Author: अनंत पांगारकर
विशेष प्रतिनिधी / मुंबई मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी कथित आरोपी वाल्मिक कराड याचे पाठीराखे असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील पुरावे मिळाल्याशिवाय त्यांना मंत्रिमंडळातून दूर केलं जाणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच यासंबधीचा खुलासा करत मुंडे यांची एकप्रकारे पाठराखण केली आहे. संतोष देशमुखांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी विरोधक मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत आहेत असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “मला या प्रकरणातील राजकारणात जायचं नाही. मी अगोदरपासून सांगत आलो…
मंगळवार, ३१ डिसेंबर वाल्मीक कराड मंगळवारी पुणे पोलिसांना शरण आला आहे. या संदर्भात राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वपूर्ण विधान केले असून दहशत कायमची संपली तरच न्याय झाला असे म्हणता येईल, अन्यथा ही शरणागती तपासाची नौटंकी ठरेल असे म्हटले आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी आणि बीडमधील सरपंच हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड आज अखेर सीआयडीकडे शरण आला आहे. पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मागील २२ दिवसांपासून कराड हा फरार होता. वाल्मिक कराडसह सरपंच हत्या प्रकरणातील इतर फरार तीन आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी बीडमध्ये नुकताच सर्वपक्षीय मोर्चाही काढण्यात आला होता. या मोर्चानंतर सरकारवर निर्माण झालेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर सीआयकडून…
मंगळवार, ३१ डिसेंबर पुणे – दोन कोटींच्या खंडणीप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पुण्यात सीआयडी ऑफिसला शरण आला आहे. शरण येण्याआधी त्याचा एक व्हिडीओ पुढे आला होता. यात त्याने आपण शरणागती पत्करत असल्याची माहिती दिली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन २२ दिवस उलटले आहेत. या प्रकरणातही वाल्मिकी कराडचं नाव घेतलं जात आहे. त्या अनुषंगानेही कराडची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्रभर संतापाचे लाट उसळली आहे. हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. तसेच, राज्यातील राजकीय वातावरणही तापले होते. त्यातच खंडणीसह इतरही गंभीर आरोप वाल्मीक कराड याच्यावर आहेत. पण खंडणी प्रकरणात तो सीआयडीला हवा होता. विरोधकांनी सातत्याने…
आरोपींना अटक करा, टोल प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा आठ दिवसात टोल नाका बंद झाला नाही तर पुन्हा आंदोलन, टोल नाका फोडणार, संगमनेरकरांचा प्रशासनाला इशारा मंगळवार, ३१ डिसेंबर संगमनेर – नाशिक-पुणे मार्गावर असलेल्या संगमनेरलगतच्या हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावरील टोल कर्मचाऱ्यांची गुंडागर्दी पुन्हा एकदा समोर आली आहे. शनिवारी रात्री या टोलनाक्यावर भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष असलेले अतुल कासट यांच्यासह त्यांच्या भावांना आणि मित्राला टोल कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली आहे. मारहाणीत अतुल आणि अमित हे दोघे कासट बंधू गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान टोल कर्मचाऱ्यांच्या गुंडागर्दी विरोधात आज एकवटले असून व्यापाऱ्यांसह सर्वपक्षीय संगमनेरकरांनी…
सोमवार ३० डिसेंबर संगमनेर – शहरातील बीएड कॉलेज रस्त्यावर असलेल्या भाजीपाला विक्रेत्यांवर नगरपरिषदेने कारवाईचा बडगा उगारला आहे. नगरपालिकेने ट्रॅक्टर पाठवून देतील भाजीपाला विक्रेत्यांना निघून जाण्यास सांगितले. नगरपालिकेची ही कारवाई अत्यंत मनमानी असून नगरपालिकेचा अन्याय सहन करणार नसल्याचा इशारा नगरपालिकेच्या पथविक्रेता समितीचे सदस्य ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिला आहे. या मनमानी कारवाईचा निषेध करण्यासाठी भाजीपाला विक्रेते एकत्र जमा झाले होते, यावेळी जोंधळे बोलत होते. संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशवराव जाधव, शहराध्यक्ष दत्तात्रय कांडेकर, भाजीपाला विक्रेते माजी सरपंच लांडगे यांच्यासह भाजीपाला विक्रेते यावेळी उपस्थित होते. जोंधळे म्हणाले, संगमनेर शहरांमध्ये नेहरू चौक, बी. एड. कॉलेज, मालदाड रोड, नवीन नगर रोड अशा अनेक ठिकाणी भाजीपाला…
सोमवार ३० डिसेंबर अहिल्यानगर – तालुक्यात अवैधरित्या गौणखनिज उत्खनन करुन वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या मालकांनी दंडात्मक कार्यवाहीत आदेशातील रक्कम शासन जमा न केल्याने ही रक्कम वसूल करण्यासाठी कारवाई जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता अहिल्यानगरच्या तहसील कार्यालयाजवळील गंगा उद्यानाच्या मागील बाजूस जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणाऱ्या जंगम मालमत्तेची किंमत, अनामत रक्कम, तसेच लिलावाच्या अटी व शर्तीकरिता तहसीलदार अहिल्यानगर यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे तहसीलदार संजय शिंदे यांनी कळविले आहे.
