Author: अनंत पांगारकर

संगमनेर, प्रतिनिधी- “काम केलंय, कमाल करूया” ही केवळ घोषणा नसून शहराच्या सर्वांगीण प्रगतीचे एक प्रबळ व्हिजन आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक राजेश मालपाणी यांनी केले. नवनियुक्त नगराध्यक्षा मैथिली तांबे आणि नगरसेवकांच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात मालपाणी यांनी शहराच्या विकासासाठी वैयक्तिक जबाबदारीवर भर दिला. ते म्हणाले की, ‘व्हिजन २.०’ यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे, कारण प्रगती ही केवळ प्रशासकीय निर्णयावर अवलंबून नसून ती लोकसहभागातून निर्माण होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जे. एफ. केनेडी यांच्या प्रसिद्ध वाक्याचा संदर्भ देत त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, शहराने माझ्यासाठी काय केले…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  लोकशाहीत नागरिकांना जसे मूलभूत अधिकार आहेत, तसेच काही कर्तव्येही आहेत. संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ लोकप्रतिनिधी नव्हे, तर जनतेचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. पारदर्शकता वाढवण्यासाठी आता प्रत्येक नगरसेवकाचे काम आणि त्याचे मूल्यमापन थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवले जाईल, अशी महत्त्वाची घोषणा आमदार सत्यजित तांबे यांनी केली. संगमनेरच्या नूतन नगराध्यक्ष डॉ मैथिली तांबे आणि नूतन नगरसेवकांनी शनिवारी आपल्या पदाचा पदभार हाती घेतला, यावेळी तांबे बोलत होते. राज्याचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, उद्योजक राजेश मालपाणी मनीषा मालपाणी गिरीश मालपाणी आदी यावेळी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या लोकशाहीत विचारांची देवाणघेवाण आणि निरोगी राजकीय स्पर्धा अभिप्रेत होती. मात्र, आज राज्याच्या राजकारणात जे काही सुरू आहे, ते अत्यंत विदारक आहे. सत्तेसाठीची ही जीवघेणी स्पर्धा आणि निष्ठावंतांचा गळा घोटण्याची वृत्ती महाराष्ट्राला एका चुकीच्या वळणावर घेऊन जात आहे, अशा शब्दांत माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील सद्य राजकीय स्थितीवर आपली तीव्र चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी राज्यातील अस्थिर राजकारणावर भाष्य करतानाच संगमनेरच्या सुसंस्कृत परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत राज्यातील हा ट्रेंड संगमनेरमध्ये येऊ न देता संगमनेरने आपले वेगळेपण जपण्याचे आवाहन केले. संगमनेर नगरपालिकेच्या प्रांगणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीचे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  स्त्री स्वतःचे आणि समाजाचे भविष्य घडवते, या विचारांना स्मरून मी संगमनेरच्या सेवेसाठी सज्ज आहे, असे भावनिक उद्गार संगमनेरच्या नवनियुक्त नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी काढले. संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित सभेत त्या बोलत होत्या. प्रियदर्शनी इंदिरा गांधी भवनांमध्ये संगमनेर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिली सत्यजित तांबे यांनी नगराध्यक्ष खुर्चीवर बसून आपला पदभार स्वीकारला. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी, मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, जर्मनीच्या माजी खासदार क्लोडिया नॉलटे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर विकासाच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिले आहे. आता याच विकासप्रक्रियेत भर घालत संगमनेर शहरातील नागरिकांसाठी आमदार सत्यजित तांबे यांनी एक मोठा दिलासा मिळवून दिला आहे. आमदार तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेर नगरपालिकेत थकीत मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफीसाठी ‘अभय योजना’ अखेर सुरू झाली असून, यामुळे शहरातील हजारो मालमत्ताधारकांना सुमारे २ कोटी रुपयांच्या शास्तीकरातून मुक्तता मिळणार आहे. अधिवेशनातील आवाज आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट- नगरपरिषद कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरील शास्तीमुळे सामान्य नागरिकांवर कराचा मोठा बोजा पडत होता. अनेकदा नागरिक शास्तीची रक्कम भरत असूनही ती घरपट्टीमध्ये समाविष्ट केली जात नव्हती, ज्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत होता. हा तांत्रिक…

Read More

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक असून रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम संधी मिळेल. तुमच्या स्वभावातील जिद्द आणि आत्मविश्वास यामुळे कठीण कार्ये सहज साध्य होतील, मात्र रागावर नियंत्रण ठेवणे तितकेच गरजेचे आहे अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. कौटुंबिक वातावरण सुखाचे राहील आणि संध्याकाळचा वेळ आनंदात जाईल. वृषभ: आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. अनावश्यक खर्चावर मर्यादा घालणे भविष्यातील बचतीसाठी फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास नाते अधिक घट्ट होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयी पाळा. मिथुन: नशिबाची साथ लाभल्यामुळे आज तुमचे मनोबल वाढलेले दिसेल. व्यवसायात नवीन प्रयोग किंवा करार करण्यासाठी अनुकूल परिस्थिती…

Read More

संगमनेर | प्रतिनिधी ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या ‘जलजीवन मिशन’ आणि ‘घरकुल’ यांसारख्या लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अत्यंत संवेदनशीलपणे होणे आवश्यक आहे. या योजना केवळ कागदावर न राहता, अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी आणि त्यातील त्रुटी तातडीने दूर कराव्यात. कामात दिरंगाई किंवा निकृष्ट दर्जा खपवून घेतला जाणार नाही, अशा कडक सूचना आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाला दिल्या. संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित विविध विभागांच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत बोलताना आ. खताळ म्हणाले की, जेव्हा ग्रामीण भागातील नागरिक…

Read More

नेवासा | महाराष्ट्र संवाद न्यूज वीज चोरीच्या कारवाईत तडजोड करून दंड कमी करण्यासाठी १ लाख २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, त्यापैकी ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांना अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे.  या कारवाईत किरण गजेंद्र मोरे (वय ३४, सहाय्यक अभियंता, महावितरण उपविभाग नेवासा) आणि शिवकुमार नारायण आचारी (वय ४७, प्रधान तंत्रज्ञ, महावितरण नेवासा ग्रामीण) या दोन लोकसेवकांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, या प्रकरणातील तक्रारदाराचे नेवासा शहरात राहते घर व पाण्याचा प्लांट आहे. २२ डिसेंबर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात पतंगबाजीचा उत्साह वाढत असला तरी, नायलॉन मांजाचा धोका पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री व वापरावर शहरात कडक बंदी घालून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी ‘राहुल गांधी समर्थक संघाच्या’ (RGSS) वतीने संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी देविदास गोरे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. RGSSने दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, नायलॉन मांजा हा प्लास्टिक मिश्रित आणि अविघटनशील असल्याने तो सहजासहजी तुटत नाही. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या गळ्याला हा मांजा अडकून गंभीर दुखापत होण्याच्या किंवा मृत्यू होण्याच्या घटना दरवर्षी घडत असून मानवी जीव धोक्यात आला…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  राज्यात यंदा रब्बी हंगामासाठी निसर्गाची साथ लाभल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या आहेत. मात्र, पिके ऐन जोमात असतानाच राज्यात युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी कृषिमंत्री तथा काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. “शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता शासनाने तातडीने सर्वत्र युरिया उपलब्ध करून द्यावा,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, यावर्षी संगमनेर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले. यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका या पिकांसह कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी…

Read More