Author: अनंत पांगारकर

गुरुवार, 19 जून: संगमनेर संगमनेर शहरात ATM फसवणुकीचा एक नवा आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एटीएममधून पैसे काढताना पिन नंबर पाहून कार्ड बदलून 35,100/- रुपयांची फसवणूक केल्याची ही घटना बुधवारी समोर आली. रहिमपूर येथील शेती व्यावसायिक शिवाजी देविचंद साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एका अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा (गु.र.नं. 558/2025, बीएनएस कलम 318(4) प्रमाणे) दाखल करण्यात आला आहे.  नेमकं काय घडलं? बुधवार, 18 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास संगमनेर येथील जाणता राजा मैदानाजवळ असलेल्या युनियन बँकेच्या एटीएममध्ये ही घटना घडली. रहिमपूर येथील शेती व्यावसायिक शिवाजी देविचंद साबळे (वय 48) हे एटीएममधून पैसे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी आत्ताच आम्ही सात लाखाची चोरी पकडली असून तुमच्यावर आमचा संशय आहे, असे सांगत सेवानिवृत्त व्यक्तीला तिघांनी सीआयडी अधिकारी असल्याचे सांगून लुटण्यात आले. बनावट सीआयडी अधिकाऱ्यांनी या व्यक्तीकडील 65 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लंपास करण्याची घटना संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक-पुणे महामार्गावर चौधरी ढाब्याजवळ घडली आहे. 14 जून 2025 रोजी सकाळी अकरा ते पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा ( No. 0391/2025) दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धार्मिक विधीसाठी गेलेले केशव नाथा गोसावी (वय 69,…

Read More

अहिल्यानगर, दि.१८ –  रेशीम उद्योग हा ग्रामीण भागातील स्वावलंबनासाठी अत्यंत उपयुक्त पर्याय असून विशेषतः महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात हा व्यवसाय मदत करू शकतो. मागील वर्षात जिल्ह्यात ६६८ शेतकऱ्यांनी ३१६ हेक्टर क्षेत्रावर तुतीची लागवड करुन २ लाख ६५ हजार अंडीपुंज व १५१ मेट्रीक टन कोषाचे उत्पादन घेतले आहे. गतवर्षात रेशीम शेतीसाठी १०२ शेतकऱ्यांना ८५ लाख ४४ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे यांनी दिली. रेशीम शेती उद्योग हा कृषीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला व ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत करणारा उद्योग आहे. बदलते हवामान, बाजारातील शेतीमालाच्या बाजारभावाची चढउतार आणि वाढती…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथे एका आदिवासी महिलेच्या हत्येप्रकरणी, तसेच अन्य मागण्यांसाठी आदिवासी आणि मागासवर्गीय संघटनांनी मंगळवारी (दि. १७) संगमनेर शहरात निषेध मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन केले. शेतात शौचाला गेल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या या हत्येमुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. मंगळवारी दुपारी बारा वाजता शहरातील बस स्थानकासमोर हा रास्ता रोको करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विविध संघटनांचे कार्यकर्ते एकत्र जमले आणि घोषणाबाजी करत मोर्चाने बस स्थानकासमोर आले. यावेळी युवकांनी घटनेचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. या रास्ता रोकोदरम्यान झालेल्या सभेत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जुले पठार येथील घटनेवर गंभीर चिंता व्यक्त केली.…

Read More

पुणे:  मुळशीचे तत्कालीन तहसीलदार रणजित भोसले यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. सात-बारा उताऱ्यावरील ‘द टाटा पॉवर कंपनी लि.’चे नाव कमी करून त्याऐवजी धोंडू गोपाल ढोरे यांचे नाव मालकी हक्कात दाखल करण्याचा आदेश दिल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या अनियमिततेप्रकरणी राज्य सरकारने सोमवारी निलंबनाचे आदेश जारी केले असून, ते जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. या प्रकरणी कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४१, १४० आणि १५५ नुसार, भोसले यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नाव कमी करण्याचा दिलेला आदेश रद्द केला होता. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर या अनियमिततेची चौकशी अतिरिक्त विभागीय…

