Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर येथील डॉ. सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप एका पीडित पतीने केला आहे. यामुळे आधीच एका प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. रोहीदास गणपत डोंगरे (रा. निमज, ता. संगमनेर) यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशनसह जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे लेखी तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी होणाऱ्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे. तक्रारदार डोंगरे यांनी दिलेल्या केलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी मिना डोंगरे यांना छातीचा त्रास होत असल्याने २८ जानेवारी २०२६ रोजी डॉ. सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे डॉ. कोरडे…

Read More

जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून स्वत:ची ओळख सांगणारा भारतीय जनता पक्ष 46 वर्षांचा झाला. भारतीय राजकारणात अनन्यसाधारण महत्व प्राप्त करणार्‍या या पक्षाचे एकेकाळी देशात केवळ दोन खासदार होते. आज त्यांची संख्या 240 आहे. गेल्या 12 वर्षात या पक्षाने स्वत:ची केलेली प्रगती अक्षरश: तोंडात बोटं घालायला लावणारी आहे. प्रगतीचा हा आलेख सतत्याने वाढतोच आहे. 1984 साली 404 जागा मिळवून एकहाती सत्ता मिळवली त्या काँग्रेससारख्या पक्षालाही जे जमलं नाही ते भाजपने करून दाखवलं आणि वयाची पन्नाशी गाठण्याआधी ‘घरावर झेडा’ उत्सव साजरा केला. आपल्या अस्तित्वाची जाणीव त्या पक्षाने करून दिली. समाजमाध्यमांवर याचे पाहिलेले फोटो साजर्‍या उत्सवाला साजेसे होते. पण त्यात उत्साह किती होता,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोषित, वंचित आणि शेतकरी वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडत जगाला समता व बंधुतेचा विचार दिला. सर्वधर्मसमभाव जोपासणारा त्यांचा हा मानवतावादी विचारच देशाला प्रगतीच्या पथावर पुढे नेणारा आहे, असे प्रतिपादन जय हिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. संगमनेर येथील माळीवाडा भागात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, ॲड. निशा शिवूरकर, डॉ. नामदेव गुंजाळ, अमजद पठाण यांच्यासह विविध पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. तांबे म्हणाले की, भारतीय लोकशाही आणि राज्यघटनेचा पाया हा छत्रपती शिवाजी महाराज,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर  समाजातील विविध स्तरावर कौशल्याधारित काम करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे आता अधिकृत शैक्षणिक प्रमाणपत्र प्राप्त होणार असून, यामुळे अनेकांसाठी रोजगाराची नवीन दारे उघडली जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे अनुभवाचे रूपांतर शैक्षणिक पात्रतेत होऊन सर्वसामान्य नागरिकांना प्रगतीची नवी दिशा मिळेल, असा विश्वास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या पूर्व शिक्षण मान्यता मूल्यांकन केंद्राच्या माध्यमातून या प्रक्रियेला गती देण्यासाठी संगमनेर येथील सह्याद्री महाविद्यालयात एका विशेष प्राथमिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे आयोजन जयहिंद लोकचळवळचे समन्वयक उबेद शेख,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर बहुचर्चित ठरलेल्या काकडी-सुकेवाडी गांजा कारवाईतील न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या आरोपीचा जामीन अर्ज संगमनेरचा अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आरोपीचा मुक्काम आता कोठडीतच राहणार आहे. अटकेत असलेल्या प्रथमेश सुरेश गोलवड या आरोपीने आपल्या वकिलामार्फत संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. शेख यांच्या न्यायालयासमोर या जामीन अर्जासंदर्भात सुनावणी झाली. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, १ मार्च २०२६ रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शिर्डीकडून संगमनेरकडे येणाऱ्या एका स्विफ्ट डिझायर कारचा पाठलाग करून काकडी परिसरात पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईत कारमधून २१ किलो ४९० ग्रॅम अमली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन भोंदूगिरी आणि तोतया पोलिसांच्या मदतीने एका महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅप्टन अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच या नवीन गुन्ह्याने नाशिक शहरात खळबळ उडाली असून फसवणुकीचे हे स्वरूप एखाद्या चित्रपटातील कथानकासारखे भासत आहे. ४० लाखांच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या डोंबिवलीतील एका महिला व्यावसायिकाला बाबूराव जाधव नावाच्या व्यक्तीने नाशिकच्या विठोबा जाट या भोंदूबाबाबद्दल माहिती दिली होती. दैवी शक्तीच्या साहाय्याने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून या महिलेला नाशिकला बोलावण्यात आले. सातपूर परिसरातील अमृत गार्डन येथे सुरुवातीला विधी करून महिलेचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर मुख्य पूजेसाठी तिला सापुतारा परिसरातील निर्जन डोंगरदऱ्यात नेण्यात आले. तेथे दोन कोटी रुपये…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. फुकटाच्या योजना चालवताना ज्यांची देणी देता येत नाही, ही बाब अधोरेखित करत न्यायालयाने सरकारचे कान उपटले. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैधानिक हक्कांपासून वंचित ठेवणं कोणत्याही परिस्थितीत अस्वीकारार्ह आहे. सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन आणि अनन्य लाभ देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद केली पाहिजे, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट आणि कठोर शब्दांत म्हटले की, सरकारी किंवा महानगरपालिका प्रशासन निधीच्या कमतरतेचे कारण देऊन निवृत्ती वेतन आणि प्रलंबित लाभांच्या वितरणास…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला वारकरी संप्रदाय हा जात-धर्म आणि भेदापलीकडे जाऊन सर्व समाजाला एकत्र गुंफण्याचे कार्य करतो, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. संगमनेर खुर्द येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ह.भ.प. कविराज महाराज झावरे यांचे कीर्तन संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, वारकरी संप्रदायाला थोर संतांची परंपरा लाभली असून, संत ज्ञानेश्वरांनी रचलेले ‘पसायदान’ हे केवळ काव्य नसून ते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी असलेले महाकाव्य आहे. सध्याच्या जागतिक युद्धाच्या आणि अशांततेच्या वातावरणात जगाला पसायदानाचा विचारच तारू शकतो. ज्ञानेश्वर माउलींनी स्वतःच्या आयुष्यात मोठा संघर्ष सोसूनही जगाच्या सुखासाठी साकडे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या एका छोटा हत्ती वाहनावर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख ६४ हजार ५४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यात दोन खराब आरोपींचा समावेश आहे. स्थानिक पोलीस, राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत सुरू असलेल्या अवैध दारू वाहतुकीवर शुक्रवारी सकाळी अकोले ते धामणगाव पाट रोडवर पाझर तलावाजवळ ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे संगमनेरमधून ही दारू विक्रीसाठी नेली जात होती. श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी अकोले परिसरात अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘शिव-फुले-शाहू-आंबेडकर’ व्याख्यानमालेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. संयुक्त जयंती महोत्सव समिती आणि बळीराजा अभ्यास मंडळ यांच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी, ११ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम लेखक आणि पत्रकार पी. साईनाथ हे ‘शेती आणि शेतकऱ्यांसमोरील आव्हाने’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. त्यानंतर १२ एप्रिल रोजी तरुण पिढीतील लोकप्रिय वक्ते डॉ. स्वप्नील चौधरी यांचा ‘चल दंगल समजून घेऊ’ हा संवेदनशील विषयावरील विशेष कार्यक्रम होईल. १३ एप्रिल रोजी वारकरी संप्रदायातील प्रभावी प्रवचनकार…

Read More