Author: अनंत पांगारकर
नवी दिल्ली – देशभरातील फिजियोथेरेपिस्ट्ससाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, आता त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ (Dr.) ही उपाधी लावता येणार आहे. आरोग्य सेवा महानिदेशालयाने (DGHS) या संदर्भात यापूर्वी काढलेला आदेश मागे घेतला आहे. हा निर्णय फिजियोथेरेपिस्ट्ससाठी एक मोठा विजय मानला जात आहे. यापूर्वी, ९ सप्टेंबर रोजी डीजीएचएसच्या संचालक डॉ. सुनीता शर्मा यांनी एक पत्र जारी केले होते. त्या पत्रात त्यांनी स्पष्ट केले होते की, फिजियोथेरेपिस्ट्स त्यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ ही उपाधी वापरू शकत नाहीत. यामागचे कारण देताना त्यांनी म्हटले होते की, यामुळे रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि बोगस डॉक्टरांच्या वाढीला चालना मिळू शकते. ‘डॉक्टर’ ही उपाधी फक्त…
संगमनेर – राज्याचे मुख्यमंत्री आणि नगर विकास विभागाच्या सचिवालयाकडून मिळालेल्या मार्गदर्शनानंतर शहरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या जागेच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटणार असून, शहरातील जुनी आरक्षणे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशी माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. तांबे म्हणाले, यामुळे संगमनेर शहरातील इंदिरानगर, वकील कॉलनी, मालदाड रोड, पद्मनगर, अभंग मळा, स्टेडियम परिसर, गुंजाळ आखाडा यांसारख्या भागांतील हजारो कुटुंब आणि वसाहती या निर्णयामुळे कायदेशीर अडचणीतून बाहेर पडतील आणि त्यांना हव्या असलेल्या नागरी सुविधा मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल. १९८० च्या शहर विकास आराखड्यानुसार, शहरातील काही भागांत शेतजमिनी होत्या. या जमिनींवर गार्डन, खेळाचे मैदान, शाळा अशा विविध कारणांसाठी आरक्षण टाकण्यात…
संगमनेर – सध्या काही कीर्तनकार राजकीय पक्षांचे जाहीर प्रचारक म्हणून काम करत असले, तरी पूर्वीही राजकीय पक्षांचा छुपा प्रचार अनेकदा झालेला आहे, असं मत ‘रिंगण’ मासिकाचे संपादक सचिन परब यांनी व्यक्त केलं. सकल वारकरी समाजाच्या वतीने संगमनेर येथील विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाज येथे राज्यस्तरीय वारकरी चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परब बोलत होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती भारत महाराज जाधव होते. तर ज्येष्ठ कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ चोपदार, विचारवंत आणि कीर्तनकार डॉ. बालाजी जाधव, भारत महाराज घोगरे गुरुजी, समाधान महाराज देशमुख आणि पत्रकार-कीर्तनकार शामसुंदर महाराज…
संगमनेर – जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्याची मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. सध्या अहिल्यानगर व धुळे जिल्हा परिषदेने बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करून नवीन शाळांमध्ये रुजू होण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. जळगाव जिल्हा परिषदेने देखील या संदर्भात कार्यवाही सुरू केली असून पुढील आठवड्यात सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे. नाशिक व नंदुरबार जिल्ह्यातही लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आमदार तांबे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बदली प्रक्रिया पूर्ण…
मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही घेतलेल्या मेहनतीला यश मिळेल. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीची चिन्हे आहेत. आर्थिक बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन शांत होईल. वृषभ- आज तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचे काम सोपे होईल. आरोग्याची काळजी घ्या. विशेषतः खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. मिथुन- आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुनी येणी वसूल होऊ शकतात. सामाजिक कार्यात भाग घेतल्यास मान-सन्मान मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कर्क- कामात काही अडथळे येऊ शकतात, पण तुम्ही तुमच्या संयमाने आणि प्रयत्नांनी त्यावर मात कराल. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद…
