Author: अनंत पांगारकर
संगमनेर – प्रतिनिधी मंदिरांबरोबरच शिक्षण मंदिरे समृद्ध झाली आणि वृषाली कडलग यांच्यासारख्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची पिढी घडवली, तर निश्चितच एका सामर्थ्यसंपन्न समाजाची निर्मिती होईल. समाजासाठी समर्पित वृत्तीने कार्य करणाऱ्या व्यक्ती नेहमीच इतरांसाठी प्रेरणास्रोत ठरतात, असे गौरवोद्गार ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. लातूर येथे मानव विकास संस्थेतर्फे आयोजित ‘मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार २०२५’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर रमाकांत व्यासजी, आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, सुप्रसिद्ध गायक डॉ.अंबरीष महाराज देगलूरकर यांचीही उपस्थिती होती. या सोहळ्यात, मानव सेवा जीवन गौरव पुरस्कार विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे सहकार्याध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांना त्यांच्या सामाजिक…
संगमनेर – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके आणि घरांचे मोठे नुकसान झाले असून, याचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीत व्यस्त असलेल्या संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना अचानक आलेल्या या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गारपीट झाली, तर काही भागांमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला, ज्यामुळे शेतात पाणी साचले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांनी काढलेला कांदा, भाजीपाला, फळपिके आणि जनावरांसाठी असलेला चारा यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच, वादळामुळे अनेक घरांवरील…
संगमनेर – प्रतिनिधी मागील दोन-तीन दिवसांपासून संगमनेर तालुक्यात थैमान घालत असलेल्या अवकाळी पावसाने आज अक्षरशः कहर केला. संगमनेर शहर आणि पश्चिम तसेच पूर्व भागाला जोरदार तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला कांदा, भाजीपाला आणि साठवणुकीतील पिके पाण्यात वाहून गेली आहेत. अनेक घरांची पडझड झाली असून काही ठिकाणी जनावरे दगावली आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, राज्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. आज (सोमवार, १९ मे) निमगाव भोजपूर, निमज, चंदनापुरी, वेल्हाळे, सांगवी, पेमगिरी नांदुरी, राजापूर, चिकणी या परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या भागातील प्रमुख…
संगमनेर – प्रतिनिधी निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये पाच दिवसीय निवासी युवा सर्वांगीण विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ११ ते १५ वयोगटातील १०० विद्यार्थ्यांना साहस, कला आणि क्रीडा यांसारख्या विविध क्षेत्रांतील प्रशिक्षणाद्वारे समृद्ध जीवनाचे धडे दिले जात आहेत. या उपक्रमातून विज्ञानवादी विचारांची सुदृढ पिढी घडवली जाईल, असा विश्वास संस्थेचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. तांबे बोलत होते. या वेळी शरयू देशमुख, प्रा. हिरालाल पगडाल, प्रकल्प प्रमुख अनंत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या…
संगमनेर – प्रतिनिधी अकोले आणि संगमनेर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य विक्री करणाऱ्या केंद्रांवर १ मे २०२५ ते १८ मे २०२५ दरम्यान मोठी कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्र. २, श्रीरामपूर आणि संगमनेर विभागाने संयुक्तपणे ही मोहीम राबवली गेली. या कारवाईत अकोले तालुक्यातील हिवरगाव आंबरे, विरगाव फाटा, तांभोळ, अंभोळ, बेलापूर, आंबित, केळंगण, खिरविरे, लिंगदेव आणि राजूर तसेच संगमनेर तालुक्यातील अवैध मद्य विक्रीची ठिकाणे आणि ढाब्यांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण १९ गुन्हे दाखल करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने देशी दारू ३५०.१ बल्क लिटर, विदेशी दारू ४३.०२ बल्क लिटर, बीयर ९.५५ बल्क लिटर…
