Author: अनंत पांगारकर

संगमनेर, प्रतिनिधी:  रयतेच्या हितासाठी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार सर्वांनी आत्मसात करावेत, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले. महायुतीच्यावतीने संगमनेर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी शिवराज्याभिषेक दिन आमदार खताळ यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी, आमदार खताळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली. यावेळी बोलताना खताळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रकारे रयतेच्या हितासाठी काम केले, त्याचप्रमाणे त्यांच्या आदर्श विचारांचा अंगीकार करून रयतेच्या भल्यासाठी काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमदार झाल्यावर आपण संगमनेर शहरात सर्व महापुरुषांच्या जयंती आणि उत्सव साजरे केले जातील असे जाहीर केले होते. त्यानुसार, संगमनेरमध्ये प्रत्येक महापुरुषाची जयंती…

Read More

मुंबई –  राज्य सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे, या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा ४१०.३० कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे. अनुसूचित जाती घटकांसाठी असलेला हा निधी आता ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी वापरला जात असल्याने या निर्णयावर पुन्हा एकदा टीकेची शक्यता वर्तवली जात आहे. सामाजिक न्याय विभागाला वारंवार फटका… ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी यापूर्वीही सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला होता. याआधी निधी वळवल्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीरपणे अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. आता पुन्हा त्यांच्या विभागातून ४१०.३० कोटी रुपये वळवण्यात आले आहेत, यामुळे ही नाराजी आणखी वाढण्याची शक्यता आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज, पुणे पुणे शहरातील महात्मा फुले मंडईजवळील मेट्रो स्टेशनसमोरील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये अनैसर्गिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने एका व्यक्तीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कातरड येथील रहिवासी रमेश प्रकाश सत्रे (वय २१) याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. खून झालेल्या मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रो स्टेशनजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवली. शहराच्या विविध भागांमध्ये पथके रवाना करण्यात आली होती. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील रामेश्वर मंदिरात सुरू असलेल्या सात दिवसीय शिवपुराण कथेची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. याप्रसंगी त्र्यंबकेश्वर येथील पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर १००८ स्वामी शिवगिरी महाराज यांनी धर्माच्या कार्यासाठी आणि प्रचार-प्रसारासाठी राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आल्यास खरी क्रांती घडते, असे प्रतिपादन केले. हरी ओम वृक्षमित्र परिवाराच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाला कोपरगाव येथील जनार्धन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज, नारायणपूर येथील अण्णा महाराजांचे उत्तराधिकारी टेंबे स्वामी महाराज, आमदार अमोल खताळ, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आणि हरी ओम वृक्षमित्र परिवाराचे प्रमुख अविनाश वाकचौरे यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित होते. शिवगिरी महाराजांनी उपस्थित भाविकांना हिंदू धर्माचा…