Read More

अहिल्यानगर, १८ जून २०२५:  पाथर्डी (अहिल्यानगर) येथील शिवनेरी मिसळच्या हॉटेल चालकाकडून मासिक हप्ता म्हणून १५०० रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवारी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पाथर्डी पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार लक्ष्मण सुखदेव पोटे (वय ३५) यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीस नाईक रामदास जयराम सोनवणे आणि पोलीस कोठडीतील आरोपी राहुल शिवाजी साबळे (वय २२) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे पाथर्डी येथे ‘शिवनेरी मिसळ’ नावाचे हॉटेल असून, ते रात्री १० नंतरही सुरू असते. यावरून कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदार लक्ष्मण पोटे यांनी तक्रारदाराकडे मासिक २००० रुपये हप्त्याची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने १५ जून २०२५ रोजी नाशिक…

Read More

अहिल्यानगर, १८ जून:  नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अहिल्यानगरमध्ये  मंगळवारी एका खासगी बँक रिकव्हरी कर्मचाऱ्याला २०,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. घर जप्तीच्या नोटीसची तारीख वाढवण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय तक्रारदाराला भिंगारच्या मंडळ अधिकारी कार्यालयाकडून घर जप्तीची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसची तारीख मंडळ अधिकाऱ्यांकडून वाढवून देण्यासाठी, जहीर अहमद इक्बाल मुलानी (वय ३०, रा. एकनाथ नगर, केडगाव, अहिल्यानगर) या खासगी बँक रिकव्हरी कर्मचाऱ्याने २०,००० रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती २०,००० रुपये लाच स्वीकारण्याचे निश्चित झाले. त्यानुसार, १७ जून २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजता जहीर मुलानी याने पंचांसमक्ष २०,००० रुपयांची लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने…

Read More

मुंबई, दि. १७- विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून, आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमिनीवर पेरण्या झाल्याची माहिती आज (मंगळवारी) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यातील पीक परिस्थिती, खते आणि बियाण्यांच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. राज्यात चांगला पाऊस झाल्यामुळे खतांची मागणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. गरज भासल्यास तातडीने अधिक खतांची मागणी करावी, असेही ते म्हणाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात करण्यापूर्वी, अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास चंद्र…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध परंपरेचा भाग असलेल्या पायी दिंडी सोहळ्यातील संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे संगमनेर तालुक्यात सोमवारी आगमन झाले आहे. या निमित्ताने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि इतर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, यामुळे वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि इंद्रजीत थोरात यांनी तिचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालखीचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर यांच्यासह गावकरी आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्यावतीने दोन रुग्णवाहिका, २५ डॉक्टरांचे पथक आणि परिचारिकांसह आरोग्य सेवा पुरवण्यात…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या गजरात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीचे संगमनेर तालुक्यात सोमवारी संध्याकाळी उत्साहात स्वागत करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील पारेगाव बुद्रुक येथील अश्विनाथ महाराज गडावर पालखी पोहोचताच, संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि प्रशासनाच्या वतीने शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी भक्तिमय वातावरणात पालखीचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. पारेगाव ग्रामस्थांनी पालखीवर जेसीबीतून पुष्पवृष्टी केली. आमदार अमोल खताळ यांनी स्वतः पालखीतील बैलजोडीचा दोर धरून भक्तिभाव व्यक्त केला. त्यांनी गळ्यात वीणा घातला होता, तर त्यांच्या पत्नी नीलम डोईवर तुळशी वृंदावन घेऊन “विठ्ठल-नाम” च्या जयघोषात पायी चालत सहभागी झाल्या होत्या. यावेळी, निवृत्तीनाथ महाराज पालखी…

Read More