Author: अनंत पांगारकर

अहिल्यानगर, दि. २८ –  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २८ जून ते ११ जुलै २०२५, रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदर आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, मिरवणुका किंवा प्रेतयात्रांवरील जमावास लागू राहणार नाही. तसेच पोलीस अधिकारी, कामावर असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच सभा अथवा मिरवणुका काढण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही हा आदेश लागू होणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेरमधील गुंजाळ मळा परिसरात सुरू असलेल्या ट्रक टर्मिनलच्या कामावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आमदार अमोल खताळ यांच्यावर होत असलेली टीका खोटी आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करण्याच्या उद्देशाने नुकतीच या ट्रक टर्मिनलला भेट दिली होती. पंचायत समितीजवळील या कामाची गती कमी असल्याने, त्यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना कामाला गती देण्यासोबतच कामाचा दर्जा चांगला राखण्याच्या सूचना दिल्या. या भेटीदरम्यान त्यांनी कामाचे श्रेय घेण्याबद्दल कुठलेही वक्तव्य केले नाही, असे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आमदार खताळ हे तालुक्याच्या विकासकामांवर वेगाने लक्ष केंद्रित करत…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  नाशिक येथील एका ट्रॅव्हल कंपनीला दुबईच्या टूरसाठी बनावट विमान तिकिटे देऊन तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संगमनेर येथील ‘माईल्सस्टोन हॉलिडेज’ या ट्रॅव्हल एजन्सीचे संचालक संशयित आरोपी असून, त्यांच्याविरुद्ध नाशिक शहर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे संगमनेरसह नाशिकमध्येही एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या एका कंपनीने त्यांच्या ५० प्रवाशांसाठी दुबईच्या प्रवासाचे तिकीट काढण्यासाठी संगमनेरच्या ‘माईल्सस्टोन हॉलिडेज’ या कंपनीला १० लाख ८२ हजार ५०० रुपये दिले होते. मात्र, संगमनेरच्या या कंपनीने प्रवाशांना बनावट विमान तिकिटे देऊन त्यांची फसवणूक केली. प्रवाशांना मुंबई विमानतळावर प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर हा…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जोर्वे ग्रामपंचायतीमधील कथित आर्थिक गैरव्यवहारावरून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समर्थकांमध्ये राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. गुरुवारी (दि. २६ जून २०२५) संगमनेर पंचायत समितीवर दोन्ही गटांचे समर्थक एकमेकांसमोर उभे ठाकले, ज्यामुळे जोरदार घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रकरण नेमके काय? जोर्वे ग्रामपंचायतीमध्ये २०२० ते २०२५ या कालावधीत झालेल्या कामकाजात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप बाळासाहेब थोरात समर्थकांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीने अनेक वस्तू खरेदी केल्याचे कागदोपत्री दाखवले आहे, मात्र त्या वस्तू प्रत्यक्षात गावात…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  शासकीय कामांसाठी शालेय विद्यार्थी, गावागावातील ग्रामस्थांना संगमनेर शहरात येण्याची आता गरज नाही! आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने महसूल विभागामार्फत आता मंडलनिहाय ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरां’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या शिबिरांमुळे संगमनेर मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच उत्पन्नाचा, जातीचा, रहिवासी, नॉन-क्रिमीलेअर यांसारखे महत्त्वाचे दाखले मिळणार आहेत. याशिवाय, नवीन रेशन कार्ड, आधार कार्ड अपडेटेशन, मतदार नोंदणी, फेरफार अर्ज आणि विविध शासकीय योजनांचा लाभही या शिबिरात एकाच छताखाली उपलब्ध होईल.  वर्षभरातून दोन वेळा हे शिबिर आयोजित केले जाणार असून, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या संधीचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज –  ‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोन शिक्षकांविरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ‘पोस्को’ (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर अशी या दोन शिक्षकांची नावे असून, ते दोघे बीड शहरात खासगी कोचिंग क्लासेस चालवतात. