक संपल्यावर तात्काळ रस्त्यांची स्वच्छता केली आणि ‘स्वच्छता हाच धर्म’ असा संदेश दिला. त्यांच्या या कृतीचे नागरिकांनी विशेष कौतुक केले. त्याचप्रमाणे, एका गटाने नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, उपचार आणि औषधे असलेले महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते. यामुळे धार्मिक कार्यक्रमासोबतच आरोग्यसेवेचा लाभही लोकांना मिळाला. इतर काही गटांनी…
संगमनेर- सोशल मीडियावर मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी यूट्यूबवरील ‘संगीता वानखेडे’ या महिलेविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, संगमनेरातून त्यांच्या कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. या संदर्भात प्रकाश कडलग यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, 07 सप्टेंबर 2025 रोजी त्यांनी यूट्यूबवर ‘स्पष्ट मत LIVE’ या चॅनलवर संगीता वानखेडे यांचा एक व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओमध्ये वानखेडे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईत काढलेल्या मोर्चाविषयी बोलताना, मराठा महिलांची बदनामी करणारी अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली. त्यांच्या या विधानामुळे मराठा…
मुंबई: भाजपचे युवा आणि महत्त्वाकांक्षी नेते मोहित कंबोज यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंबोज यांच्या या निर्णयांमुळे भाजप वर्तुळात धक्का बसला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मोहित कंबोज यांनी स्वतः या निर्णयाची पुष्टी केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. त्यांनी सांगितले की, आता त्यांना आपला व्यवसाय आणि कुटुंबाला अधिक वेळ द्यायचा आहे. राजकीय वर्तुळात या निर्णयाची विविध प्रकारे चर्चा होत आहे. अनेकांसाठी हा अनपेक्षित निर्णय आहे. मोहित कंबोज यांचे भाजपमधील योगदान आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले त्यांचे जवळचे संबंध पाहता, त्यांच्या या निर्णयाकडे लक्ष…
मुंबई – मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीला आता एक नवा आणि महत्त्वाचा नियम जोडण्यात आला आहे. भाजपचे मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे. या निर्णयानुसार, ज्या प्रकरणांमध्ये ५ लाख किंवा त्याहून कमी रकमेचे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे, केवळ त्याच प्रकरणांमधील गुन्हे मागे घेतले जातील. यामुळे, सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांसाठी ही एक मोठी अट ठरू शकते. मराठा आंदोलनादरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे सर्व आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्याची मागणी केली होती. सरकारने तेव्हा हे आश्वासन दिले होते आणि…
मेष (Aries) – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. वृषभ (Taurus) – आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. करिअरमध्ये प्रगती होईल आणि वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. पैशांच्या बाबतीत आजचा दिवस चांगला आहे. मिथुन (Gemini) – आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी काही आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. लव्ह लाईफमध्ये गोडवा येईल. आर्थिक गुंतवणुकीचा विचार करत असाल तर चांगल्या तज्ञांचा सल्ला घ्या. कर्क (Cancer) – आज तुम्ही भावनिकदृष्ट्या थोडे…
मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणात आज एका महत्त्वाच्या घडामोडीने लक्ष वेधून घेतले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीसाठी ही भेट झाल्याचे समोर आले असून, या पदासाठी काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. आज सकाळी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि उपनेते अमीन पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ २९ ऑगस्ट २०२४ रोजी संपल्यानंतर हे पद रिक्त आहे. काँग्रेसकडून हे पद तातडीने…
संगमनेर – मोहसीन शेख धार्मिक उत्सव म्हटला की उत्साहाचे वातावरण असते, मात्र या उत्साहात सामाजिक जबाबदारीचा संदेश देणारी उदाहरणे क्वचितच पाहायला मिळतात. संगमनेर शहरात हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत (जुलूस) असेच एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. येथील एकता नगर सोशल ग्रुपच्या तरुणांनी हातात पारंपरिक झेंडे किंवा बॅनर न घेता, ‘झाडू’ घेऊन मिरवणुकीच्या मागे स्वच्छतेची मोहीम राबवली. त्यांच्या या कृतीमुळे धार्मिक उत्सवाला एक नवी सामाजिक दिशा मिळाली आहे. सोमवारी, (८ सप्टेंबर) नाईकवाडपुरा येथील जुम्मा मस्जिद येथून सुरू झालेली मिरवणूक शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून पुढे जात होती. तरुणाईचा जोश आणि उत्साह यात भरलेला होता. मात्र, मिरवणूक पुढे सरकत असताना, एकता…
संगमनेर – ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत परवानगी नसतानाही मोठ्या आवाजात डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी दोन डीजे वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे परिसरात विनापरवाना डीजे वाजवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन्ही डीजे वाहने जप्त केली असून, आयोजकांचाही शोध सुरू आहे. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांकडून ही कठोर भूमिका घेतली असून, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले, ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार कोणताही लाऊड स्पीकर किंवा डीजे वाजवण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी देताना आवाजाची पातळी (डेसिबल मीटर) आणि वेळेचे नियम पाळणे आवश्यक असते. मात्र, काल शहरात आयोजित केलेल्या ईद-ए-मिलाद मिरवणुकीसाठी पोलिसांकडून लाऊड…