संगमनेर/सिन्नर – संगमनेरमधील दोन गांजा तस्करांना सिन्नर पोलिसांनी मोठ्या कारवाईत अटक केली आहे. हे आरोपी अवैधरित्या गांजाची वाहतूक करत असताना सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडून ४ किलो २० ग्रॅम गांजा आणि वाहतुकीसाठी वापरलेली होंडा सिव्हिक कार असा एकूण ८ लाख ३० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेमुळे संगमनेर आणि आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, १६ मे रोजी नाशिक-पुणे महामार्गावरील हॉटेल न्यू वैष्णवीसमोर पोलिसांनी सापळा रचला होता. या सापळ्यात सिल्व्हर रंगाची होंडा सिव्हिक कार (क्रमांक एम. एच. ०१/ई.सी. ५७४८) अडवण्यात आली. गाडीची तपासणी केली असता,…
संगमनेर, दि. १८ मे – आजचा दिवस संगमनेरकरांसाठी अभिमानाचा, गर्वाचा आणि निष्ठेचा ठरला. ‘ऑपरेशन सिंदूर’ या यशस्वी सैनिकी कारवाईस मानवंदना देण्यासाठी आज संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. संगमनेर नगरपालिकेपासून सुरू झालेली ही तिरंगा यात्रा शहरातील विविध मार्गावरून नवीन नगर रोडपर्यंत गेली. यशवंतराव चव्हाण प्रशासकीय इमारती समोर या यात्रेचा समारोप झाला. या संपूर्ण मार्गावर नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या नागरिकाच्या चेहऱ्यावर आपल्या देशाबद्दलचा विश्वास आणि अभिमान दिसत होता. यात्रेच्या मार्गावर नागरिकांनी भारत मातेच्या प्रतिमेला नतमस्तक होऊन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. महिला, तरुण, विद्यार्थी आणि ज्येष्ठ…
नवी दिल्ली – संसदरत्न पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील खासदारांनी उत्कृष्ट कामगिरी करत बाजी मारली आहे. राज्यातील तब्बल सात खासदारांना प्रतिष्ठित ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांच्यासह सात जणांचा समावेश आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या शैक्षणिक कार्यापासून प्रेरणा घेत, उत्कृष्ट संसद सदस्यांचा सन्मान करण्यासाठी 2010 मध्ये ‘संसदरत्न’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारासाठी खासदारांच्या वर्षभराच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी एक विशेष समिती गठित केली जाते. संसदेच्या तीनही अधिवेशनांमधील खासदारांचा सहभाग, विचारलेले प्रश्न आणि एकूण सक्रियता यांसारख्या विविध निकषांवर आधारित ही निवड प्रक्रिया…
रविवार, दि. १८ मे – संगमनेर प्रत्येकाच्या आयुष्यात एक अनमोल कथा दडलेली असते आणि जीवनात मागे वळून सिंहावलोकन करणे महत्त्वाचे आहे. प्रकाशवाट हे पुस्तक कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. या पुस्तकाचे लेखक संतोष खेडलेकर संगमनेरच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. अमृतवाहिनी बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी यांच्या जीवनप्रवासावर आधारित डॉ. संतोष खेडलेकर लिखित ‘प्रकाशवाट’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. मालपाणी लॉन्स येथे झालेल्या या कार्यक्रमात आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कांचनताई थोरात, संजीवनी जोशी, श्रीमती प्रभावती जोशी, डॉ. जयश्री थोरात आणि माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉ.…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर घुलेवाडीतील विकासकामांच्या श्रेयवादावरून राजकारण चांगलेच तापले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केलेल्या दोन कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या कामांचा शुभारंभ नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी केल्याने गावात तीव्र नाराजी पसरली आहे. एक रुपयाचाही नवीन निधी न आणता थोरातांच्या कामांवर हक्क सांगणे योग्य नाही, असा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांनी केला आहे. यामुळे घुलेवाडीत राजकीय वादंग पेटले आहे. काय आहे नेमके प्रकरण – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घुलेवाडीसाठी 2024-25 या आर्थिक वर्षात विविध विकासकामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाने 1 ऑक्टोबर 2024 रोजी या…