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार, प्रशांत खाटोकर (फिजिक्स शिकवणारे) हे तिला क्लास संपल्यावर केबिनमध्ये एकटे बोलावून तिचे चुंबन घ्यायचे आणि तिच्या छातीला व गुप्तांगाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचे. इतकंच नाही, तर ते तिचे कपडे काढायला लावून फोटोही काढायचे. क्लासरूममध्ये कोणी नसतानाही ते तिच्यासोबत असेच गैरवर्तन करायचे. “जर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर शहरात वर्दळीचा भाग असलेल्या पंचायत समिती जवळील गुंजाळ मळा परिसरात प्रस्तावित ट्रक टर्मिनसच्या कामावरून सध्या राजकारण तापले आहे. नवीन लोकप्रतिनिधींनी या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याने गुंजाळ मळ्यातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आधी या कामाची सविस्तर माहिती घ्यावी आणि मगच श्रेय घेण्याचा प्रयत्न करावा, असा थेट सवाल करत नागरिकांनी दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेण्यात कोणता मोठेपणा आहे, असे म्हटले आहे. स्थानिक नागरिक शुभम गुंजाळ आणि राहुल गुंजाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे की, या ट्रक टर्मिनसचे काम मार्च २०२४ मध्ये नगरपरिषदेने निविदा प्रसिद्ध करून सुरू केले आहे. हे काम ‘भांडवली गुंतवणुकीतील राज्यांना विशेष सहाय्य योजने’…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  पद्मशाली समाज संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपणारा समाज असून त्याचा प्रत्येक समाज बांधवाला अभिमान आहे. येथील समाज बांधवांचे ऐक्य पाहून आनंद झाल्याचे प्रतिपादन ‘लय आवडतेस तू मला’ फेम अभिनेते तन्मय जक्का यांनी केले. अभिनेते तन्मय जक्का आणि एसबीसी अन्याय निवारण कृती समितीचे राज्याचे अध्यक्ष, ओबीसी नेते जितेंद्र कांचानी यांच्या उपस्थितीत रविवारी (२२ जून) मालपाणी उत्सव हॉल येथे संगमनेरच्या पद्मशाली समाज मंडळाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थी, शैक्षणिक व विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवलेले विद्यार्थी, आणि संगमनेरच्या विवाहित महिलांचा (लाडक्या लेकी) गौरव सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमात शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले. यावेळी एसबीसी अन्याय निवारण कृती समितीचे राज्याचे अध्यक्ष,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  शहरातील प्रवरा नदीकाठी असलेल्या श्री साई मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त श्री साई सच्चरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ जुलै ते १० जुलै या कालावधीत हा सामुदायिक अखंड पारायण सोहळा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हे पारायण आयोजित करण्यात आले आहे. या सोहळ्याची सुरुवात ३ जुलै रोजी सकाळी ७ वाजता सामूहिक संकल्पाने होईल. या पारायणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व भाविकांना संकल्प सोडण्यासाठी श्री साई मंदिराच्या पारायण हॉलमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा पारायण सोहळा आठ दिवस चालेल. भाविक आपल्या सोयीनुसार पहाटे ५:३० ते रात्री १० या वेळेत श्री साई सच्चरित्र ग्रंथाचे वाचन करू शकतात. पारायणाची सांगता १० जुलै रोजी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या जोर्वे ग्रामपंचायतीमधील अनागोंदी कारभार आणि लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थ गुरुवारी (२६ जून) आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. प्रशासनाने यापूर्वी केलेल्या आंदोलनांची दखल न घेतल्याने संतप्त गावकऱ्यांनी थेट पंचायत समितीवर मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध केला. एका महिन्यात या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास संपूर्ण गाव आमरण उपोषण करेल, असा निर्वाणीचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. मागील तीन वर्षांपासून जोर्वे ग्रामपंचायतीवर पालकमंत्री विखे यांच्या गटाची सत्ता आहे. या काळात ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. लाखो रुपयांच्या वस्तूंची खरेदी कागदोपत्री दाखवण्यात आली आहे, मात्र त्या वस्तू प्रत्यक्षात गावात आलेल्याच नाहीत. गावातील…

Read More