सोमवार ३० डिसेंबर मुंबई – मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून लोकसभा निवडणुकीत अवघ्या ४८ मतांनी विजयी झालेले शिवसेना (शिंदे गट) खासदार रवींद्र वायकर यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसून कोणतीही जीवितहानी झाली नाही. खासदार वायकर देखील या गाडीत असल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी रात्री पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वारासमोर हा अपघात झाला. अपघातावेळी वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आपण आता नंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक चौकशी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत ४८ मतांनी विजयी… मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत रविंद्र वायकर…
सोमवार ३० डिसेंबर नवी दिल्ली : राज्यात विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर मोठ्या बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपमध्ये लवकरच संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होणार असून, महाराष्ट्रासह सात राज्यांचे भाजप अध्यक्ष बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पक्षाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. या राज्यात बदल – मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर आणि झारखंडमधील प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार आहेत. मात्र, भाजपच्या घटनेनुसार या फेरबदलांपूर्वी पक्षाला ५० टक्के राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण कराव्या लागणार आहेत. राज्यात विद्यमान प्रदेशाध्यक्ष मंत्री – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले…
रविवार, २९ डिसेंबर मुंबई – बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण राज्यभरात चर्चेत आहे. या प्रकरणात थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांचे नाव समोर आल्याने राज्यभर खळबळ उडाली असतानाच सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा केल्याने आता बीड पोलिसांनी त्यांना नोटीस पाठविली आहे. दमानिया यांनी आरोपींच्या मृत्यू संदर्भात जो दावा केला त्याचे अधिकचे स्पष्टीकरण देण्याची मागणी या नोटीसद्वारे बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी दिलेल्या नोटीसद्वारे केली आहे. ज्या मोबाईल नंबरवरून व्हॉइस मेसेज आलेत, तो मोबाईल नंबर, व्हॉइस मेसेज, इतर माहिती आणि पुरावे…
बीडच्या मस्साजोगचे सरपंच सुभाष देशमुख यांच्या निघृण हत्येच्या घटनेने महाराष्ट्राची लक्तरं गेल्या पंधरा दिवसांपासून सार्या देशभर निघत आहेत. सुसंस्कृत महाराष्ट्रात असं होऊ शकतं, याची खात्रीच देशमुख यांच्या हत्येने देशाला करून दिली आहे. या प्रकरणातला तपास ज्या गतीने सुरू आहे ते पहाता महाराष्ट्राला वळणावर आणण्याच्या आणाभाका देणार्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे राज्य सावरता येईल, असं वाटत नाही. एका सरपंचाचा खून होतो, लोकं रस्त्यावर उतरतात, सरपंचांची लहान मुलगी न्यायासाठी सरकारकडे याचना करत असतानाही गेल्या पंधरा दिवसांपासून खुनी सापडत नाही, हे कसं शक्य आहे? एक काळ होता दाऊद आणि गवळी गँगने दिवसाढवळ्या खून खराबा करत मुंबईची अवस्था बिकट करून ठेवली होती. सरकारने…
