Author: अनंत पांगारकर
संगमनेर | प्रतिनिधी सहकारी क्षेत्रात नावलौकिक असलेल्या संगमनेर शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे १४ ते १५ कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. बनावट कर्जप्रकरणे आणि कोऱ्या विड्रॉवल स्लिपचा वापर करून कर्जदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून संस्थेच्या संचालक मंडळासह २२ जणांविरुद्ध संगमनेर न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या पतसंस्था विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश फुलचंद गांधी, बाळासाहेब सहादु हाडवळे, नंदू सुभाष वर्पे, सूर्यभान शेटे, नंदू कारभारी खेमनार, बाळासाहेब जगन्नाथ आहेर, जिजाबापु पोपट शिंगोटे, नामदेव गोविंद आहेर, सुधाकर बाजीराव जाधव, रंगनाथ किसन सानप, अमोल दादासाहेब गुंजाळ, संतोष संपत सातपुते, राजेंद्र…
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे आज पूर्णत्वास जातील. नोकरी किंवा व्यवसायात नवीन प्रकल्पांची आखणी करण्यासाठी हा उत्तम काळ असून वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. आर्थिक बाजू भक्कम राहील, मात्र उत्साहाच्या भरात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ – आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. गुंतवणुकीच्या क्षेत्रात असलेल्या व्यक्तींना चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभल्यामुळे कामाचा ताण कमी होईल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. डोळ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर विश्रांती घ्या.…
श्रीरामपूर | महाराष्ट्र संवाद न्यूज चोरीच्या तपासासाठी गेलेल्या पोलीस पथकावर संशयित आरोपीने ट्रॅक्टर घालून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथे घडली आहे. या भीषण हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि त्यांना वाचवण्यासाठी धावलेला एक नागरिक गंभीर जखमी झाले असून, फिल्मी स्टाईलने चालत्या ट्रॅक्टरवर झडप घालून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एका टेम्पो चोरीचा (MH 14 AH 369) गुन्हा दाखल असून हा टेम्पो संशयित आरोपी लक्ष्मीकांत काळू मुंजाळ (रा. कमालपूर) याच्याकडे असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक देशमुख यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस कर्मचारी अजित पठारे व प्रसाद साळवे यांनी…
मुंबई | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण कमालीचे वाढले असून यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी ग्रामीण भागात ‘प्रकाश योजना’ कार्यान्वित करण्यासह सुरक्षिततेच्या विविध प्रभावी उपाययोजना करण्याची आग्रही मागणी केली. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर- मंत्रालयातील दालनात झालेल्या या सविस्तर चर्चेत डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सांगितले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका कृषी आणि दूध व्यवसायात प्रगत आहे. पशुपालनामुळे महिला आणि शेतकऱ्यांचा चारा काढण्यासाठी शेतात सातत्याने वावर असतो,…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज निवडणुकीच्या विजयाचा आनंद साजरा करताना उधळलेला गुलाल आणि कचरा साफ करण्याच्या किरकोळ कारणावरून मंगळवारी (दि. २३ डिसेंबर) संगमनेरच्या इंदिरा नगर भागात मोठा राडा झाला. या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले असून, नवनिर्वाचित नगरसेविका वनिता गाडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एकाच कुटुंबातील चार सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच गाडे कुटुंबीयांवरही गुन्हा दाखल झाला असल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरा नगरमधील गल्ली क्रमांक ४ मध्ये मंगळवारी (२३ डिसेंबर) सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. निवडणुकीच्या मिरवणुकीनंतर परिसरात पडलेला गुलाल स्वच्छ करण्यासाठी नगर परिषदेची अग्निशामक गाडी बोलावण्यात आली होती. पाण्याचा…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या प्रमुख आघाड्यांसोबतच आता भारतीय कम्युनिस्ट पक्षाने स्वबळावर मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या या निवडणुकीत संगमनेर तालुक्यातील सर्व ९ जिल्हा परिषद गट आणि १८ पंचायत समिती गणांमध्ये पक्षाचे उमेदवार उभे करून ताकदीने निवडणूक लढवली जाणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संगमनेर व फॉरेस्ट वाहतूकदार संघटना आणि किसान सभा यांच्या संयुक्त विद्यमाने अकोले नाक्यावरील लालतारा कार्यालयामध्ये गुरुवारी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉ. बापू कानवडे होते. बैठकीची अध्यक्षीय सूचना…
