Author: अनंत पांगारकर
मुंबई, विशेष प्रतिनिधी: मालमत्ता करावरील शास्ती माफीसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या अभय योजनेच्या अंमलबजावणीत निर्माण होत असलेल्या तांत्रिक अडचणींबाबत आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शुक्रवारी घेतलेल्या या भेटीत त्यांनी योजनेचा लाभ राज्यातील नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना वेळेत मिळत नसल्याचे त्यांनी शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले आणि प्रणालीतील तांत्रिक त्रुटी तात्काळ दूर करण्याची मागणी केली. योजनेच्या अंमलबजावणीत नेमके काय अडथळे? राज्य सरकारने 50% शास्ती माफीसाठी अनेक नगरपरिषदांना परवानगी दिली आहे. संगमनेर नगरपरिषदेला 28 जुलै 2025 रोजी परवानगी मिळाल्यानंतरही IWBP सॉफ्टवेअर प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे ही योजना प्रभावीपणे लागू करता येत नाहीये. या अडचणींमुळे नागरिकांमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील निमोण येथील भूमिपुत्र आणि सध्या येवला येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले संदीप पुंजा मंडलिक यांना त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी तिसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांच्या हस्ते त्यांना हे प्रतिष्ठित पदक प्रदान करण्यात आले. पोलीस निरीक्षक मंडलिक यांनी गडचिरोली येथे नक्षलवाद्यांविरुद्ध केलेल्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे. २०१३ ते २०२४ या काळात ते गडचिरोली येथे कार्यरत असताना, त्यांनी खोब्रामेंढा गावाजवळच्या घनदाट जंगलात झालेल्या एका मोठ्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी: उत्तर अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या भंडारदरा धरणाला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक शताब्दी महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे मुख्य सचिव, तसेच जलसंपदा आणि वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे. या समितीचा मुख्य उद्देश शताब्दी महोत्सवाचे नियोजन करणे, धरणाच्या संवर्धनासाठी उपाययोजना सुचवणे, आणि परिसरातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधणे हा आहे. भंडारदरा धरण, ज्याला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय असेही…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त नाशिक: नाशिकमधील एसएमबीटी हॉस्पिटलने आयोजित केलेल्या ‘आरोग्यसाधना’ शिबिराचा नुकताच यशस्वी समारोप झाला आहे. गेल्या १० वर्षांपासून ग्रामीण भागातील लोकांसाठी हे शिबिर आयोजित केले जाते. यावर्षीच्या शिबिराने अनेक विक्रम मोडत यशाची नवीन उंची गाठली आहे. शिबिराची लक्षवेधी आकडेवारी गेल्या ३० दिवसांच्या कालावधीत, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह राज्यातील १४ जिल्ह्यांतील ३० हजारांहून अधिक रुग्णांना या शिबिराचा लाभ झाला आहे. दररोज सरासरी १००० रुग्णांची तपासणी करण्यात आली. हे फक्त आकडे नाहीत, तर हजारो रुग्णांना मिळालेल्या उपचारांचे आणि आशेचे हे प्रतीक आहे, असे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. अत्याधुनिक उपचार आणि सेवा या शिबिरात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना (MJPJAY), प्रधानमंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त पुणे: पुणे शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी ‘कोकेन’ म्हणून जप्त केलेला पदार्थ प्रत्यक्षात कोकेन नव्हता. या दाव्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नेमकं प्रकरण काय? 27 जुलै रोजी पहाटे खराडी येथील ‘स्टे बर्ड अझुर सूट’ हॉटेलमध्ये पुणे पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 5 पुरुष आणि 2 महिलांना अटक केली. अटकेत असलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त, अहिल्यानगर: अहिल्यानगर तालुका पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ८८ लाख २० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये बनावट नोटा, त्यांना तयार करण्यासाठी वापरली जाणारी मशिनरी आणि एक वाहन यांचा समावेश आहे. या प्रकरणी अहिल्यानगर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते आपल्या पथकासह हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना आंबिलवाडी शिवारात दोन संशयित व्यक्ती काळ्या रंगाच्या महिंद्रा थार गाडीतून फिरत असून, ते पान टपरीवर ५०० रुपयांच्या बनावट नोटा देऊन सिगारेट…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्याची जोरदार मागणी केली. तसेच, राज्यघटनेवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध करत सर्वांनी एकत्रित येऊन याविरोधात आवाज उठवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त संगमनेर बसस्थानकासमोर मातंग एकता समाज व सकल मातंग समाजाच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात थोरात बोलत होते. यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनाही अभिवादन करण्यात आले. बाळासाहेब थोरात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांसारख्या संतांना आणि समाजसुधारकांना त्रास देणारी धर्मांध शक्ती आजही समाजात कार्यरत आहे. याच शक्तींनी महात्मा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त, शिर्डी: महसूल विभागाने अधिक संवेदनशीलतेने काम करत सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. राहाता येथे ‘महसूल सप्ताह – २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी मंत्री तथा अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने, तहसीलदार अमोल मोरे, राहाता नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना विखे पाटील यांनी त्यांच्या महसूल मंत्रिपदाच्या कार्यकाळातील काही उपक्रमांची आठवण करून दिली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. या योजनेचा लाभ सरकारी सेवानिवृत्त महिलांसह हजारो पुरुषांनी घेतल्याचं उघड झालं आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. या योजनेत सुमारे ४ हजार ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे. यावरून विरोधक सरकारवर चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेवर सविस्तर चर्चा झाली. ज्या पुरुषांनी योजनेचा चुकीचा फायदा घेतला आहे, त्यांची चौकशी करून त्यांच्याकडून पैसे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त, जळगाव: एका महिला तलाठ्याला 25 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. वडिलोपार्जित शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील जुन्या नोंदी कमी करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ही कारवाई केली असून, या प्रकरणी तलाठ्यासह एका रोजगार सेवक आणि एका मध्यस्थालाही अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या सात भावंडांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर काही जुन्या नोंदी होत्या. त्या कमी करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी अर्ज केला होता. तलाठी मोमीन दिलशाद अब्दुल रहिम हिने अर्ज स्वीकारला, मात्र पोचपावती दिली नाही. नंतर पाठपुरावा केला असता, तिने कामासाठी 25 हजार रुपयांची मागणी…