Read More

प्रतिनिधी, संगमनेर –  ऊस आणि दूध ही शाश्वत पिके असून, संगमनेर तालुका एक कुटुंब आहे आणि यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत, आगामी काळात एकरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.  सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गळीत हंगामासाठीच्या पहिल्या मिल रोलर पूजनावेळी थोरात बोलत होते. या कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, लक्ष्मणराव कुटे, संचालक संपतराव गोडगे, इंद्रजीत थोरात, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे, विजय राहणे, गुलाब देशमुख, अरुण वाकचौरे,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी संगमनेर तालुका माहेश्‍वरी सभेच्या वतीने आयोजित महेश नवमीनिमित्त बुधवारी (४ जून) निघालेल्या भव्य शोभायात्रेने संगमनेरकरांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः केरळी बँड आणि माहेश्‍वरी महिलांच्या टाळ नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय माहेश्‍वरी समाज बंधू-भगिनींची आकर्षक वेशभूषा आणि शोभायात्रेतील नियोजनबद्धता हे देखील प्रमुख आकर्षण ठरले. आमदार अमोल खताळ यांनीही या शोभायात्रेत सहभागी होत माहेश्‍वरी बंधू-भगिनींना महेश नवमीच्या शुभेच्छा दिल्या. महेश नवमीनिमित्त श्री बालाजी मंदिरात महेश भगवान रुद्राभिषेक यजमान पल्लवी व शैलेश कासट आणि शिवानी व कृष्णा आसावा यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर लगेचच शोभायात्रेचा शानदार शुभारंभ झाला. या शोभायात्रेचे नियोजन आणि रथ सजावट राजस्थान युवक मंडळाच्या सदस्यांनी अतिशय सुंदरपणे केली…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी  माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमुळे निळवंडे धरणाचे पाणी अहमदनगर जिल्ह्यातील 182 गावांसह, विशेषतः तळेगाव गटातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये पोहोचले आहे. त्यांच्या पूर्णत्वास गेलेले धरण आणि उजवा व डावा कालवा शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घेऊन आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे प्रतिपादन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी केले. चिंचोली गुरव येथे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून विविध बंधारे भरताना आयोजित पाणीपूजन प्रसंगी थोरात बोलत होते. थोरात पुढे म्हणाले की, निळवंडेच्या कालव्यांमधून पाणी आल्याने संगमनेर तालुक्यात जलसमृद्धी निर्माण झाली आहे. थोरात कारखान्याच्या माध्यमातून विविध गावांमध्ये यंत्रसामग्री पुरवून चारी खोदून बंधारे भरून देण्यात आले आहेत, तर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी संगमनेरमध्ये एक अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली असून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून दोनदा बलात्कार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी आदित्य अर्जुन शेटे या आरोपी विरोधात बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकारी विकास काळे पुढील तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी संगमनेर शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. महाविद्यालयात जात असताना बसस्थानकावर तिची ओळख आरोपी तरुणासोबत झाली. आरोपीने तिच्यासोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिला आपल्या घरी बोलावले. ५ डिसेंबर २०२४ ते १५ एप्रिल २०२५ या कालावधीत आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार केला. या घटनेची…

Read More

मुंबई, विशेष प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मे महिन्याचा प्रलंबित हप्ता कधी देणार या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सन्मान निधीच्या वितरणाची माहिती दिली असून तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच आजपासून (५ जून) हा निधी थेट लाभार्थ्यांच्या आधार-लिंक्ड बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल. मे महिन्याचा हप्ता जून महिना उजाडला तरी जमा न झाल्याने महिला वर्गात काहीशी नाराजी दिसून येत होती. निवडणुकीपूर्वी वेळेवर पैसे जमा करणाऱ्या सरकारकडून निवडणुकीनंतर या योजनेत दिरंगाई होत असल्याची चर्चा होती. मात्र, आता आदिती तटकरे यांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण देत महिलांना दिलासा दिला आहे. तटकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये…

Read More

संगमनेर (प्रतिनिधी):  माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळे निळवंडे धरणाचे डावे आणि उजवे कालवे त्यांच्याच कार्यकाळात पूर्ण झाले असून, या कालव्यांमधून संगमनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये पाणी पोहोचले आहे. यामुळे अनेक बंधारे आणि गावतळी भरली असून, तालुक्यात जलसमृद्धी निर्माण झाल्याचे संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी म्हटले आहे. बुधवारी (४ जून) रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते अंभोरे, पानोडी, मालुंजे, पिंपारणे येथील उजव्या कालव्यातून भरलेल्या बंधाऱ्यांचे जलपूजन करण्यात आले. यावेळी संचालक सतीश वर्पे, गंगाराम वाकचौरे, अण्णा राहिंज, लहानभाऊ वर्पे, रवींद्र रोहम, अरुणराव देशमुख, शुभम काळे, दिनकर वाकचौरे, नवनीत देशमुख, राजेंद्र देशमुख, सरपंच नारायण मरभळ, अरुण राहिंज, रमेश राहिंज,…

Read More