अहिल्यानगर | महाराष्ट्र संवाद न्यूज- जिल्ह्यातील वाढता बिबट-मानव संघर्ष प्रभावीपणे हाताळण्यासाठी आणि वन्यजीव संरक्षणाकरिता वनविभाग आता अधिक गतिमान झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या १४ रेस्क्यू वाहनांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते बुधवारी निळवंडे येथे करण्यात आले. या नवीन वाहनांमुळे वनविभागाच्या ताफ्याचे बळ वाढले असून, बिबट्यांच्या दहशतीखाली असलेल्या गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात बिबट्यांचा वाढता वावर आणि मानवी वस्तीत होणारे त्यांचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाकडे जलद प्रतिसाद वाहनांची कमतरता होती. ही गरज ओळखून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी एकूण १४…
अहिल्यानगर | महाराष्ट्र संवाद न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्या आणि मानवामधील वाढता संघर्ष रोखण्यासाठी वन विभागाने आता आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. केवळ पिंजरे लावून किंवा गस्त घालून बिबट्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होत असल्याने, वन विभागाने पुण्यातील ‘डी.ए.डी.ए. रिसर्च फाऊंडेशन’ संचलित ‘डावेल लाईफसायन्सेस’ यांच्या सहकार्याने ‘एआय वाईल्ड नेत्रा’ ही स्वदेशी इंटेलिजंट सर्व्हेलन्स सिस्टीम विकसित केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेली ही यंत्रणा आता नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ही यंत्रणा गस्त घालणे किंवा पिंजरे लावणे या पारंपरिक उपायांच्या पलीकडे जाऊन काम करते. यामध्ये प्रगत ‘कॉम्प्युटर व्हिजन’ आणि ‘डीप लर्निंग अल्गोरिदम’चा वापर करण्यात आला आहे. अनेकदा शेतातील सामान्य सेन्सर वाऱ्यामुळे हलणारी…
मेष- उद्याचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल. अडकलेली कामे मार्गी लागतील, मात्र आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. घाईघाईत कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. वृषभ- आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता असून कुटुंबासोबत तुम्ही आनंदाचे क्षण घालवाल. नवीन गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे आणि जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. अनावश्यक खर्च टाळणे तुमच्या हिताचे ठरेल. मिथुन- नोकरीत सकारात्मक बदलाचे संकेत असून मित्र-मैत्रिणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल आणि प्रवासाचे योग येतील. बोलण्यावर संयम ठेवा जेणेकरून विनाकारण वाद होणार नाहीत. कर्क- तुम्हाला उद्या मानसिक शांतता लाभेल आणि घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. कामाचा…
संगमनेर | अनंत पांगारकर राजकीय सुसंस्कृतपणाचा वारसा लाभलेल्या संगमनेर शहरात गेल्या दोन दिवसांपासून नवनिर्वाचित नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांनी घातलेल्या धुमाकुळाने शांतताप्रिय नागरिक गोंधळात सापडले आहेत. या गुंडशाहीची गंभीर दखल घेत संगमनेर शहर पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, कोणाचीही गय केली जाणार नाही, असा थेट इशारा पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिला आहे. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या सातत्याच्या प्रयत्नातून संगमनेरने अनेक बाबतीत विकासाची मोठी भरारी घेतली आहे. एकीकडे शांत आणि संयमी असे थोरात-तांबे यांचे नेतृत्व राज्यभरात ओळखले जाते. या अनुषंगाने संगमनेरने शांत आणि सुसंस्कृत शहराचे स्वतंत्र असे अस्तित्व राज्याच्या पटलावर…
