Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त भंडारदरा, दि. २६ जुलै:  भंडारदरा व निळवंडे परिसरात पर्यटनविकासातून रोजगारनिर्मिती साधण्यासाठी जलसंपदा विभागाच्या जागा अतिक्रमणमुक्त करून विकसित करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. राज्य शासनाच्या ‘हरीत महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या १० कोटी वृक्षलागवड मोहिमेत जलसंपदा विभागाने सक्रिय सहभाग घेतला आहे. या उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ भंडारदरा येथे जलसंपदा मंत्री विखे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या प्रसंगी आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, कार्यकारी अभियंता…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त  संगमनेर, प्रतिनिधी: विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या शुभेच्छा फलकासह शहरात लावण्यात आलेला माजी खासदार सुजय विखे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फ्लेक्स फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार खताळ यांचा खांडगाव फाट्यावरील फिक्स फाटल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्या पाठोपाठ हा दुसरा प्रकार समोर आला. अकोले नाका येथे जाजू पेट्रोल पंपासमोर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या फ्लेक्स लावण्यात आला होता या फ्लेक्स वर असलेले माजी खासदार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त अहिल्यानगर:  एका कांदा व्यापाऱ्याला ट्रान्सपोर्टद्वारे कांदा विक्री करूनही २६ लाख ४१ हजार ३७९ रुपये न मिळाल्याने फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी २४ जुलै रोजी पाच जणांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल रामदास आंधळे (वय ३१, रा. पारिजात कॉर्नर, गुलमोहर रोड, सावेडी, अहमदनगर) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. आंधळे यांचा केडगाव परिसरातील नेप्ती मार्केटमध्ये कांदा विक्रीचा व्यवसाय आहे. ४ जानेवारी २०२० ते ९ मार्च २०२० या कालावधीत मोहम्मद नदिम (रा. सब्जीमंडी, पिलीभित, उत्तर प्रदेश), अरिफ रजा, मोहम्मद युनूस अँड कंपनी, मोहम्मद हसीन आणि छोटे मिया अँड कंपनी (पूर्ण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त  शासनाकडून भरमसाट पगार मिळत असतानाही, अतिरिक्त कमाईच्या हव्यासापोटी लाच मागणाऱ्या चार महसूल अधिकाऱ्यांसह एका मजुराला यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दारव्हा मार्गावरील बागवाडी बसथांब्याजवळ गुरुवारी (२४ जुलै २०२५) ही कारवाई करण्यात आली. मुरूम वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीचा ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उभा असताना, मंडळ अधिकारी जितेंद्र पांडुरंग ठाकरे (५७), ग्राम महसूल अधिकारी जय गणेश सोनोने (२६), पवन तानसेन भितकर (३०) आणि नीलेश भास्कर तलवारे (३०) यांनी कारवाई न करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराकडे मुरूम वाहतुकीच्या सर्व कायदेशीर पावत्या असतानाही, या कर्मचाऱ्यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी:  राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, सहकार क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या (राजहंस दूध संघ) संचालकपदी खांडगाव येथील रमेश लहानभाऊ गुंजाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. २५ जुलै २०२५ रोजी राजहंस दूध संघ येथे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. उपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर तथा अध्यासी अधिकारी संतोष कोरे यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या संचालक मंडळातील रिक्त जागेवर गुंजाळ यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र चकोर,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  महाराष्ट्राचे राजकारण सध्या प्रचंड गदारोळात आहे. केवळ सत्तेच्या सिमेंटमुळे महायुती सरकार राज्यात टिकून असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर गंभीर टीका केली आहे. महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू असून, जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळल्याचा ठपका ठेवला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना महायुती सरकारवर तोफ डागली. विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपये देण्याची घोषणा केली, पण त्यांना काहीही दिले नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही फसवणूक केली आहे, असे थोरात म्हणाले. थोरात यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांवर आणि वाढत्या भ्रष्टाचारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.…

Read More

अहिल्यानगर, दि. २५ जुलै:  शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कडक पाऊल उचलले आहे. त्यांनी शालेय बस आणि इतर विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा शालेय बस सुरक्षा समितीच्या बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. या महत्त्वाच्या बैठकीला महानगरपालिकेचे उपायुक्त विजय मुंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे आणि चंद्रकांत खेमनर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक घार्गे यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक शालेय बस किंवा विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनामध्ये सीसीटीव्ही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त  संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांच्या चैतन्य नगर मधील विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या घरावर मंगळवारी पहाटे काही ओळखीच्या लोकांसह १०-१२ लोकांनी सशस्त्र हल्ला करत वैष्णव मूर्तडक याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच हल्ले पोरांनी घराच्या पॅसेजमध्ये लावलेल्या दुचाकींचे नुकसान केले.  या घटनेमुळे संगमनेरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांचे बंधू शिवाजी मुर्तडक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घरात अनधिकृतपणे प्रवेश करून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ५ जणांविरुद्ध तसेच १०-१२ अनोळखी अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी:  माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग आणि विधवा महिलांना अर्थसाहाय्य यासह विविध मागण्यांसाठी आज गुरुवारी (२४ जुलै) होणाऱ्या ‘चक्काजाम’ आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने पुकारलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देताना, थोरात यांनी महायुती सरकारवर विधानसभा निवडणुकीत खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, महायुती सरकारने ‘लाडक्या बहिणींना’ दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात त्यांना १५०० रुपयेही मिळत नाहीत. त्याचप्रमाणे, शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीचे आश्वासनही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त  अहिल्यानगर:  या ना त्या कारणाने सातत्याने चर्चेत असलेल्या अहिल्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली आहे. तब्बल दीड कोटीचा ऑनलाईन लाच प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षकासह चौघांचे पोलीस अधीक्षकांनी निलंबन केल्याच्या प्रकाराला काही तास उलटत नाही तोच आहेर यांची देखील आता तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आहेर यांच्या बदलीमागे देखील याच प्रकरणाचा वास असल्याची चर्चा पोलीस दलात रंगली आहे. दरम्यान आहेर यांच्या जागी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान…

Read More