संगमनेर – महाराष्ट्रातील अनेक सहकारी संस्था वाईट अवस्थेत असताना, संगमनेरमधील सहकार मात्र उत्कर्ष करत आहे. या यशाचे श्रेय राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टी आणि कठोर परिश्रमाला असून थोरात यांनी राजकारणापलीकडे जाऊन लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सहकाराला प्राधान्य दिले. थोरात यांनी यापुढील काळात राज्यातील सहकारी चळवळीला दिशा देण्यासाठी नेतृत्व म्हणून राज्य पातळीवर काम करावे असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 58 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तांबे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कारखान्याचे…
पुणे – मराठा साम्राज्याची एकेकाळची राजधानी असलेल्या सातारा शहरात यंदा ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या शतकाच्या उंबरठ्यावरील संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. बैठकीला महामंडळाच्या घटक संस्थांसह संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष पदासाठी अनेक नावांवर चर्चा झाली. मात्र, विश्वास पाटील यांच्या योगदानाचा आणि मराठी साहित्यासाठी त्यांनी केलेल्या भरीव कामाचा विचार करून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ऐतिहासिक कादंबरी लेखनात त्यांचा हातखंडा मानला जातो. त्यांची ‘पानिपत’ ही कादंबरी मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड मानली जाते.…
संगमनेर – वारकरी संप्रदायात पांढरे कपडे घालून काही ‘मंबाजी’ घुसले असून, तुकाराम महाराजांना त्रास देणारी ही प्रवृत्ती आजही शिल्लक आहे. अशा ढोंगी लोकांना शोधून संप्रदायाबाहेर काढले पाहिजे, असे परखड मत संगमनेर येथील राज्यस्तरीय वारकरी चिंतन परिषदेत ज्येष्ठ कीर्तनकारांनी व्यक्त केले. यासोबतच, संयोजकांनी कीर्तनकारांसाठी आचारसंहिता तयार करून तिचे पालन करणे अनिवार्य करावे, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. सकल वारकरी समाजाच्या वतीने संगमनेर येथील विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाज येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती भारत महाराज जाधव होते, तर ज्येष्ठ कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन केले.…
संगमनेर: ज्यांनी काहीच केलं नाही असे लोक सध्या जलदूत व्हायला निघाले आहेत, ‘वांझोटीला पोरं होईल पण निळवंडे होणार नाही’ असं म्हणत हिणवणाऱ्या विरोधकांवर राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी जोरदार प्रत्युत्तर देत हल्लाबोल केला. संगमनेर तालुक्याचा गौरवशाली इतिहास आणि विकासाचा वारसा जपण्याची जबाबदारी नवीन पिढीची आहे, असे सांगताना या तालुक्यातील विकासाचा इतिहास देखील विसरता कामा नये असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना त्यांनी हे परखड मत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर कारखान्याचे माजी अध्यक्ष, साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार…
प्रवीण पुरो नेपाळमध्ये सुरू असलेलं आंदोलन नक्की कशासाठी, याचा उलगडा करण्याची तयारी भारतीय माध्यमांची नाही. त्यांना वाटतं हा केवळ सोशल मिडियावरील बंदीचा मामला आहे. या आंदोलनाची डोळसपणे चिकित्सा केली तर एक लक्षात येईल, की आमचे सत्ताधारी शहाणे झाले नाही तर हे आंदोलन भारताची जागा घेऊ शकतं. भारतीय माध्यमं हे सत्ताधार्यांना सांगायच्या भानगडीत पडत नाहीत. यामुळे धृतराष्ट्राचं आंधळंपण सत्तेच्या डोळ्यावर आलं आहे. आपणच सत्यवान असल्याचा त्यांना भास झालाय. नेपाळच्या सत्तेलाही असंच वाटत होतं. नेपाळमध्ये सुरू असलेल्या धुमश्चक्रीला भ्रष्टाचारात माखलेली तिथली एकूणच व्यवस्था कारण आहे. या व्यवस्थेने डोळे उघडे ठेवून कारभार केला असता, भ्रष्ट मंत्र्यांना ताळ्यावर आणलं असतं तर उद्रेकाची ही वेळ…
