Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली आणि राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या संगमनेर शेतकी संघाच्या अध्यक्षपदी संपतराव विष्णू डोंगरे यांची तर उपाध्यक्षपदी सुनील कडलग यांची निवड झाली. संघाच्या अतिथीगृहामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी योगेश कापसे यांच्या देखरेखीखाली व आमदार बाळासाहेब थोरात, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते या निवडी करण्यात आल्या. अध्यक्षपदासाठी डोंगरे यांच्या नांवाची सूचना दिलीप वर्पे यांनी मांडली. शिवाजी दिघे यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्षपदासाठी कडलग यांच्या नांवाची सूचना सचिन दिघे यांनी मांडली. त्यास तुकाराम कोठवळ यांनी अनुमोदन दिले. यावेळी संचालक साहेबराव बारवे, दिलीप वर्पे, बाळकृष्ण…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पंचायत राज व्यवस्थेसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देताना सहकार साहित्य, समाजकारण, शिक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रात दिशादर्शक काम करणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रोवला. ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने यशवंत तीर्थ येथे चव्हाण यांच्या ३८ पुण्यतिथी अभिवादन समारंभात संगमनेरमध्ये थोरात बोलत होते. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, डॉ. बी. एम. लोंढे, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, प्रा. एस. टी. देशमुख, प्राचार्य जे. बी. शेट्टी,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर मधील ज्येष्ठ रंगकर्मी, निर्माते वसंत बंदावणे यांचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, सांस्कृतिक विभागाच्या राज्याध्यक्ष विद्या कदम, सरचिटणीस सम्राट साळवी, समन्वयक अमोल थोरात यांनी बंदावणे यांची सांस्कृतिक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बंदावणे यांना निवडीचे पत्र दिले. बंदावणे पंचेचाळीस वर्षांपासून संगमनेर व नगरच्या सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. लीनीयर फिल्म्स या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बंदीशाळा व अनेक मालिका, लघु चित्रपटांची निर्मिती केली आहे. संग्राम संस्थेच्या अनेक नाटकांत भूमिका, नेपथ्य, प्रकाश योजना अशा जबाबदाऱ्या पार पाडून राज्य नाट्य स्पर्धेत अनेक…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अकोले तालुका तालीम संघाच्यावतीने आणि अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोलेत रविवार (ता. २७) आणि सोमवारी (ता. २८) कुस्त्यांचा थरार रंगणार आहे. जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेतून महाराष्ट्र केसरीसाठी पैलवानांची निवड केली जाणार असल्याची माहिती अकोले तालुका तालीम संघाचे तालुका अध्यक्ष बबलू धुमाळ, उपाध्यक्ष शामराव शेटे यांनी दिली. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धा होणार आहेत. आमदार प्रा. राम शिंदे, भाजपा अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार सदाशिव…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क येणारी शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वतंत्ररीत्या ‘कमळ’ या निवडणुक चिन्हावर लढविणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामास सुरुवात करावी, असे आवाहन लोकसभा प्रवास योजना राज्य संयोजक माजी मंत्री संजय भेगडे यांनी केले आहे. उत्तर नगर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या शिर्डी लोकसभा प्रवास योजनेसंदर्भात जिल्हास्तरीय बैठक शिर्डी येथे राज्य संयोजक व माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी आमदार चंद्रशेखर कदम व बाळासाहेब मुरकुटे, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर आदी उपस्थित होते. भेगडे म्हणाले, देशातील काही लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात असे अठरा मतदारसंघ आहे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क उसाच्या पाचटापासून तयार करण्यात आलेल्या सपराच्या घरात झोपेत असलेल्या ६५ वर्षीय वृद्धेवर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात या वृद्धेचा मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाले असून वनविभागाने नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. अकोले तालुक्यातील निळवंडे शिवारात असलेल्या खडके वस्तीवर ही दुर्घटना घडली आहे. रखमाबाई तुकाराम खडके असे या बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या वृद्धेचे नाव आहे. झोपेत असलेल्या वृद्धेवर अचानकपणे हल्ला केल्यानंतर बिबट्याने या वृद्धेस जवळपास शंभर फुटापर्यंत नेले यात या वृद्धेचा मृत्यू झाला. घटनेच्या एक दिवस अगोदर याच ठिकाणाहून बिबट्याने शेळीवर हल्ला करत शेळी नेण्याची घटना घडली होती. त्यामुळे चटक…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आयोध्येमध्ये राम मंदिराची उभारणी आणि काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने आता समान नागरी कायद्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. २०२४ पर्यंत राज्य सरकारांनी राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. दोन मोठ्या वचनांच्या पूर्ततेनंतर केंद्र सरकार आता तिसऱ्या वचनपूर्तीसाठी प्रयत्नशील आहे. मात्र देशांमध्ये भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त दुसरा कोणताही पक्ष या मागणीला पाठिंबा देत नसल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्य सरकारांना २०२४ पर्यंत समान नागरी कायदा लागू करण्यास सांगितले आहे. अन्यथा २०२४ आम्हीच पुन्हा सत्तेत येणार असल्याने त्यासाठी कायदा करू असे म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टाइम्स नाऊ…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क दुचाकी, महिलांच्या दागिन्यासह पोलिसांच्या दृष्टीने किरकोळ असणाऱ्या चोऱ्यांच्या घटना नियमित घडत असताना आता चोरट्यांनी आपला मोर्चा चंदनाच्या झाडाकडे वळविला आहे. अज्ञात चोरट्याने चंदनाचे झाडच चोरून नेल्याचा प्रकार पोलीस दप्तरी दाखल झाला आहे. चंदनाच्या झाडाची चोरी करणारा चोरटा आणि झाड दोघांचाही शहर पोलिसांना तपास लागू शकलेला नाही. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मालपाणी उद्योग समूहातील सुरक्षा रक्षक भारत मुरलीधर मोरे यांनी तक्रार दाखल केली आहे. २१ नोव्हेंबरला पहाटे दोन ते साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. मालपाणी हेल्थ क्लब येथून सुमारे पाच हजार रुपये किमतीच्या चंदनाच्या या झाडाची अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यातील उद्योग गुजरातमध्ये नेले जात असल्याचा राजकीय मुद्दा कळीचा बनलेला असताना आता गुजरातच्या व्यापाऱ्याकडून संगमनेरातील व्यापाऱ्याला तब्बल 29 लाखाला फसविले गेल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस उपाधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी गुजरात मधील व्यापारी अल्पेशकुमार मंडोरा याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात माहिती अशी, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील टोमॅटोचे व्यापारी भाऊसाहेब शंकर मेहत्रे (रा. निंबाळे, ता. संगमनेर) हे गुजरात सह अन्य राज्यातील व्यापाऱ्यांना टोमॅटो माल देत असतात. अशाच पद्धतीने त्यांनी गुजरात मधील सब्जीमंडी थरा ता. डीसा जि. बनासकांता येथील व्यापारी अल्पेशकुमार नानजी मंडोरा यांना गेल्या वर्षी टोमॅटो विक्री केली होता. मात्र या मालाच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा भाग असलेला सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला आहे. बेळगावी सीमा वादावरील न्यायालयीन प्रकरणावर देखरेख ठेवण्यासाठी राज्य सरकारने चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सीमावादावरील सर्वोच्च न्यायालयातील खटल्यावर चर्चा करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई प्रशासनाने मंगळवारी संध्याकाळी तातडीची बैठक बोलावली. “राज्यांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रात कन्नडिग आहेत, ज्यांचे संरक्षण ही आपली जबाबदारी आहे, असंही ते म्हणालेत. बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुका कर्नाटकात समाविष्ट करण्याचे सूतोवाच केलेत. कर्नाटक सरकार महाराष्ट्रातील कन्नड-माध्यम शाळांना…
